शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानप्रमाणे शिवसेना फसवी : नितेश राणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:54 IST

सोलापूर : अतिरेक्या कारवायांच्या बाबतीत पाकिस्तानने वारंवार फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली आहे, हीच भावना आमची शिवसेनेबद्दल आहे, अशी ...

ठळक मुद्देपाकिस्तानबद्दल खेळाडूंची भूमिका योग्य - नितेश राणेआता राम मंदिरचा प्रश्न बाजूला सारून अतिरेकी कारवायाबाबत भूमिका पुढे - नितेश राणेशिवसेनेने जनतेला मुर्ख समजू नये - नितेश राणे

सोलापूर: अतिरेक्या कारवायांच्या बाबतीत पाकिस्तानने वारंवार फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली आहे, हीच भावना आमची शिवसेनेबद्दल आहे, अशी टीका स्वाभिमानी पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी दुपारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.

स्वाभिमानी पक्षाची बांधणी करण्यासाठी आमदार नितेश राणे शनिवारी दुपारी सोलापूर दौºयावर आले आहेत. आगमन झाल्यावर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप-शिवसेना युतीवर बोलताना राणे म्हणाले की, कोकणात शिवसेनेच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन भाजपवर टीका केली होती. अन आता युती झाल्यावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजप नेत्यांबरोबर फोटोसेशन करण्यात मग्न आहेत.

पाच वर्षे  सत्तेत असताना शिवसेनेने कोणते प्रश्न सोडविले असा सवाल त्यांनी केला़ धनगर आरक्षणाबद्दल का न्याय दिला नाही. आता राम मंदिरचा प्रश्न बाजूला सारून अतिरेकी कारवायाबाबत भूमिका पुढे करीत आहेत. याचाच अर्थ शिवसेनेची विश्वासार्हता संपली आहे. शिवसेनेने जनतेला मुर्ख समजू नये. आपण कोठेही गेले तरी ही जनता आपल्याबरोबर फरफटत येईल असे त्यांना वाटत असेल. पण हीच जनता त्यांना खड्यासारखे बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीनंतरभाजपलाही याबाबत पश्चाताप होईल.

अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने मराठा जनतेला फसविले आहे. आत्तापर्यंत एकाही तरुणाला बँकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे आता बँका फोडण्याची वेळ आली आहे. याबाबत आम्ही बँकेच्या अधिकाºयांना जाब विचारला तर सरकारने कर्ज देण्याबाबत आम्हाला बंधनकारक केले नाही अशी उत्तरे दिली जात आहेत. ही मराठा समाजाची फसवणूक आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने काढून घेतले. या प्रश्नावर स्वाभिमानी पक्ष आवाज उठविणार आहे असे नितेश राणे म्हणाले.

पाकिस्तानबद्दल खेळाडूंची भूमिका योग्यपाकिस्तानला मैदानात खेळात हरविले पाहिजे असे  माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर व सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेले मत योग्य असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. भारतीय खेळाडू निश्चितपणे पाकिस्तानी खेळाडूंचा पराभव करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे त्यांचे पडलेले चेहरे पाहण्यासारखे असतील.

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाPakistanपाकिस्तानNitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे