शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

तर कोरोनापेक्षा कुपोषणाने जास्त बळी पडतील; मेधा पाटकारांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:22 IST

सोलापूर शहरातील श्रमिकांशी साधला संवाद; रेशन धान्य व्यवस्थेबाबत व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कुठलेच सरकार करणार नाही - मेधा पाटकरसरकारला केंद्राने फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि राज्याने यासाठी लढा उभारला पाहिजे - मेधा पाटकरप्रत्येक बेरोजगार आणि अर्धरोजगारालासुद्धा १० हजार रुपये तत्काळ बँकेत देऊन क्रयशक्ती निर्माण करायला हवी - मेधा पाटकर

सोलापूर : देशातील रेशन व्यवस्थेत सुधारणा करावी. पाच किलोऐवजी १५ किलो धान्य देण्यात यावे. या सुधारणा न झाल्यास गरीब लोक हे कोरोनाने नाही तर कुपोषणाने मरतील, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.

लॉकडाऊनमध्ये शहरात उद्भवलेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी मेधा पाटकर या सोलापुरात आल्या होत्या. शहरातील विविध वसाहतींमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच शिक्षण, आरोग्य, मागासवर्गीय, महिला, कामगार, देवदासी, घरगुती कामगार यांच्या प्रश्नांवर काम करणाºया कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 

मेधा पाटकर म्हणाल्या, सोलापुरातील अनेक महिलांशी संवाद साधल्यानंतर येथील रेशन व्यवस्थेत अफरातफर असल्याचे समजले. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पाच किलो धान्य देण्याची घोषणा झाली. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांना मे आणि जूनमध्ये धान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष हे धान्य सर्वांना मिळाले नाही. आॅनलाईनच्या नावाखाली भ्रष्टाचार होत आहे. त्यांची नावे आणि नंबर देखील आम्हाला मिळाले आहेत.

महिलांना देखील मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. महिलांच्या खात्यामध्ये जनधन योजनेंतर्गत पैसे आले नाहीत. घरगुती काम करणाºया महिलांना भेटल्यानंतर त्यांच्याही समस्या समजल्या. त्यांना घरात घेतले जात नाही. बहुतांश मालक हे मोलकरणींना लॉकडाऊनदरम्यानचे वेतन देत नाहीत. हीच स्थिती नाभिक समाजाचीही आहे. ज्यांना एड्स आणि चिकन गुनिया असताना लक्ष्य बनवले होते, त्यांनाच पुन्हा का लक्ष्य बनवले जात आहे, हा आमचा सवाल आहे. हॉटेल सुरू आहेत. 

विमाने सुरू केली आहेत तर नाभिक समाजाच्या कारागिरांना किट्स देऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली. जुना विजापूर नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मेधा पाटकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका पूनम बनसोडे, अजित बनसोडे, यशवंत फडतरे, सुजाता फडतरे, दीपक आठवले, नागीणताई साबळे, दीपक गायगवळी, गिरीश उडाणशिव, बिस्मिल्ला मुजावर, जयदेवी शिवशरण, केवल फडतरे, सचिन कोलते आदी उपस्थित होते.

केंद्राकडून फंड घेण्यासाठी राज्य सरकारने लढा उभा करावा- आमचे म्हणणे हे आहे की, लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कुठलेच सरकार करणार नाही. पण राज्य सरकारला केंद्राने फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि राज्याने यासाठी लढा उभारला पाहिजे. नाही तर संघात्मक रचनेला काही अर्थ नाही. त्या फंडातून रोजगार हरवून बसलेल्या किंवा ठप्प असलेल्या प्रत्येक बेरोजगार आणि अर्धरोजगारालासुद्धा १० हजार रुपये तत्काळ बँकेत देऊन क्रयशक्ती निर्माण करायला हवी. नाही तर दुकाने उघडी राहतील, पण ग्राहक येणार नाहीत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMedha Patkarमेधा पाटकरfoodअन्न