शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

पाकिस्तानप्रमाणे शिवसेना फसवी : नितेश राणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:54 IST

सोलापूर : अतिरेक्या कारवायांच्या बाबतीत पाकिस्तानने वारंवार फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली आहे, हीच भावना आमची शिवसेनेबद्दल आहे, अशी ...

ठळक मुद्देपाकिस्तानबद्दल खेळाडूंची भूमिका योग्य - नितेश राणेआता राम मंदिरचा प्रश्न बाजूला सारून अतिरेकी कारवायाबाबत भूमिका पुढे - नितेश राणेशिवसेनेने जनतेला मुर्ख समजू नये - नितेश राणे

सोलापूर: अतिरेक्या कारवायांच्या बाबतीत पाकिस्तानने वारंवार फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली आहे, हीच भावना आमची शिवसेनेबद्दल आहे, अशी टीका स्वाभिमानी पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी दुपारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.

स्वाभिमानी पक्षाची बांधणी करण्यासाठी आमदार नितेश राणे शनिवारी दुपारी सोलापूर दौºयावर आले आहेत. आगमन झाल्यावर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप-शिवसेना युतीवर बोलताना राणे म्हणाले की, कोकणात शिवसेनेच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन भाजपवर टीका केली होती. अन आता युती झाल्यावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजप नेत्यांबरोबर फोटोसेशन करण्यात मग्न आहेत.

पाच वर्षे  सत्तेत असताना शिवसेनेने कोणते प्रश्न सोडविले असा सवाल त्यांनी केला़ धनगर आरक्षणाबद्दल का न्याय दिला नाही. आता राम मंदिरचा प्रश्न बाजूला सारून अतिरेकी कारवायाबाबत भूमिका पुढे करीत आहेत. याचाच अर्थ शिवसेनेची विश्वासार्हता संपली आहे. शिवसेनेने जनतेला मुर्ख समजू नये. आपण कोठेही गेले तरी ही जनता आपल्याबरोबर फरफटत येईल असे त्यांना वाटत असेल. पण हीच जनता त्यांना खड्यासारखे बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीनंतरभाजपलाही याबाबत पश्चाताप होईल.

अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने मराठा जनतेला फसविले आहे. आत्तापर्यंत एकाही तरुणाला बँकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे आता बँका फोडण्याची वेळ आली आहे. याबाबत आम्ही बँकेच्या अधिकाºयांना जाब विचारला तर सरकारने कर्ज देण्याबाबत आम्हाला बंधनकारक केले नाही अशी उत्तरे दिली जात आहेत. ही मराठा समाजाची फसवणूक आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने काढून घेतले. या प्रश्नावर स्वाभिमानी पक्ष आवाज उठविणार आहे असे नितेश राणे म्हणाले.

पाकिस्तानबद्दल खेळाडूंची भूमिका योग्यपाकिस्तानला मैदानात खेळात हरविले पाहिजे असे  माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर व सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेले मत योग्य असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. भारतीय खेळाडू निश्चितपणे पाकिस्तानी खेळाडूंचा पराभव करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे त्यांचे पडलेले चेहरे पाहण्यासारखे असतील.

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाPakistanपाकिस्तानNitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे