शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

एस-टी बसच्या संपाने सोलापूर आगाराला बसला चार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 15:52 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कामगारांनी सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाला तब्बल चार कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. ऐन दिवाळीत हा संप पुकारला गेला. पाचव्या दिवशी संप मिटल्यानंतर प्रवासी आणि एस. टी. प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आणि यंत्रणा कामाला लागली. ...

ठळक मुद्देएस.टी. संप; रिक्षांसह हॉटेल, टपºयांवर परिणामएस. टी. महामंडळाला दिवाळीत मिळणारे उत्पन्नही घटलेपरतीच्या प्रवासासाठी १२० अशा २५० गाड्या

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कामगारांनी सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाला तब्बल चार कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. ऐन दिवाळीत हा संप पुकारला गेला. पाचव्या दिवशी संप मिटल्यानंतर प्रवासी आणि एस. टी. प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आणि यंत्रणा कामाला लागली. भाऊबीजेनिमित्त आणि दुसºया दिवशी २५० जादा गाड्या सोडून प्रवाशांना तत्पर सेवा देण्यात आली. एस. टी. कामगार संघटनांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी शासनाकडे विविध मार्गाने चर्चा, निवेदने देऊन वाटाघाटी करुनही सरकार दखल घेत नसल्याने संपाची नोटीस बजावून १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत उपोषण छेडले. राज्यभर धावणाºया एस. टी. महामंडळाच्या बस आगारांमध्ये थांबून राहिल्या. ऐन दिवाळीत पुकारलेल्या या संपामुळे ज्या हक्काच्या एस. टी. वर लाखो प्रवाशांची भिस्त होती तीच बंद झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सरकारने हा संप मोडित काढावा प्रवाशांची सोय करण्यासाठी खास परिपत्रक काढून खासगी वाहनांद्वारे सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात खासगीवाल्यांनी संधीसमजून अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट केली. गेली पन्नास वर्षांत ऐन दिवाळीत सलग चार दिवस बेमुदत संप होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या संपाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. शिवाय एस. टी. महामंडळाला दिवाळीत मिळणारे उत्पन्नही घटले गेले. सोलापूर विभागातील नऊ आगारांमध्ये दररोज सरासरी ८० लाखांचे उत्पन्न मिळते. दिवाळीसारख्या मोठ्या सणात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ती या कालावधीत एक कोटीच्या घरात जाते. यंदा चार दिवस संपामुळे बस बंद असल्याने सोलापूर विभागाचे सरासरी चार कोटी रुपये उत्पन्न बुडाले. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाने शासन आणि कामगारांना लोकहिताचा विचार करुन खडे बोल सुनावत मध्यस्थीचा तोडगा सुचवत त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. लागलीच यंत्रणा खडबडून जागी झाली आणि शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर युद्धपातळीवर सूचना केल्या गेल्याने शनिवारी सकाळपासून चार दिवस जागेवर थांबलेली एस. टी. सुरु झाली. भाऊबीजेचा दिवस असल्याने आणि एस. टी. बस सुरु झाल्याने परगावी जाणाºया प्रवाशांची सोय झाली. यानिमित्त सोलापूर विभागातून नियमित गाड्यांशिवाय शनिवारी १३० जादा गाड्या सोडल्या. परतीच्या प्रवासासाठी रविवारी १२० अशा २५० गाड्या सोडून प्रवाशांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न केल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजीत जानराव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

------------------------एस.टी. संप; रिक्षांसह हॉटेल, टपºयांवर परिणामच्चार दिवस एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम प्रवाशांसह रिक्षा, हॉटेल, टपºयांवरही झाल्याचे दिसून आले. दिवाळीच्या खरेदीसह परगावी जाणाºया प्रवाशांच्या गर्दीमुळे रिक्षा वाहतूक, हॉटेल, टपºयांसह छोट्या व्यावसायिकांचे चलन चालायचे. मात्र एस. टी. च बंद असल्याने प्रवाशांची संख्या रोडावली. याचा थेट परिणाम छोट्या व्यावसायिकांवरही झाला. दिवाळीत अन्य कालावधीपेक्षा चार पैसे जादा कमावण्याची संधी असते यंदा मात्र संपामुळे निर्बंध आल्याचे या व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ------------------------‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ सदैव कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने यंदा दिवाळीत कामगारांच्या संपामुळे प्रवाशांना सेवा देता आली नाही. मात्र चार दिवसांच्या संपानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मार्ग निघताच शनिवारपासून तत्पर सेवा देण्यात आली. वेळापत्रकानुसार भाऊबीज आणि दुसºया दिवशी विशेष गाड्या सोडण्यात आल्या.- अश्वजीत जानराव,विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर विभाग