शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अत्यल्प पाण्यावर ६० गुंठ्यात ९ टनावर ढोबळी मिरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:56 IST

शेतशिवार यशोगाथा; अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील शेतकरी मल्लिनाथ प्रचंडे याची कहाणी

ठळक मुद्दे मागील वर्षी ३ एकर मध्ये कलिंगडाचे १५ लाख रुपयांचे फळपीक घेतले़यंदा जून महिन्यात मल्लिनाथ यांनी स्वत:च्या ६० गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवडकेवळ ६० गुंठ्यात आणि अत्यल्प पाण्यावर लाखो रुपयांची ढोबळी मिरचीचे पीक घेतले

उडगी : सध्याची अवर्षण परिस्थिती पाहता स्वत:च्या शेतीत कोणी नवा प्रयोग करण्याची हिम्मत करत नाही़ नशिबाला दोष देत काही शेतकरी एकीकडे हतबलता व्यक्त करतो तर दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगीच्या मल्लिनाथ प्रचंडे या तरुण शेतकºयाने ढोबळी मिरचीच्या माध्यमातून यशस्वी शेती करून दाखवली आहे. केवळ ६० गुंठ्यात आणि अत्यल्प पाण्यावर लाखो रुपयांची ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे़ त्यांच्यातील कल्पकता, प्रयोगशीलता आणि कठोर परिश्रमाचे अक्कलकोट तालुक्यातून कौतुक होत आहे़ मल्लिनाथ हे दहावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण न घेता १५ वर्षे वाहन चालक म्हणून काम केले. या कामात मन रमत नसल्याने शेती करण्याचा निश्चय केला. शेतीत नवनवीन प्रयोग सुरु केले आणि ते यशस्वीही झाले.

 मागील वर्षी ३ एकर मध्ये कलिंगडाचे १५ लाख रुपयांचे फळपीक घेतले़ या प्रयोगानेच त्यांना यू टर्न मिळाला़ यंदा जून महिन्यात मल्लिनाथ यांनी स्वत:च्या ६० गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली. मिरचीच्या लागवडपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून घेतली. त्यानंतर बोरामणीतील सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ढोबळी मिरचीची लागवड केली़ पाण्याच्या बचतीसाठी त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या़ त्यावर मल्चिंग पेपर अंथरले़ नान्नज येथून बेळगावी पोपटी जातीची ढोबळी मिरचीची १५ हजार रोपे आणली.

ती चार बाय दीड फूट अंतराने लावली़ पिकाच्या संरक्षणासाठी शेडनेटचा वापर केला़ मल्लिनाथला यातून ४० टन ढोबळी मिरची उत्पादनाची अपेक्षा आहे. यातून    रोपं, खते, कीडनाशक,  ठिबक, वाहतूक, मजुरी असा दोन लाखांचा खर्च वजा करता मल्लिनाथला  सात लाखांचा निव्वळ नफा होणार आहे.

पहिल्याच तोडीत निघाली दीड टन मिरची - लागवडीनंतर ३ पोते डीएपी, २ पोती लिंबोळी पेंड, २ पोती युरिया खत टाकू न दर तीन दिवसांनी कीडनाशक आणि बुरशी नाशकाच्या फवारण्या केल्या. लागवडीनंतर २५ दिवसांनी मिरची तोडणीस तयार झाली. पहिल्याच तोडीला दीड टन ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळाले़ आठवड्यातून एकदा या मिरचीची तोडणी केली जाते आणि ही मिरची प्लास्टिक पिशवी भरून हैदराबाद बाजारपेठेत पाठवली जातेय. आत्तापर्यंत तीन तोडी झाल्या असून असून त्यातून ९ टन उत्पादन मिळाले आहे. आज किलोमागे २० ते २२ रुपयांचा दर मिळाला असून पुढील दोन ते तीन महिने यातून उत्पादन मिळतराहणार आहे़

योग्य नियोजन, श्रमाची तयारी, सूक्ष्म जलसिंचन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ढोबळी मिरची लागवड केली़ आजच्या परिस्थितीला हतबल न होता योग्य नियोजनावर भरघोस पीक घेऊ शकतो़ - मल्लिनाथ प्रचंडे,शेतकरी, गळोरगी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी