शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू; शिक्षणमंत्री उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 21:55 IST

वारकरी परिषदचे संत साहित्य संमेलन; 

पंढरपूर : भारताला मोठा अध्यात्मिक वारसा आहे. हे तो वारसा पुढे जतन रहावा व पुढे चालवा यांसाठी संत विद्यापीठ महत्वाचे आहे. परंतू पंढरपुरातील संत विद्यापीठाचे काम संथ गतीने सुरू आहे ते जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वारकरी साहित्य परिषदेचे घेण्यात आलेल्या संत साहित्य परिषदेमध्ये दिली.

जुहू (मुंबई) येथील नोवाटेल हॉटेलमध्ये वारकरी साहित्य परिषदेचे नववे संत साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलना दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते. २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या  स्वागताध्यक्षपदी पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी भूषवलेली आहे.

पुढे सांमत म्हणाले, पंढरीचा वारकरी हा साऱ्या समाजाचा मार्गदाता आहे. आज या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन मी केली असली तरी मी एक सामान्य वारकरीच आहे. यापुढे वारकऱ्यांना फडकर यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करेल. तसेच पंढरपूरचे रखडलेले संत विद्यापीठ तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

दिंडी काढून संमेलनाची सुरुवात

राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक स्वरूपात आलेल्या वारकरी दिंडी करी फडकरी मंडळाच्या प्रतिनिधींनी जुहू चौपाटीवर टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पद्मविभूषण डॉक्टर डी वाय पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह भ प माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, यांच्यासह वारकरी उपस्थित होते. यासर्वानी संत साहित्य संमेलनाची सुरुवात वारकरी परंपरेने दिंडी काढून झाली.

असा होता पहिला दिवस

नूतन अध्यक्ष ह.भ. प. चकोर महाराज बाविस्कर यांनी ह-भ-प अमृत महाराज जोशी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह-भ-प डॉक्टर सदानंद मोरे होते यावेळी उपस्थित महाराज मंडळींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला चार ते सहा या चर्चासत्रामध्ये प्रदूषण या विषयावर सखोल विश्लेषण करण्यात आले या चर्चासत्राचे अध्यक्ष ह.भ.प. माणिक गुट्टे तर वक्ते म्हणून ह-भ-प श्री भाटघरे, ह.भ.प श्री सोनटक्के यांनी सहभाग घेतला. सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये सामुदायिक हरिपाठ घेण्यात आला. संध्याकाळी अभंग वाणी आणि कीर्तनाने आजच्या दिवसाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर