शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बिबट्यांना झुळूक माणुसकीची; सोलापुरातील प्राणिसंग्रहालयात पिंजºयापुढे लागले कुलर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:43 IST

वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे.

ठळक मुद्देसोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात चार बिबटे आहेत. त्यात नर आणि मादी प्रत्येकी दोन आहेत वन्यजीवांना सध्याच्या ४२ अंशांवर पोहोचलेल्या उष्मांकाच्या दिवसात माणुसकीची झुळूक अनुभवास येत आहे

गोपालकृष्ण मांडवकर 

सोलापूर : महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात असलेल्या वन्यजीवांना सध्याच्या ४२ अंशांवर पोहोचलेल्या उष्मांकाच्या दिवसात माणुसकीची झुळूक अनुभवास येत आहे. वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे.

सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात चार बिबटे आहेत. त्यात नर आणि मादी प्रत्येकी दोन आहेत. २०१४ मध्ये त्यांच्यासाठी या बागेत मजबूत कठडे आणि पिंजरे उभारण्यात आले. या चारही पिंजºयांवर शहाळ्या टाकून छत तयार करण्यात आले आहे. सभोवती असलेल्या झाडांमुळे येथील तापमान बरेच कमी जाणवते. तरीही त्यांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये यासाठी चार वॉटर कुलर बसविण्यात आले आहेत. ते दिवसभर सुरू असतात. यासोबतच खुल्या आणि बंद पिंजºयांमध्ये पाईपने पाणी मारून वातावरणात गारवा राखण्याचा प्रयत्न केला जातो.  या बिबट्यांच्या सेवेसाठी चार कर्मचारी तैनात असून, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आहार, आरोग्याची नियमित देखभाल केली जाते. 

बलराम आहे नरभक्षक- या उद्यानात असलेल्या चारही बिबट्यांपैकी ‘बलराम ’ नाव असलेला नरभक्षी आहे. यापूर्वी त्याने तीन जणांचा बळी घेतल्याची नोंद वनविभागाकडे असून, त्याला उत्तर प्रदेशातून पकडल्यानंतर येथील उद्यानात ठेवण्यात आले आहे. अन्य तीन बिबट्यांच्या तुलनेत आक्रमक आणि अधिक हिंस्र असलेला ‘बलराम’ पाच वर्षांचा आहे. त्याच्या बंदिस्त पिंजºयाजवळ जाताना उद्यानातील केअरटेकरलाही बरीच दक्षता घ्यावी लागते.

तिघे अखिलेशकुमार यादव यांच्याकडील बछडे- बलरामव्यतिरिक्त तीन बिबटे येथे आहेत. त्यापैकी एकाचे नाव राजू ठेवण्यात आले असून, अन्य दोन माद्यांची नावे जिमी आणि हिना अशी आहेत. २०१४ मध्ये अखिलेशकुमार यादव यांच्या खासगी उद्यानातून त्यांना येथे वनविभागाने आणले. तेव्हा ते बछडे होते. आता विकसित झाले आहेत. हे तिघेही साडेचार वर्षांचे आहेत.

उद्यानातील चारही बिबट्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिंजºयांसमोर कुलर लावण्याचा निर्णय घेतला. त्यात नियमितपणे पाणी भरले जाते. पुढच्या तीव्र उन्हाच्या दोन महिन्यांत याचा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल. यासोबतच त्यांची नियमित वैद्यकीय तपासणीही केली जाते. - डॉ. नितीन गोटेसंचालक, महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरTigerवाघWaterपाणीTemperatureतापमान