शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; रानमसले गावात ३४ वर्षात एकदाही नळाला पाणी आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:20 IST

दुष्काळाचा झळा ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण, जनावरांना चारा, पाणी वेळेवर मिळेना़...

ठळक मुद्दे२०११ च्या जनगणनेनुसार रानमसलेची लोकसंख्या ३७७७ इतकी आहेआज चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला दररोज टँकरद्वारे ४० हजार लिटर पाणी दिले जाते.काहींना शेतातून पाणी आणणे सवईचे झाले आहे तर बºयाच कुटुंबांनी शेतात घर केले आहे

सोलापूर : साधारण चार हजार लोकसंख्येचे रानमसले गाव. काही भाग सोडला तर काळी कसदार जमीन. गावात मात्र पाणी शोधूनही मिळत नाही. दोन वेळा गावांतर्गत पाईपलाईन करूनही ३४ वर्षांत नळाला पाणी आले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावचा शेतकरी कांदा उत्पादन घेण्यात पटाईत. उन्हाळा संपत आला की, इथला शेतकरी लागतो कांदा पिकाच्या कामाला. कमी कालावधीत अधिक उत्पादन काढण्याची खासियत रानमसलेकरांना जमली आहे. एखादे वर्ष चांगले, मात्र पाऊस नसल्याची मोठी अडचण सातत्याची. आॅगस्ट, सप्टेंबर किंवा कधी-कधी परतीचा आॅक्टोबरचा पाऊस या भागात पडतो. कसाबसा डिसेंबर महिना संपला की, गावाची टँकरची मागणी सुरू होते.

फारच कठीण परिस्थितीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात टँकर सुरू करावाच लागतो. गावच्या शिवारात पाणी लागत नसल्याने बीबीदारफळ साठवण तलावाच्या खाली रानमसलेसाठी विहीर खोदली आहे. बीबीदारफळच्या साठवण तलावात पाणी असेल तरच टँकर सुरू करण्याची गरज भासत नाही. बीबीदारफळ तलावात पाणी असले तरी पुरेसे पाणी मिळत नाही, मात्र जेमतेम पाणी मिळते, असे राजाराम गरड यांनी सांगितले. 

साधारण १९८८-८९ मध्ये विहीर पाईपलाईन व गावांतर्गत पाईपलाईन करण्यात आली. त्यावेळी साधारण १९८५ पर्यंत नळाद्वारे गावकºयांना पाणी मिळत होते, असे माजी सरपंच भीमराव तगारे यांनी सांगितले. त्यानंतर पाऊस कमी झाला, पाईपलाईन तूटफुट झाली व नळाद्वारे पाणीपुरवठा बंद झाला. २००३-०४ मध्ये पुन्हा गरजेनुसार गावात पाईपलाईन टाकण्यात आली, तसेच रानमसले शिवारात विहीर घेतली. यानंतरही गावकºयांचे पाण्याचे भोग संपले नाहीत. गेल्या ३३-३४ वर्षांपासून आजपर्यंत नळाला पाणी आले नाही. गावाच्या तीन बाजूला तीन आड आहेत. त्या आडात पावसाळ्यात बीबीदारफळ येथील पाणीपुरवठा विहिरीचे तर उन्हाळ्यात टँकरचे पाणी सोडले जाते. संपूर्ण गावकरी (महिला-पुरुष) आडाचे बारा महिने पाणी शेंदूनच तहान भागवितात.

बीबीदारफळ तलावात विहीर खोदण्यास परवानगी मिळाली तरच आमच्या गावचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. याशिवाय शिरापूर उपसा सिंचनचे पाणी तलावात सोडले पाहिजे. टँकरवर खर्च करण्यापेक्षा उपसा सिंचनाचे पाणी तलावात सोडले असते तर पाण्याची गरज भागली असती.-नितीन गरड,माजी सरपंच, रानमसले

गाव पाणीदार करण्यासाठी...- गावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची अडचण दूर होण्यासाठी वॉटर कपमध्ये भाग घेऊन रानमसलेकर गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहेत. श्रमदान व मशीनद्वारे पाणी अडविण्याची कामे होतील. 

पाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न...- दर पाच वर्षांनी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीतरी सरपंच होतो व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. रानमसले परिसरातील वडाळा, नान्नज, अकोलेकाटी, गावडीदारफळ, बीबीदारफळ, पडसाळी या गावांची अशीच स्थिती आहे. एका गावात अनेक योजनांची कामे झाली, परंतु आज सर्वच गावे टँकरवर अवलंबून आहेत.

प्रति व्यक्ती १० लिटर पाणी २०११ च्या जनगणनेनुसार रानमसलेची लोकसंख्या ३७७७ इतकी आहे. आज चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला दररोज टँकरद्वारे ४० हजार लिटर पाणी दिले जाते. काहींना शेतातून पाणी आणणे सवईचे झाले आहे तर बºयाच कुटुंबांनी शेतात घर केले आहे तर गावकºयांना आडातून शेंदून खांद्यावर पाणी आणण्याची सवय झाली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater transportजलवाहतूकTemperatureतापमानagricultureशेती