शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू; शिक्षणमंत्री उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 21:55 IST

वारकरी परिषदचे संत साहित्य संमेलन; 

पंढरपूर : भारताला मोठा अध्यात्मिक वारसा आहे. हे तो वारसा पुढे जतन रहावा व पुढे चालवा यांसाठी संत विद्यापीठ महत्वाचे आहे. परंतू पंढरपुरातील संत विद्यापीठाचे काम संथ गतीने सुरू आहे ते जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वारकरी साहित्य परिषदेचे घेण्यात आलेल्या संत साहित्य परिषदेमध्ये दिली.

जुहू (मुंबई) येथील नोवाटेल हॉटेलमध्ये वारकरी साहित्य परिषदेचे नववे संत साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलना दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते. २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या  स्वागताध्यक्षपदी पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी भूषवलेली आहे.

पुढे सांमत म्हणाले, पंढरीचा वारकरी हा साऱ्या समाजाचा मार्गदाता आहे. आज या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन मी केली असली तरी मी एक सामान्य वारकरीच आहे. यापुढे वारकऱ्यांना फडकर यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करेल. तसेच पंढरपूरचे रखडलेले संत विद्यापीठ तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

दिंडी काढून संमेलनाची सुरुवात

राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक स्वरूपात आलेल्या वारकरी दिंडी करी फडकरी मंडळाच्या प्रतिनिधींनी जुहू चौपाटीवर टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पद्मविभूषण डॉक्टर डी वाय पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह भ प माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, यांच्यासह वारकरी उपस्थित होते. यासर्वानी संत साहित्य संमेलनाची सुरुवात वारकरी परंपरेने दिंडी काढून झाली.

असा होता पहिला दिवस

नूतन अध्यक्ष ह.भ. प. चकोर महाराज बाविस्कर यांनी ह-भ-प अमृत महाराज जोशी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह-भ-प डॉक्टर सदानंद मोरे होते यावेळी उपस्थित महाराज मंडळींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला चार ते सहा या चर्चासत्रामध्ये प्रदूषण या विषयावर सखोल विश्लेषण करण्यात आले या चर्चासत्राचे अध्यक्ष ह.भ.प. माणिक गुट्टे तर वक्ते म्हणून ह-भ-प श्री भाटघरे, ह.भ.प श्री सोनटक्के यांनी सहभाग घेतला. सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये सामुदायिक हरिपाठ घेण्यात आला. संध्याकाळी अभंग वाणी आणि कीर्तनाने आजच्या दिवसाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर