सोलापूर : एसएमटीने (सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम) महापालिका हद्दीबाहेर ४0 किमीपर्यंत बससेवा सुरू करण्यास राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. प्र. परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी ही माहिती दिली. परिवहन उपक्रमाकडे नवीन बस आल्यास ही सेवा सुरू करून उत्पन्नात वाढ करता येईल. सध्या परिवहन खात्याकडे ७0 बस मार्गावर धावत असून, नव्या योजनेतून बस आल्यावर ही संख्या २00 पर्यंत जाणार आहे. त्यामुळे परिवहनचा टप्पा वाढविल्यास जवळची महत्त्वाची गावे जोडली जातील. यात तुळजापूर, नळदुर्ग, अक्कलकोट या गावांचे लक्ष आहे. तुळजापूर व अक्कलकोट ही तीर्थक्षेत्रे असल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये—जा करतात. गाड्या सुरू झाल्या ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. राज्य परिवहनच्या दृष्टीने पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी आणि तुळजापूर ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे राज्य परिवहन खाते या प्रस्तावाला परवानगी देणार नाही. परिवहन खात्याने ही उडी घेताना या वास्तवाचा विचार करावा अशी सूचना महापालिकेतील सभागृह नेते महेश कोठे यांनी केली आहे.-------------------------परिवहनचा हा प्रस्ताव म्हणजे पाण्यात म्हैस आणि दुधाचा हिशोब असा आहे. वास्तविक एस. टी. खाते याला परवानगी देणार नाही. तोट्यात चालणाऱ्या एसएमटीवर महापालिका दरवर्षी ११ कोटी खर्च करते. हेच पैसे पाणीपुरवठ्याला दिले असते तर आज ही वेळ आली नसती.-महेश कोठेसभागृह नेते
एसएमटीचा ४0 कि़मी़पर्यंत बस सोडण्याचा प्रस्ताव
By admin | Updated: July 7, 2014 01:14 IST