शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सात हजार रेल्वे प्रवाशांनी केला विनामास्क प्रवास; १२ लाख ७२ हजाराचा दंड वसूल

By appasaheb.patil | Updated: June 3, 2021 16:31 IST

१२ लाख ७२ हजाराचा दंड वसूल - स्थानक अन् रेल्वेत थुंकणार्यांकडूनही वसूल केला दंड

सोलापूर - कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मध्य रेल्वेनेरेल्वे परिसरात आणि रेल्वे प्रवासात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालणार्यांकडून प्रत्येक व्यक्तींना ५०० रूपये दंड केला जात होता. मध्य रेल्वे विभागाने ५० दिवसात मास्क न घालणार्या ७ हजार १४३ जणांवर कारवाई करून १२ लाख ७२ हजार ८२५ रूपयांचा दंड वसूल केला आहे.

रेल्वे परिसरात किंवा रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळून आल्यास अथवा कुठेही थुंकण्यामुळे रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरेल. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. कोरोना काळात अस्वच्छता पसरविल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे मध्य रेल्वेने १७ एप्रिल रोजी मास्क न घालणार्याविरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले. त्यानंतर १७ एप्रिल ते ते २ जूनपर्यंत मास्क न घालणार्याविरोधात कारवाई केली. रेल्वे परिसर अथवा रेल्वेत असताना विनामास्क सापडल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसर अथवा रेल्वेत थुंकून परिसर अस्वच्छ केल्यासही ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी विना मास्क घातलेल्या प्रवाशांकडून दंड वसूली केली आहे.

विभागनिहाय कारवाई आणि दंडाची रक्कम

विभाग             केसेस             दंडाची रक्कम

  • मुंबई विभाग - १२६९ - २ लाख ४० हजार ६४५
  • भुसावळ - २९२८ - ३ लाख ५४ हजार १५०
  • नागपूर - १९५३ - ४ लाख २ हजार ३००
  • पुणे - ५२५ - १ लाख ६९ हजार ९८०
  • सोलापूर - ४६८ - १ लाख ५ हजार ७५०
  • एकूण - ७१४३ - १२ लाख ७२ हजार ८२५

 

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पालन करण्यात येत आहे. मास्क न घातलेल्यांवर कारवाईची मोहिम सुरू आहे. कोरोना संपेपर्यंत ही मोहिम अशीच सुरू राहणार आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

- शिवाजी सुतार, रेल्वे अधिकारी, मध्य रेल्वे विभाग.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या