शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

तर कोरोनापेक्षा कुपोषणाने जास्त बळी पडतील; मेधा पाटकारांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:22 IST

सोलापूर शहरातील श्रमिकांशी साधला संवाद; रेशन धान्य व्यवस्थेबाबत व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कुठलेच सरकार करणार नाही - मेधा पाटकरसरकारला केंद्राने फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि राज्याने यासाठी लढा उभारला पाहिजे - मेधा पाटकरप्रत्येक बेरोजगार आणि अर्धरोजगारालासुद्धा १० हजार रुपये तत्काळ बँकेत देऊन क्रयशक्ती निर्माण करायला हवी - मेधा पाटकर

सोलापूर : देशातील रेशन व्यवस्थेत सुधारणा करावी. पाच किलोऐवजी १५ किलो धान्य देण्यात यावे. या सुधारणा न झाल्यास गरीब लोक हे कोरोनाने नाही तर कुपोषणाने मरतील, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.

लॉकडाऊनमध्ये शहरात उद्भवलेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी मेधा पाटकर या सोलापुरात आल्या होत्या. शहरातील विविध वसाहतींमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच शिक्षण, आरोग्य, मागासवर्गीय, महिला, कामगार, देवदासी, घरगुती कामगार यांच्या प्रश्नांवर काम करणाºया कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 

मेधा पाटकर म्हणाल्या, सोलापुरातील अनेक महिलांशी संवाद साधल्यानंतर येथील रेशन व्यवस्थेत अफरातफर असल्याचे समजले. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पाच किलो धान्य देण्याची घोषणा झाली. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांना मे आणि जूनमध्ये धान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष हे धान्य सर्वांना मिळाले नाही. आॅनलाईनच्या नावाखाली भ्रष्टाचार होत आहे. त्यांची नावे आणि नंबर देखील आम्हाला मिळाले आहेत.

महिलांना देखील मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. महिलांच्या खात्यामध्ये जनधन योजनेंतर्गत पैसे आले नाहीत. घरगुती काम करणाºया महिलांना भेटल्यानंतर त्यांच्याही समस्या समजल्या. त्यांना घरात घेतले जात नाही. बहुतांश मालक हे मोलकरणींना लॉकडाऊनदरम्यानचे वेतन देत नाहीत. हीच स्थिती नाभिक समाजाचीही आहे. ज्यांना एड्स आणि चिकन गुनिया असताना लक्ष्य बनवले होते, त्यांनाच पुन्हा का लक्ष्य बनवले जात आहे, हा आमचा सवाल आहे. हॉटेल सुरू आहेत. 

विमाने सुरू केली आहेत तर नाभिक समाजाच्या कारागिरांना किट्स देऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली. जुना विजापूर नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मेधा पाटकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका पूनम बनसोडे, अजित बनसोडे, यशवंत फडतरे, सुजाता फडतरे, दीपक आठवले, नागीणताई साबळे, दीपक गायगवळी, गिरीश उडाणशिव, बिस्मिल्ला मुजावर, जयदेवी शिवशरण, केवल फडतरे, सचिन कोलते आदी उपस्थित होते.

केंद्राकडून फंड घेण्यासाठी राज्य सरकारने लढा उभा करावा- आमचे म्हणणे हे आहे की, लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कुठलेच सरकार करणार नाही. पण राज्य सरकारला केंद्राने फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि राज्याने यासाठी लढा उभारला पाहिजे. नाही तर संघात्मक रचनेला काही अर्थ नाही. त्या फंडातून रोजगार हरवून बसलेल्या किंवा ठप्प असलेल्या प्रत्येक बेरोजगार आणि अर्धरोजगारालासुद्धा १० हजार रुपये तत्काळ बँकेत देऊन क्रयशक्ती निर्माण करायला हवी. नाही तर दुकाने उघडी राहतील, पण ग्राहक येणार नाहीत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMedha Patkarमेधा पाटकरfoodअन्न