शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

शिवरायांच्या पाऊलखुणा.. छत्रपतींनी तीनवेळा केला सोलापूर जिल्ह्यातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:46 IST

प्रभू पुजारी ।  पंढरपूर : मिर्झाराजे यांच्यासोबत विजापूरच्या आदिलशाह विरोधातील संयुक्त मोहिमेप्रसंगी, जालना मोहिमेला जाताना आणि राज्याभिषेक झाल्यानंतर कुतूबशाहाच्या ...

ठळक मुद्देज्येष्ठ इतिहासकार गोपाळराव देशमुख यांनी मांडली शिवरायांच्या सोलापूर मोहिमेची गाथा१९ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे या दोघांनी मंगळवेढ्याच्या किल्ल्याची पाहणी केलीशिवाजी महाराज तेव्हा मंगळवेढ्यात आल्याची अधिकृत नोंद

प्रभू पुजारी । 

पंढरपूर : मिर्झाराजे यांच्यासोबत विजापूरच्या आदिलशाह विरोधातील संयुक्त मोहिमेप्रसंगी, जालना मोहिमेला जाताना आणि राज्याभिषेक झाल्यानंतर कुतूबशाहाच्या भेटीला जाताना अशा तीन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचासोलापूर जिल्ह्यातून प्रवास झाल्याची माहिती ज्येष्ठ इतिहासकार गोपाळराव देशमुख यांनी दिली.

१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला गोपाळराव देशमुख यांच्याशी संवाद साधून छत्रपती शिवाजी महाराज आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहीम याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ त्यांनी शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील चित्तथरारक आणि अंगावर शहारे आणणारे बारकावे सांगितले.

१६६५ साली पुरंदरचा तह झाल्यानंतर शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे यांनी आदिलशाहच्या विरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली़ तेव्हा शिवाजी महाराजांसोबत नेताजी पालकर होते तर मिर्झाराजे यांच्यासोबत दिलेरखान पठाण सरदार होते़ नेताजी पालकर आघाडीला असल्याने त्यांनी प्रथम फलटण ताब्यात घेतले़ त्यानंतर फलटणजवळीलच नाथवडा किल्ला ताब्यात घेतला़ त्यानंतर पिलीव (ता़ माळशिरस), भाळवणी, पंढरपूर, कासेगावमार्गे मंगळवेढ्याकडे रवाना झाले़ १८ डिसेंबर १६६५ साली मंगळवेढ्याच्या अलीकडे एक मजल आले़ तेथील माण नदीच्या तीरावर तळ टाकला, मात्र नेताजी पालकर यांनी पुढे जाऊन मंगळवेढ्याचा किल्ला ताब्यात घेतला.

मंगळवेढ्याचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांची फौज व मोगलाईची फौज मंगळवेढ्याच्या किल्ल्याजवळ (कृष्ण तलाव येथे) होती़ दिलेरखानाच्या मनातील हेतू शिवाजी महाराजांना समजल्यामुळे त्यांनी पन्हाळा मोहीम हाती घेण्याची मागणी केली आणि ती मंजूर करून घेतली़ मंजुरी मिळाल्यानंतर ११ जानेवारी १६६६ रोजी शिवाजी महाराज पन्हाळा मोहिमेसाठी निघून गेले़ म्हणजेच १८ डिसेंबर ते ११ जानेवारी असे जवळपास २५ दिवस शिवाजी महाराज मंगळवेढ्यात तळ ठोकून होते.

मोगलाईच्या मुलखाची जालना शहरावर स्वारी करण्यासाठी शिवाजी महाराज हे सोबत ८ ते ९ हजारांची फौज घेऊन निघाले होते़ तेव्हा त्यांचा प्रवास सांगोला, कासेगाव भीमा नदी ओलांडून जालन्याकडे झाला. त्यांच्यासोबत भाळवणीचे सरलष्कर सिद्धूजीराव नाईक-निंबाळकर होते, अशी दुसरी नोंद आहे.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते कुतूबशाहांची भेट घेण्यासाठी भागानगरला (हैदराबाद) गेले होते, मात्र कोणत्या मार्गाने याची नोंद इतिहासात नाही, पण भारत संशोधन इतिहास मंडळाच्या एका त्रैमासिकात याचा नकाशा दिला आहे़ त्यानुसार मंगळवेढ्यामार्गे भागानगरला गेले असावेत़ यावेळी त्यांच्या स्वारीचा थाट वेगळाच होता़ शस्त्रे, दारुगोळा, हत्ती, घोडे, उंट, सोबत सैन्य असा लवाजमा होता.

१९ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे या दोघांनी मंगळवेढ्याच्या किल्ल्याची पाहणी केली. शिवाजी महाराज तेव्हा मंगळवेढ्यात आल्याची अधिकृत नोंद असल्याचे गोपाळराव देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८