शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

सहा महिन्यांत सोलापुरातील कामगारांनी काढली चार कोटींची पीएफ रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 19:10 IST

हेमंत तिरपुडे: सत्तावीस हजार जणांंनी आत्मनिर्भर भारत योजनेचा घेतला फायदा

सोलापूर : लॉकडाऊन काळात कामगारांची रोजीरोटी बुडाली होती. यातून कामगारांची आर्थिक अडचण झाली. या काळात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कामगारांना मदतीचा हात दिला. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कामगारांना त्यांच्या हक्काच्या पीएफ रकमेतून अर्थसहाय्य करून दिले. यातून मागील सहा महिन्यांत जवळपास २७ हजार कामगारांनी चार कोटी ३२ लाख इतकी रक्कम त्यांच्या खात्यातून काढून घेतली, अशी माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालय क्षेत्रीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी दिली.

अधिक माहिती देताना तिरपुडे यांनी सांगितले, या योजनेअंतर्गत केंद्र शासन नियोक्त्यांचा, उद्योजकांचा १३ टक्केपैकी १२ टक्के हिस्सा आणि कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा संपूर्ण १२ टक्के हिस्सा अशी एकूण २४ टक्के रक्कम थेट नवीन पात्र कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी खात्यामध्ये दोन वर्षांपर्यंत जमा करणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांचे पीएफ अंशदान भारत सरकार भरणार असल्यामुळे नियोक्त्यांना अशा कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम कपात करावी लागणार नाही. त्यामुळे कामगारांना संपूर्ण वेतन दिले जाणार आहे. पात्र उद्योगांचे अंशदान भारत सरकार भरणार असल्यामुळे नियोक्त्यांवरचे आर्थिक ओझे कमी होणार आणि त्यांना फक्त १टक्का रक्कम भरावी लागणार आहे.

या योजनेचा कालावधी १ ऑक्टोबर २०२० पासून ३० जून २०२१ पर्यंत आहे, या कालावधीत जे नियोक्ता आपल्या पात्र उद्योगाची, संस्थेची ईपीएफ कायद्यांतर्गत नोंदणी करतील आणि नवीन कामगार, कर्मचाऱ्यांची नोंदणी करतील, अशा उद्योगांना आणि कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचे अर्थसहाय्य हे कर्मचारी नोंदणीपासून २४ महिन्यांसाठी उपलब्ध आहे. ३० जून २०२३ नंतर या योजनेअंतर्गत कोणताही फायदा देण्यात येणार नाही.

हजारावर कामगारांची नोंदणी

डॉ. तिरपुडे यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना पीएफ बंधनकारक केले. जे कारखानदार नोंदणी करून घेत नाहीत, त्यांच्यावर कारवाई झाली. शेकडो कारखानदारांना नोटिसा गेल्या. मागील वर्षभरात २३७ यंत्रमाग युनिट अंतर्गत १२२२ कामगारांची पीएफ नोंदणी झाली आहे. पुढील काळात प्रत्येक महिन्यात ५० यंत्रमाग युनिटची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती डॉ. तिरपुडे यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरEmployeeकर्मचारी