शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

सोलापूर बाजार समिती निवडणूक  मतदार यादीवर हरकती, एक हजाराहून अधिक शेतकरी मागताहेत मतदानाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:00 IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत. 

ठळक मुद्देसरकारने १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याची घोषणासोलापूर बाजार समितीची प्रारुप मतदार यादी १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. एकूण १५ गणांमध्ये ८० हजार ९२८ मतदारांचा समावेश आहेव्यापारी मतदारसंघातील १०६ मतदार थकबाकी असल्याने त्यांची नावे वगळावी, अशी मागणी एका शेतकºयाने केली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत. सरकारने १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याची घोषणा केली होती. आमचे नाव ८ अ उताºयावर दुसºया क्रमांकावर असले म्हणून काय झाले. आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. त्यामुळे आमच्या नावाचाही मतदार यादीत समावेश करावा, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे. सोलापूर बाजार समितीची प्रारुप मतदार यादी १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. एकूण १५ गणांमध्ये ८० हजार ९२८ मतदारांचा समावेश आहे. हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने १० दिवसांची मुदत दिली होती. सोमवार शेवटचा दिवस होता. शनिवारपर्यंत ४९६ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. सोमवारी एकाच दिवशी ७९० शेतकºयांच्या हरकती दाखल झाल्या. यातही उत्तर सोलापूर तालुक्यातून सर्वाधिक हरकती दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश हरकती सामायिक खात्यावरील शेतकºयांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, या मागणीसाठी केल्या आहेत. त्याचबरोबर नाव दुरुस्ती व इतर कारणांसाठीच्या हरकतींचाही समावेश आहे. यावर उद्यापासून सुनावणी होईल. ८ मार्चपर्यंत यावर निकाल देण्यात येणार आहे. ---------------------------२१ हजार शेतकरी वंचित राहणार  - शासनाने बाजार समितीच्या निवडणुकीचा कायदा बदलताना १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देत असल्याचे जाहीर केले होते. प्रारुप मतदार यादी तयार करताना उताºयावरील किती शेतकºयांची नावे मतदार यादीत समाविष्ट करायची, असा प्रश्न निर्माण झाला. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले. निवडणूक प्राधिकरणाने मंत्रालयात मार्गदर्शन मागितल्यानंतर शासनाने ८ अ उताºयावर प्रथम क्रमांकांवर असलेल्या शेतकºयाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उत्तर सोलापूर आणि तहसीलदारांनी मतदार यादी तयार केली. यात उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजार शेतकºयांची नावे वगळण्यात आली. यातील १ हजारांहून अधिक शेतकºयांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. कायदा मोठा की परिपत्रक असा सवालही त्यांनी केला आहे. ------------------१०६ मतदारांवर आक्षेप- व्यापारी मतदारसंघातील १०६ मतदार थकबाकी असल्याने त्यांची नावे वगळावी, अशी मागणी एका शेतकºयाने केली आहे. यावरील निकालाकडेही लक्ष असेल. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती