शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

अत्यल्प पाण्यावर ६० गुंठ्यात ९ टनावर ढोबळी मिरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:56 IST

शेतशिवार यशोगाथा; अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील शेतकरी मल्लिनाथ प्रचंडे याची कहाणी

ठळक मुद्दे मागील वर्षी ३ एकर मध्ये कलिंगडाचे १५ लाख रुपयांचे फळपीक घेतले़यंदा जून महिन्यात मल्लिनाथ यांनी स्वत:च्या ६० गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवडकेवळ ६० गुंठ्यात आणि अत्यल्प पाण्यावर लाखो रुपयांची ढोबळी मिरचीचे पीक घेतले

उडगी : सध्याची अवर्षण परिस्थिती पाहता स्वत:च्या शेतीत कोणी नवा प्रयोग करण्याची हिम्मत करत नाही़ नशिबाला दोष देत काही शेतकरी एकीकडे हतबलता व्यक्त करतो तर दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगीच्या मल्लिनाथ प्रचंडे या तरुण शेतकºयाने ढोबळी मिरचीच्या माध्यमातून यशस्वी शेती करून दाखवली आहे. केवळ ६० गुंठ्यात आणि अत्यल्प पाण्यावर लाखो रुपयांची ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे़ त्यांच्यातील कल्पकता, प्रयोगशीलता आणि कठोर परिश्रमाचे अक्कलकोट तालुक्यातून कौतुक होत आहे़ मल्लिनाथ हे दहावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण न घेता १५ वर्षे वाहन चालक म्हणून काम केले. या कामात मन रमत नसल्याने शेती करण्याचा निश्चय केला. शेतीत नवनवीन प्रयोग सुरु केले आणि ते यशस्वीही झाले.

 मागील वर्षी ३ एकर मध्ये कलिंगडाचे १५ लाख रुपयांचे फळपीक घेतले़ या प्रयोगानेच त्यांना यू टर्न मिळाला़ यंदा जून महिन्यात मल्लिनाथ यांनी स्वत:च्या ६० गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली. मिरचीच्या लागवडपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून घेतली. त्यानंतर बोरामणीतील सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ढोबळी मिरचीची लागवड केली़ पाण्याच्या बचतीसाठी त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या़ त्यावर मल्चिंग पेपर अंथरले़ नान्नज येथून बेळगावी पोपटी जातीची ढोबळी मिरचीची १५ हजार रोपे आणली.

ती चार बाय दीड फूट अंतराने लावली़ पिकाच्या संरक्षणासाठी शेडनेटचा वापर केला़ मल्लिनाथला यातून ४० टन ढोबळी मिरची उत्पादनाची अपेक्षा आहे. यातून    रोपं, खते, कीडनाशक,  ठिबक, वाहतूक, मजुरी असा दोन लाखांचा खर्च वजा करता मल्लिनाथला  सात लाखांचा निव्वळ नफा होणार आहे.

पहिल्याच तोडीत निघाली दीड टन मिरची - लागवडीनंतर ३ पोते डीएपी, २ पोती लिंबोळी पेंड, २ पोती युरिया खत टाकू न दर तीन दिवसांनी कीडनाशक आणि बुरशी नाशकाच्या फवारण्या केल्या. लागवडीनंतर २५ दिवसांनी मिरची तोडणीस तयार झाली. पहिल्याच तोडीला दीड टन ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळाले़ आठवड्यातून एकदा या मिरचीची तोडणी केली जाते आणि ही मिरची प्लास्टिक पिशवी भरून हैदराबाद बाजारपेठेत पाठवली जातेय. आत्तापर्यंत तीन तोडी झाल्या असून असून त्यातून ९ टन उत्पादन मिळाले आहे. आज किलोमागे २० ते २२ रुपयांचा दर मिळाला असून पुढील दोन ते तीन महिने यातून उत्पादन मिळतराहणार आहे़

योग्य नियोजन, श्रमाची तयारी, सूक्ष्म जलसिंचन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ढोबळी मिरची लागवड केली़ आजच्या परिस्थितीला हतबल न होता योग्य नियोजनावर भरघोस पीक घेऊ शकतो़ - मल्लिनाथ प्रचंडे,शेतकरी, गळोरगी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी