शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला 2016 मध्येच नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:30 IST

देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी

ठळक मुद्देआगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांची आघाडी होणार : शरद पवार देशाला फसवून पळालेले सर्वजण भाजपा समर्थक : शरद पवारदेशाचे आर्थिक लुट करणारे सत्ताधारी भाजपाचे समर्थक : शरद पवार

सोलापूर : देशात सर्वात मोठी लूट करणाऱ्या नीरव मोदीच्या घोटाळ्याची लेखी तक्रार देशातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने प्रधानमंत्री कार्यालयात केली होती. मात्र, जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नीरव मोदीला वाचवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.नीरव मोदी प्रकरणी मनमोहन सरकारवर आरोप केले जात असले तरी नीरव याने २०११ मध्ये फक्त बँक खाते उघडले होते आणि बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचा आरोप पवार यांनी केला. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने नीरव मोदी देशाला फसवून पळून जाण्यात यशस्वी ठरला, असेही पवार म्हणाले. देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, आ. हणमंतराव डोळस, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. दत्तात्रय सावंत, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आ़ दीपक साळुंखे, विनायकराव पाटील, दिलीप माने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, बाळासाहेब शेळके, युवराज पाटील, मनपा विरोधी पक्षनेता चेतन नरोटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी हा ११ हजार कोटी घेऊन गेला. तो गेल्यानंतर आता सरकार म्हणते की, त्याचा पासपोर्ट रद्द करू. २०१६ साली पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे आम्ही कळविले होते. त्यावेळी चौकशी करून कारवाई करू, असे आम्हाला सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर शेतकऱ्यांची बँकेची ४-५ हजारांची थकबाकी राहिली तर भांडी बाहेर काढली जातात. त्याच्या अब्रुचा पंचनामा केला जातो. हे कसले राज्यकर्ते?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात तांदळाच्या निर्यातीत भारत जगात एक नंबर होता. तसेच गहू आणि कापसाच्या निर्यातीत भारताचे स्थान दुसरे होते. सध्या अर्थव्यवस्था ढासळण्यामागे शेतमालाला योग्य भाव न मिळणे, हे प्रमुख कारण आहे. शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागला आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारNirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा