शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आझादी के सत्तर साल बाद अब हम आझाद हुए !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 15:40 IST

सोलापूर शहरातील काश्मिरी माथाडींच्या भावना

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : ‘पाजी, अपने देश को आझादी मिल के ७० साल हुए. लेकीन जम्मू-काश्मीर मे लोग आझादीसे जी नही पाते थे. आज वहाँसे कलम ३७० हटाया गया, ये हमारे लिए खुशी की बात तो है.़ लेकीन सबसे खुशी की बात तो ये है की, हम अब आझाद हुए’, या शब्दात गेल्या अनेक वर्षांपासून एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करणाºया काश्मीरमधील माथाडी कामगारांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. 

सोमवारी राज्यसभेत झालेल्या मतदानानंतर जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कलम हटवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करताना शहर आणि ग्रामीण भागात या निर्णयाचे स्वागत झाले. एकीकडे या निर्णयाबद्दल आनंदोत्सव होत असताना दुसरीकडे काश्मीरमधून सोलापुरात आलेल्या माथाडी कामगारांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करीत आनंदोत्सव साजरा केला. 

केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेऊन जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आता तेथील लोक यापुढील आयुष्य गुण्यागोविंदाने घालवतील.-ककूराम, बडूर, ता. रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.

कलम ३७० हटवण्यात आले. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सूर्य उगवणार आहे. या सूर्याला साक्षी मानून तेथील जनता भयमुक्त वातावरणात राहतील, याचा अधिक आनंद आहे.-पुशबकुमार, ब्राह्मणी, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.

गेली ७० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये होणाºया दहशतवादी हल्ल्यास लोक कंटाळले होते. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. आता ही मुले चांगले शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास वाटतो.- रविकुमार, पंज गारियन, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू. 

दहशतीच्या भीतीपोटी जम्मू-काश्मीरमधील अनेक जण पोटापाण्यासाठी इतरत्र गेलेले आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यावर आता तेथे रोजगार उपलब्ध होईल. बाहेर गेलेले पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये परततील.-हर्षराज, पंज गारियन, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू. 

टॅग्स :SolapurसोलापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Amit Shahअमित शहा