शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; रानमसले गावात ३४ वर्षात एकदाही नळाला पाणी आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:20 IST

दुष्काळाचा झळा ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण, जनावरांना चारा, पाणी वेळेवर मिळेना़...

ठळक मुद्दे२०११ च्या जनगणनेनुसार रानमसलेची लोकसंख्या ३७७७ इतकी आहेआज चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला दररोज टँकरद्वारे ४० हजार लिटर पाणी दिले जाते.काहींना शेतातून पाणी आणणे सवईचे झाले आहे तर बºयाच कुटुंबांनी शेतात घर केले आहे

सोलापूर : साधारण चार हजार लोकसंख्येचे रानमसले गाव. काही भाग सोडला तर काळी कसदार जमीन. गावात मात्र पाणी शोधूनही मिळत नाही. दोन वेळा गावांतर्गत पाईपलाईन करूनही ३४ वर्षांत नळाला पाणी आले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावचा शेतकरी कांदा उत्पादन घेण्यात पटाईत. उन्हाळा संपत आला की, इथला शेतकरी लागतो कांदा पिकाच्या कामाला. कमी कालावधीत अधिक उत्पादन काढण्याची खासियत रानमसलेकरांना जमली आहे. एखादे वर्ष चांगले, मात्र पाऊस नसल्याची मोठी अडचण सातत्याची. आॅगस्ट, सप्टेंबर किंवा कधी-कधी परतीचा आॅक्टोबरचा पाऊस या भागात पडतो. कसाबसा डिसेंबर महिना संपला की, गावाची टँकरची मागणी सुरू होते.

फारच कठीण परिस्थितीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात टँकर सुरू करावाच लागतो. गावच्या शिवारात पाणी लागत नसल्याने बीबीदारफळ साठवण तलावाच्या खाली रानमसलेसाठी विहीर खोदली आहे. बीबीदारफळच्या साठवण तलावात पाणी असेल तरच टँकर सुरू करण्याची गरज भासत नाही. बीबीदारफळ तलावात पाणी असले तरी पुरेसे पाणी मिळत नाही, मात्र जेमतेम पाणी मिळते, असे राजाराम गरड यांनी सांगितले. 

साधारण १९८८-८९ मध्ये विहीर पाईपलाईन व गावांतर्गत पाईपलाईन करण्यात आली. त्यावेळी साधारण १९८५ पर्यंत नळाद्वारे गावकºयांना पाणी मिळत होते, असे माजी सरपंच भीमराव तगारे यांनी सांगितले. त्यानंतर पाऊस कमी झाला, पाईपलाईन तूटफुट झाली व नळाद्वारे पाणीपुरवठा बंद झाला. २००३-०४ मध्ये पुन्हा गरजेनुसार गावात पाईपलाईन टाकण्यात आली, तसेच रानमसले शिवारात विहीर घेतली. यानंतरही गावकºयांचे पाण्याचे भोग संपले नाहीत. गेल्या ३३-३४ वर्षांपासून आजपर्यंत नळाला पाणी आले नाही. गावाच्या तीन बाजूला तीन आड आहेत. त्या आडात पावसाळ्यात बीबीदारफळ येथील पाणीपुरवठा विहिरीचे तर उन्हाळ्यात टँकरचे पाणी सोडले जाते. संपूर्ण गावकरी (महिला-पुरुष) आडाचे बारा महिने पाणी शेंदूनच तहान भागवितात.

बीबीदारफळ तलावात विहीर खोदण्यास परवानगी मिळाली तरच आमच्या गावचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. याशिवाय शिरापूर उपसा सिंचनचे पाणी तलावात सोडले पाहिजे. टँकरवर खर्च करण्यापेक्षा उपसा सिंचनाचे पाणी तलावात सोडले असते तर पाण्याची गरज भागली असती.-नितीन गरड,माजी सरपंच, रानमसले

गाव पाणीदार करण्यासाठी...- गावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची अडचण दूर होण्यासाठी वॉटर कपमध्ये भाग घेऊन रानमसलेकर गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहेत. श्रमदान व मशीनद्वारे पाणी अडविण्याची कामे होतील. 

पाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न...- दर पाच वर्षांनी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीतरी सरपंच होतो व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. रानमसले परिसरातील वडाळा, नान्नज, अकोलेकाटी, गावडीदारफळ, बीबीदारफळ, पडसाळी या गावांची अशीच स्थिती आहे. एका गावात अनेक योजनांची कामे झाली, परंतु आज सर्वच गावे टँकरवर अवलंबून आहेत.

प्रति व्यक्ती १० लिटर पाणी २०११ च्या जनगणनेनुसार रानमसलेची लोकसंख्या ३७७७ इतकी आहे. आज चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला दररोज टँकरद्वारे ४० हजार लिटर पाणी दिले जाते. काहींना शेतातून पाणी आणणे सवईचे झाले आहे तर बºयाच कुटुंबांनी शेतात घर केले आहे तर गावकºयांना आडातून शेंदून खांद्यावर पाणी आणण्याची सवय झाली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater transportजलवाहतूकTemperatureतापमानagricultureशेती