शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

भाजपाला 2016 मध्येच नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:30 IST

देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी

ठळक मुद्देआगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांची आघाडी होणार : शरद पवार देशाला फसवून पळालेले सर्वजण भाजपा समर्थक : शरद पवारदेशाचे आर्थिक लुट करणारे सत्ताधारी भाजपाचे समर्थक : शरद पवार

सोलापूर : देशात सर्वात मोठी लूट करणाऱ्या नीरव मोदीच्या घोटाळ्याची लेखी तक्रार देशातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने प्रधानमंत्री कार्यालयात केली होती. मात्र, जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नीरव मोदीला वाचवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.नीरव मोदी प्रकरणी मनमोहन सरकारवर आरोप केले जात असले तरी नीरव याने २०११ मध्ये फक्त बँक खाते उघडले होते आणि बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचा आरोप पवार यांनी केला. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने नीरव मोदी देशाला फसवून पळून जाण्यात यशस्वी ठरला, असेही पवार म्हणाले. देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, आ. हणमंतराव डोळस, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. दत्तात्रय सावंत, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आ़ दीपक साळुंखे, विनायकराव पाटील, दिलीप माने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, बाळासाहेब शेळके, युवराज पाटील, मनपा विरोधी पक्षनेता चेतन नरोटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी हा ११ हजार कोटी घेऊन गेला. तो गेल्यानंतर आता सरकार म्हणते की, त्याचा पासपोर्ट रद्द करू. २०१६ साली पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे आम्ही कळविले होते. त्यावेळी चौकशी करून कारवाई करू, असे आम्हाला सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर शेतकऱ्यांची बँकेची ४-५ हजारांची थकबाकी राहिली तर भांडी बाहेर काढली जातात. त्याच्या अब्रुचा पंचनामा केला जातो. हे कसले राज्यकर्ते?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात तांदळाच्या निर्यातीत भारत जगात एक नंबर होता. तसेच गहू आणि कापसाच्या निर्यातीत भारताचे स्थान दुसरे होते. सध्या अर्थव्यवस्था ढासळण्यामागे शेतमालाला योग्य भाव न मिळणे, हे प्रमुख कारण आहे. शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागला आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारNirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा