शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापुरातील पदपथांवर बसलेल्या गरजूंचे तीन दिवसांपासून जेवणाविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:52 IST

सामाजिक संस्था, संघटनांचा उत्साह थंडावला; आशेने पाहताहेत कार्यकर्त्यांची वाट

ठळक मुद्देरेल्वे स्टेशन परिसरात सुमारे ५० गरजू लोक उघड्यावर राहात आहेतभिक्षुक, बेघर, कामगार हे स्टेशन परिसर, श्री  सिद्धेश्वर मंदिर, एसटी स्टँड येथे थांबले काही लोक बेघर, काही कुष्ठरोग वसाहतीतील तर काही बाहेरगावातील आहेत

सोलापूर : शहराच्या विविध ठिकाणी असणाºया गरजू व्यक्तींचे जेवणाविना हाल होत असल्याचे दिसत आहे. एकवेळच्या जेवणासाठी ते हताश मनाने सामाजिक कार्यकर्त्यांची वाट पाहत आहेत. जे मिळेल त्याची बचत करुन पुढच्या वेळची पोटाची खळगी भरत आहेत. सामाजिक संस्था, संघटना यांचा उत्साह थंडावल्याचे दिसत आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप होत होते. अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने चारचाकी, दुचाकीवरुन कार्यकर्ते भात, भाजी, बिस्किटांचे वाटप करत होते. हा उत्साह आता थंडावल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात गरजूंना इतके अन्न मिळायचे की ते आता बस असे म्हणायचे; मात्र जसजसा लॉकडाऊनचा काळ वाढत चालला तसे सामाजिक संस्था संघटनांचे अन्नवाटपाचे उपक्रम कमी झाले आहेत.

रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे ५० गरजू लोक उघड्यावर राहात आहेत. तसेच भिक्षुक, बेघर, कामगार हे स्टेशन परिसर, श्री  सिद्धेश्वर मंदिर, एसटी स्टँड येथे थांबले आहेत. यातील काही लोक बेघर, काही कुष्ठरोग वसाहतीतील तर काही बाहेरगावातील आहेत. या सर्वांना अन्नासाठी सामाजिक संघटनांचा मदतीचा हात होता. आता हा हात आखडता झाला आहे. एखाद्या वेळेस कुणीतरी येतो आणि जेवण देतो. तो आला तर ठिक नाहीतर उपाशीच झोपणे त्यांच्या वाट्याला आले आहे.

सिव्हिलमधील धर्मशाळा बंद- छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या देखभालीसाठी रुग्णाचे नातेवाईक येत असतात. या नातेवाईकांच्या राहण्याची सोय सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील धर्मशाळेत केली जाते. नाममात्र पैसे घेऊन येथे रुग्णाचे नातेवाईक मुक्काम करतात; मात्र  १३ एप्रिल रोजी धर्मशाळेच्या गेटवर धर्मशाळा बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. ही धर्मशाळा बंद असल्याने अनेक गरजू नातेवाईकांच्या रात्री राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धर्मशाळा बंद असल्याने काही नातेवाईक हे रुग्णालयाच्या पायरीवर झोपत आहेत.

सुरुवातीचे १० ते १५ दिवस खूप देत होते. मी ते एकत्र करुन दुसºयांना देत होतो. मागील तीन ते चार दिवसांपासून जेवणाचे हाल होत आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते शिवभोजनाच्या माध्यमातून आपली भूक भागवत आहेत. तेही निर्धारित वेळेतच मिळते. एकदा मिळालेल्या जेवणातील भात खाऊन रात्री भाकरी किंवा पोळी राखून ठेवली जात आहे. ज्यांना जेवायला मिळत नाहीत ते उपाशी झोपत आहेत. एखादा व्यक्ती जवळून जात असला की त्याच्याकडे हे गरजू लोक आशेने पाहतात.- एक गरजवंत

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस