शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
3
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
4
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
5
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
6
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
7
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
8
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
9
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
11
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
12
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
13
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
14
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
15
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
16
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
17
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
18
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
19
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
20
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?

सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा, सायबर सुरक्षा कार्यशाळेत सोलापूरातील मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:00 IST

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या क्रांतीमुळे उदयास आलेल्या समाज माध्यमांद्वारे सर्वांना माहितीचे दार खुले झाले आहे; मात्र समाज माध्यमांचा वापर करताना आवश्यक सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालय सोलापूर व ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या समन्वयाने पोलीस आयुक्तालयातील सभागृहात प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सायबर जाणीव जागृती कार्यशाळासमाज माध्यमांचा वापर अविवेक वृत्तीने होऊ नये यासाठी जाणीवजागृती निर्माण करणे आवश्यक  राज्यात ४३ सायबर पोलीस ठाणे तर ४७ सायबर लॅब कार्यान्वित

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ :  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या क्रांतीमुळे उदयास आलेल्या समाज माध्यमांद्वारे सर्वांना माहितीचे दार खुले झाले आहे; मात्र समाज माध्यमांचा वापर करताना आवश्यक सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांचा वापर अविवेक वृत्तीने होऊ नये यासाठी जाणीवजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. जागृतीसाठी पत्रकार व या क्षेत्रातील जाणकारांनी काम करावे. सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा, असा सूर मान्यवरांनी सायबर सुरक्षा जाणीव जागृती कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.पोलीस आयुक्तालय सोलापूर व ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या समन्वयाने पोलीस आयुक्तालयातील सभागृहात प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सायबर जाणीव जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले. यावेळी ग्रामीण पोलीस दलाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस आयुक्तालयाच्या सहायक पोलीस निरीक्षक मधुरा भास्कर, माहिती सहायक एकनाथ पोवार उपस्थित होते.सायबर गुन्ह्याविषयी मार्गदर्शन करताना सपोनि मधुरा भास्कर म्हणाल्या, इंटरनेटने सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. आॅनलाईन बँकिंग, आॅनलाईन खरेदी, मेसेज पाठवणे, ई गव्हर्नन्स, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, व्हिडीओ कॉल यामुळे जगातले लोक खूपच जवळ आले आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारांनी नवीन कल्पना शोधून लोकांचा पैसा आणि गोपनीयतेला धोका निर्माण केला आहे. याला आळा घालण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आले आहेत.  इंटरनेट, समाज माध्यम वापरकर्ते यांनी या माध्यमांचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली कोणतीही गोपनीय  माहिती त्रयस्थ व्यक्तीला देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. रवींद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणातून सध्या बँकिंग क्षेत्रात सर्वच व्यवहार आॅनलाईन करण्यावर भर दिला जात आहे. आपले मोबाईल क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले असल्याने आॅनलाईन व्यवहार करताना याबाबत अधिक जागरुक व दक्ष राहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करताना  फसव्या जाहिरातीला आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. नागरिकांनी आपली गोपनीय माहिती, एटीएम पासवर्ड कोणालाही देऊ नये. अशा प्रकारच्या माहितीची मागणी  केल्यास संबंधित बँकेत संपर्क साधावा किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करावी, असाही सल्ला त्यांनी दिला. ----------------------राज्यात ४३ सायबर पोलीस ठाणे; ४७ लॅब राज्यात ४३ सायबर पोलीस ठाणे तर ४७ सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर कायदा अस्तित्वात आला असल्याचे सांगून  गायकवाड म्हणाले, या कायद्याच्या जनजागृतीसाठी पत्रकारांनी सतत लेखन करावे. आपली सामाजिक जबाबदारी समजून या कायद्याची जनजागृती करावी हे सांगताना त्यांनी सायबर कायद्यातील विविध कलमांची माहिती दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस