शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
5
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
6
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
7
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
8
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
9
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
10
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
11
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
12
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
13
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
14
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
15
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
16
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
17
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
18
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
19
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
20
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."

शिवरायांच्या पाऊलखुणा.. छत्रपतींनी तीनवेळा केला सोलापूर जिल्ह्यातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:46 IST

प्रभू पुजारी ।  पंढरपूर : मिर्झाराजे यांच्यासोबत विजापूरच्या आदिलशाह विरोधातील संयुक्त मोहिमेप्रसंगी, जालना मोहिमेला जाताना आणि राज्याभिषेक झाल्यानंतर कुतूबशाहाच्या ...

ठळक मुद्देज्येष्ठ इतिहासकार गोपाळराव देशमुख यांनी मांडली शिवरायांच्या सोलापूर मोहिमेची गाथा१९ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे या दोघांनी मंगळवेढ्याच्या किल्ल्याची पाहणी केलीशिवाजी महाराज तेव्हा मंगळवेढ्यात आल्याची अधिकृत नोंद

प्रभू पुजारी । 

पंढरपूर : मिर्झाराजे यांच्यासोबत विजापूरच्या आदिलशाह विरोधातील संयुक्त मोहिमेप्रसंगी, जालना मोहिमेला जाताना आणि राज्याभिषेक झाल्यानंतर कुतूबशाहाच्या भेटीला जाताना अशा तीन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचासोलापूर जिल्ह्यातून प्रवास झाल्याची माहिती ज्येष्ठ इतिहासकार गोपाळराव देशमुख यांनी दिली.

१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला गोपाळराव देशमुख यांच्याशी संवाद साधून छत्रपती शिवाजी महाराज आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहीम याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ त्यांनी शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील चित्तथरारक आणि अंगावर शहारे आणणारे बारकावे सांगितले.

१६६५ साली पुरंदरचा तह झाल्यानंतर शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे यांनी आदिलशाहच्या विरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली़ तेव्हा शिवाजी महाराजांसोबत नेताजी पालकर होते तर मिर्झाराजे यांच्यासोबत दिलेरखान पठाण सरदार होते़ नेताजी पालकर आघाडीला असल्याने त्यांनी प्रथम फलटण ताब्यात घेतले़ त्यानंतर फलटणजवळीलच नाथवडा किल्ला ताब्यात घेतला़ त्यानंतर पिलीव (ता़ माळशिरस), भाळवणी, पंढरपूर, कासेगावमार्गे मंगळवेढ्याकडे रवाना झाले़ १८ डिसेंबर १६६५ साली मंगळवेढ्याच्या अलीकडे एक मजल आले़ तेथील माण नदीच्या तीरावर तळ टाकला, मात्र नेताजी पालकर यांनी पुढे जाऊन मंगळवेढ्याचा किल्ला ताब्यात घेतला.

मंगळवेढ्याचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांची फौज व मोगलाईची फौज मंगळवेढ्याच्या किल्ल्याजवळ (कृष्ण तलाव येथे) होती़ दिलेरखानाच्या मनातील हेतू शिवाजी महाराजांना समजल्यामुळे त्यांनी पन्हाळा मोहीम हाती घेण्याची मागणी केली आणि ती मंजूर करून घेतली़ मंजुरी मिळाल्यानंतर ११ जानेवारी १६६६ रोजी शिवाजी महाराज पन्हाळा मोहिमेसाठी निघून गेले़ म्हणजेच १८ डिसेंबर ते ११ जानेवारी असे जवळपास २५ दिवस शिवाजी महाराज मंगळवेढ्यात तळ ठोकून होते.

मोगलाईच्या मुलखाची जालना शहरावर स्वारी करण्यासाठी शिवाजी महाराज हे सोबत ८ ते ९ हजारांची फौज घेऊन निघाले होते़ तेव्हा त्यांचा प्रवास सांगोला, कासेगाव भीमा नदी ओलांडून जालन्याकडे झाला. त्यांच्यासोबत भाळवणीचे सरलष्कर सिद्धूजीराव नाईक-निंबाळकर होते, अशी दुसरी नोंद आहे.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते कुतूबशाहांची भेट घेण्यासाठी भागानगरला (हैदराबाद) गेले होते, मात्र कोणत्या मार्गाने याची नोंद इतिहासात नाही, पण भारत संशोधन इतिहास मंडळाच्या एका त्रैमासिकात याचा नकाशा दिला आहे़ त्यानुसार मंगळवेढ्यामार्गे भागानगरला गेले असावेत़ यावेळी त्यांच्या स्वारीचा थाट वेगळाच होता़ शस्त्रे, दारुगोळा, हत्ती, घोडे, उंट, सोबत सैन्य असा लवाजमा होता.

१९ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे या दोघांनी मंगळवेढ्याच्या किल्ल्याची पाहणी केली. शिवाजी महाराज तेव्हा मंगळवेढ्यात आल्याची अधिकृत नोंद असल्याचे गोपाळराव देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८