शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाकिस्तानप्रमाणे शिवसेना फसवी : नितेश राणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:54 IST

सोलापूर : अतिरेक्या कारवायांच्या बाबतीत पाकिस्तानने वारंवार फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली आहे, हीच भावना आमची शिवसेनेबद्दल आहे, अशी ...

ठळक मुद्देपाकिस्तानबद्दल खेळाडूंची भूमिका योग्य - नितेश राणेआता राम मंदिरचा प्रश्न बाजूला सारून अतिरेकी कारवायाबाबत भूमिका पुढे - नितेश राणेशिवसेनेने जनतेला मुर्ख समजू नये - नितेश राणे

सोलापूर: अतिरेक्या कारवायांच्या बाबतीत पाकिस्तानने वारंवार फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली आहे, हीच भावना आमची शिवसेनेबद्दल आहे, अशी टीका स्वाभिमानी पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी दुपारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.

स्वाभिमानी पक्षाची बांधणी करण्यासाठी आमदार नितेश राणे शनिवारी दुपारी सोलापूर दौºयावर आले आहेत. आगमन झाल्यावर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप-शिवसेना युतीवर बोलताना राणे म्हणाले की, कोकणात शिवसेनेच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन भाजपवर टीका केली होती. अन आता युती झाल्यावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजप नेत्यांबरोबर फोटोसेशन करण्यात मग्न आहेत.

पाच वर्षे  सत्तेत असताना शिवसेनेने कोणते प्रश्न सोडविले असा सवाल त्यांनी केला़ धनगर आरक्षणाबद्दल का न्याय दिला नाही. आता राम मंदिरचा प्रश्न बाजूला सारून अतिरेकी कारवायाबाबत भूमिका पुढे करीत आहेत. याचाच अर्थ शिवसेनेची विश्वासार्हता संपली आहे. शिवसेनेने जनतेला मुर्ख समजू नये. आपण कोठेही गेले तरी ही जनता आपल्याबरोबर फरफटत येईल असे त्यांना वाटत असेल. पण हीच जनता त्यांना खड्यासारखे बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीनंतरभाजपलाही याबाबत पश्चाताप होईल.

अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने मराठा जनतेला फसविले आहे. आत्तापर्यंत एकाही तरुणाला बँकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे आता बँका फोडण्याची वेळ आली आहे. याबाबत आम्ही बँकेच्या अधिकाºयांना जाब विचारला तर सरकारने कर्ज देण्याबाबत आम्हाला बंधनकारक केले नाही अशी उत्तरे दिली जात आहेत. ही मराठा समाजाची फसवणूक आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने काढून घेतले. या प्रश्नावर स्वाभिमानी पक्ष आवाज उठविणार आहे असे नितेश राणे म्हणाले.

पाकिस्तानबद्दल खेळाडूंची भूमिका योग्यपाकिस्तानला मैदानात खेळात हरविले पाहिजे असे  माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर व सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेले मत योग्य असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. भारतीय खेळाडू निश्चितपणे पाकिस्तानी खेळाडूंचा पराभव करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे त्यांचे पडलेले चेहरे पाहण्यासारखे असतील.

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाPakistanपाकिस्तानNitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे