शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

तत्परता दाखवत अपघातातील जखमीला रूग्णालयात नेले, रस्त्यावर पडलेले लाखो रूपये परत दिले

By appasaheb.patil | Updated: March 21, 2023 12:41 IST

राष्ट्रीय महामार्ग व आरटीओ पथकाचा प्रामाणिकपणा; मोहोळजवळील अपघात

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: राष्ट्रीय महामार्ग अर्जुनसोंड पाटीजवळ (ता. मोहोळ) दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास तात्काळ मदतीसाठी धावून जाणारे महामार्ग पोलीस व आरटीओ पथकाचे कर्मचारी यांनी समयसुचकता दाखवून अपघातग्रस्तास जीवदान दिले आहे. यावेळी अर्जुनसोंडचे माजी सरपंच शुक्राचार्य हावळे यांच्या समक्ष जखमीच्या खिशातून पडलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जखमी ज्ञानेश्वर सावंत यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केली. 

मोहोळकडून सोलापूरकडे निघालेल्या ज्ञानेश्वर तुकाराम सावंत (रा. सावळेश्वर) यांची दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाच्या पाकणी टॅबचे पोलीस उपनिरीक्षक धर्मपाल सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत माने, पो.ना. विकास यादव आणि सोलापूर आरटीओ  पथकाचे कर्तव्यावर निघालेले  निरीक्षक शितलकुमार कुंभार, सहाय्यक निरीक्षक विशाल नाझीरकर, अमृता देशमुख, प्रमोद महाडिक यांनी सदर जखमीस त्वरित सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून दिले. वेळेत जखमीला उपचारासाठी सोलापूरकडे पाठवून जखमींची कागदपत्रे आणि रोख रक्कम उदात्त भावनेने परत करत देवदूत ठरलेल्या आरटीओ विभागाचे मोटार वाहन निरीक्षक शितलकुमार कुंभार  व महामार्ग विभागाचे कर्मचारी यांचे अर्जुनसोंडचे माजी सरपंच शुक्राचार्य हावळे यांनी आभार व्यक्त केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस