शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

धक्कादायक; सोलापूर जिल्हा परिषदेने दाखविला जिल्हाधिकारी कार्यालयास ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 11:58 IST

अर्धवट दिली माहिती; प्रधानमंत्री नाविन्यपूर्ण पुरस्कार सादरीकरणास असहकार्य

सोलापूर : काम करायचे आम्ही आणि पुरस्कार घ्यायचा तुम्ही असा काहीसा सवतीमत्सर जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी केल्याचे दिसून येत आहे. लोकसहभागातून जलयुक्त शिवारासाठी सोलापूर जिल्ह्याचे नाव प्रधानमंत्री नाविन्यपूण पुरस्काराच्या सादरीकरणासाठी आले आहे. याचे कौतुक होत असतानाच आता माहिती गोळा करण्यासाठी कृषी अधिकाºयांची दमछाक होत आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील कायम दुष्काळी व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख अनेक वर्षापासून आहे. पण उजनी धरण झाल्यानंतर याच जिल्ह्यात सहकारनंतर खाजगी मालकीचे सर्वाधिक साखर कारखाने झाले.

लोकसहभागातून जलयुक्त शिवार, वॉटरकप स्पर्धा असे विविध उपक्रम गेल्या पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात झाले. पाणी अडवा व पाणी जिरवा या मोहिमेत महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेमार्फत बांधबंधिस्ती, नालाखोलीकरण, तलावातून गाळ काढणे अशा मोहिमा राबविल्या गेल्या. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, राजेंद्र भोसले यांनी या मोहीमेला गती दिली. लोकसहभागातून टंचाई मुक्तीसाठी सोलापूर जिल्ह्याने केलेल्या या प्रयोगाचा प्रस्ताव कृषी विभागाने प्रधानमंत्री नाविन्यपूण पुरस्कारासाठी सादर केला होता. 

केंद्र सरकारने या प्रस्तावाची दखल घेतली आहे. केंद्र सरकारतर्फे देशातील उत्कृष्ठ जिल्हाधिकाºयांना दिल्या जाणाºया प्रधानमंत्री पुरस्काराचे सादरीकरण करण्यासाठी देशातील १२ जिल्हाधिकाºयांच निवड केली आहे. या पुरस्कारासाठी देशपातळीवर दोन जिल्हाधिकाºयांची निवड होणार आहे. यात सोलापूरचा समावेश असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे या योजनेचे सादरीकरण करणार आहेत. यासाठी कृषी विभागाचे उप संचालक रवींद्र माने यांच्यावर जलसंधारण व इतर कामांची माहिती संकलीत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील गावांमध्ये झालेल्या जलसंधारण कामाची जिल्हा परिषदेकडून माहिती घेण्यासाठी माने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी संपर्क साधला. वायचळ यांनी तातडीने स्वच्छता व पाणी पुरवठ्याच्या अधिकाºयांना माहिती देण्याचे आदेश दिले. पण येथील संबंधीत अधिकाºयांनी केवळ सहा गावांची यादी दिली आहे. जिल्हा परिषदेने दाखविलेल्या या सापत्नभावाच्या वागणुकीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

मुंडे यांनी दिली माहितीया सादरीकरणता सोलापूरच्या जिल्हाधिकाºयाची निवड व्हावी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी तहसीलदार पाटील यांना संपर्क साधून सादरीकरण उत्तम व्हावे म्हणून त्यावेळच्या कामाच्या टीप्स दिल्या. जिल्ह्यातील अनेक कामे त्यांच्या लक्षात असल्याबाबत अधिकाºयांनाही नवल वाटले. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही टँकरमुक्तीबाबत माहिती पुरविली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद