शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपाला 2016 मध्येच नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:30 IST

देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी

ठळक मुद्देआगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांची आघाडी होणार : शरद पवार देशाला फसवून पळालेले सर्वजण भाजपा समर्थक : शरद पवारदेशाचे आर्थिक लुट करणारे सत्ताधारी भाजपाचे समर्थक : शरद पवार

सोलापूर : देशात सर्वात मोठी लूट करणाऱ्या नीरव मोदीच्या घोटाळ्याची लेखी तक्रार देशातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने प्रधानमंत्री कार्यालयात केली होती. मात्र, जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नीरव मोदीला वाचवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.नीरव मोदी प्रकरणी मनमोहन सरकारवर आरोप केले जात असले तरी नीरव याने २०११ मध्ये फक्त बँक खाते उघडले होते आणि बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचा आरोप पवार यांनी केला. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने नीरव मोदी देशाला फसवून पळून जाण्यात यशस्वी ठरला, असेही पवार म्हणाले. देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, आ. हणमंतराव डोळस, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. दत्तात्रय सावंत, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आ़ दीपक साळुंखे, विनायकराव पाटील, दिलीप माने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, बाळासाहेब शेळके, युवराज पाटील, मनपा विरोधी पक्षनेता चेतन नरोटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी हा ११ हजार कोटी घेऊन गेला. तो गेल्यानंतर आता सरकार म्हणते की, त्याचा पासपोर्ट रद्द करू. २०१६ साली पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे आम्ही कळविले होते. त्यावेळी चौकशी करून कारवाई करू, असे आम्हाला सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर शेतकऱ्यांची बँकेची ४-५ हजारांची थकबाकी राहिली तर भांडी बाहेर काढली जातात. त्याच्या अब्रुचा पंचनामा केला जातो. हे कसले राज्यकर्ते?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात तांदळाच्या निर्यातीत भारत जगात एक नंबर होता. तसेच गहू आणि कापसाच्या निर्यातीत भारताचे स्थान दुसरे होते. सध्या अर्थव्यवस्था ढासळण्यामागे शेतमालाला योग्य भाव न मिळणे, हे प्रमुख कारण आहे. शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागला आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारNirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा