शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Good News; करमाळ्याच्या केळीची सातासमुद्री निर्यात; दररोज ५० कंटेनरची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:10 IST

उसाला निवडला पर्याय: २५ गावांतील शेतकºयांचा वाढला ओढा, वाशिंबेत युवा शेतकºयांचा पुढाकार..

ठळक मुद्दे वाशिंबे शिवारात ५०० एकर क्षेत्रात केळीच्या बागा उभ्या आहेतकरमाळा तालुक्यातील केळी परदेशात मुंबई येथील जेएनपीटीतून जहाजाने जातातकरमाळा तालुक्यातून इराण, इराक,रशिया,जपान, इटली, कुवेत या आखाती देशासह मुंबई, पुणे, हरियाणा, दिल्ली या शहरात केळी निर्यात होत आहेत

नासीर कबीरकरमाळा : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात उजनीच्या लाभक्षेत्रात कंदर, वांगी, चिखलठाण, बिटरगाव-वां, कुगाव, वाशिंबे, केत्तूर, पोमलवाडी, सोगाव, हिंगणी, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, खातगाव, उम्रड आदी २५ गावशिवारातील  शेतकरी ऊस पिकाला पर्याय म्हणून केळीचे उत्पादन घेऊ लागले असून, या भागात उत्पादित केळी सातासमुद्रापार चालली आहे.

करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील  पुनर्वसित शेतक ºयांनी ऊस पिकाला पर्याय म्हणून केळीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. उसाच्या गाळपासाठी शेतकºयाला प्रत्येक वर्षी कारखानदारांचे उंबरठे झिजवावे लागतात व उसाला भाव मिळत नसल्याने शेतकºयांना  मनस्ताप सहन करून आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ते टाळण्यासाठी शेतकरी केळीचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे.

सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडला तरी पुणे जिल्ह्यात पडणाºया पावसाने उजनी धरण शंभर टक्के भरते. त्याच्याच जोरावर उजनी पट्ट्यात केळीचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. करमाळा तालुक्यात उजनी लाभक्षेत्रात तीन हजार हेक्टर क्षेत्रात केळीचे उत्पादन घेतले गेले आहे. तालुक्यातून दररोज ५० ते ६० कंटेनर केळी विक्रीसाठी जात आहे. त्यामुळे ऊस पिकवणारा पट्टा आता केळीचे आगार म्हणून नावारुपाला येऊ पाहत आहे. करमाळा तालुक्यातून इराण, इराक,रशिया,जपान, इटली, कुवेत या आखाती देशासह मुंबई, पुणे, हरियाणा, दिल्ली या शहरात केळी निर्यात होत आहेत. विशिष्ट आकार व चवीची केळी उत्पादित होत असल्याने येथील केळींना मागणी आहे. केळी हे बाराही महिने चालणारे फळ असल्याने त्याला मोठी मागणी असते. करमाळा तालुक्यातील केळी परदेशात मुंबई येथील जेएनपीटीतून जहाजाने जातात.

वाशिंबेत युवा शेतकºयांचा पुढाकार..वाशिंबे येथे केळीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, वाशिंबे शिवारात ५०० एकर क्षेत्रात केळीच्या बागा उभ्या आहेत. शंकर निवृत्ती झोळ यांची केळी मलेशिया,इराण येथे निर्यात झालेली आहेत. शंकर झोळ यांनी तीन एकरात  १०० टन उत्पादन घेतले आहे. युवराज झोळ, संजय शिंदे,रणजित शिंदे,भाऊ झोळ हे युवा शेतकरी केळी पिकाकडे वळले आहेत. तालुक्यात सर्व प्रथम कंदरच्या शेतकºयांनी उसाला ब्रेक देऊन केळी पिकाकडे वळून निर्यातक्षम केळी तयार करून त्याची परदेशात विक्री केली. उसापेक्षा जास्त पैसा केळी पिकापासून मिळू लागल्याने युवा शेतकरी केळी पिकाकडे वळू लागले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारInternationalआंतरराष्ट्रीयfruitsफळेkarmala-acकरमाळा