शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

धक्कादायक; अक्कलकोटमध्ये महिलेसह विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:31 IST

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुस्त; अक्कलकोट तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली

ठळक मुद्देअक्कलकोट शहर व तालुक्यात काही भागांमध्ये डेंग्यूने थैमान घातलेअक्कलकोट तालुक्यात ५०० हून अधिक लोकांना हा आजार जडलाडेंग्यू आजारामुळे शरीरातील पेशी कमी होऊन उपचार घेणाºया रुग्णांची संख्या वाढली

अक्कलकोट : शहर व तालुक्यात काही भागांमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे़ परिणामत: समर्थ नगर येथील एका ४० वर्षीय महिलेचा आणि अकरावीमध्ये शिकणाºया विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तालुक्यात ५०० हून अधिक लोकांना हा आजार जडला आहे. हे रुग्ण विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या साºया घडामोडीत आरोग्य यंंत्रणा मात्र सुस्त बनली असल्याचा आरोप सर्वसामान्यातून होतोय.

विवाहित महिला रेशमा सदाशिव म्हेत्री (वय ४०) आणि विजयालक्ष्मी राजेंद्र कोळी (वय १८) अशी मरण पावलेल्या दोघींची नावे असून तीन दिवसांपूर्वी या दोघींचा मृत्यू झाला़ मयत विजयालक्ष्मी ही ११ वी वर्गात कॉमर्स शाखेला शिकत होती. डेंग्यूची लागण झाल्यानंतर या दोघींना सोलापूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ या दोघीही अक्कलकोट तालुक्यात समर्थ नगर येथील रहिवासी आहेत.

तालुक्यात डेंग्यू आजारामुळे शरीरातील पेशी कमी होऊन उपचार घेणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. पाय पसरलेल्या या आजारावर उपाययोजना करण्यात नगरपालिका व आरोग्य विभाग यंत्रणा कुचकामी ठरली आहे. या जीवघेण्या आजारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजनेची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मागील १५ दिवसांत अक्कलकोट शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वत्र पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. डास मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नगरपालिका, संबंधित ग्रामपंचायती यांनी फवारणी, फॉगिंग करणे, घरोघरी फिरून पाण्याच्या साठवण टाकीत औषध टाकणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. रुग्णालयात औषधसाठ्याचा आढाावा घेण्याची आवश्यक्ता आहे़ आरोग्य प्रशासनाच्या कुठल्याच हालचाली दिसत नाहीत़ हत्तीरोग कार्यालयाकडून उघड्या गटारीवर फवारणी होत नाही़ ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय, खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे  

या भागात वाढले आहेत रुग्ण- शिवाजीनगर तांडा, म्हेत्रे नगर, समर्थनगर,माणिक पेठ, खासबाग, संजय नगर, इंदिरा नगर, भीमनगर, नाईकवाडी गल्ली, बागवान गल्ली अशा विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. अलीक डे या भागातून या रुग्णांची संख्या वाढत चालली असून या ठिक ाणी आरोग्य यंत्रणेने धुराळणी, फवारणी आणि उपाययोजना सुरू केलेल्या दिसत नाहीत़

टंचाईमुळे बरेच लोक पाणी साठवून ठेवतात. किमान आठ दिवसातून एकदा तरी कोरडा दिवस पाळला पाहिजे़ आरोग्य कर्मचारी, नगरपालिका, ग्रामपंचायत, हत्तीरोग कार्यालय यांनी आपापल्या पातळीवर यंत्रणा राबवावी. विशेषत: फॉगिंग, फवारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनीसुद्धा डेंग्यू होऊ नये म्हणून परिसरातील साचलेले पाणी निकामी करावे. अशा प्रकारेच रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण रुग्णालयात सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ - डॉ अशोक राठोडअधीक्षक, ग्रामीण रुग्णालय 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयdengueडेंग्यूDeathमृत्यू