शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोलापुरातील संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:05 IST

सोलापूर महापालिकेचे दुर्लक्ष; राणी लक्ष्मीबाई उद्यानाची दुरवस्था,  सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अडकली कागदात

ठळक मुद्देधर्मवीर संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा पडला असून, महापालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्षतलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अद्याप कागदी घोड्यांमध्ये अडकून पडलीसंभाजी तलाव हे शहरातील एक उत्तम पर्यटनस्थळ आणि पशुपक्ष्यांचा अधिवास असलेले ठिकाण

सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा पडला असून, महापालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. तलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अद्याप कागदी घोड्यांमध्ये अडकून पडली आहे. राणी लक्ष्मीबाई उद्यानाची दुरवस्था झाली आहे. संभाजी तलाव हे शहरातील एक उत्तम पर्यटनस्थळ आणि पशुपक्ष्यांचा अधिवास असलेले ठिकाण आहे.  ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी रविवारी तलाव परिसराची पाहणी केली. राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या बाजूने असलेल्या तलावाच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे.

उद्यानात गवत वाढले असून तलावाच्या काठावरील फूटपाथही खराब झाला आहे.  कठडे फुटलेले असून आजूबाजूला कचरा पडलेला होता. विसर्जन हौदांची कचरा कुंडी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील काही नागरिक या हौदात कचरा टाकत असल्याचे पाहायला मिळाले. तलावात जलपर्णीचा वेढा पडला असून पाण्यावर गवताचा गालीचा तयार झाल्याची स्थिती आहे. या जलपर्णीमुळे एरव्ही मुक्त विहार करणारे बगळे गायब होते. स्मृती वनाच्या बाजूला गवत आणि कचरा वाढला आहे.

केंद्रीय सरोवर संवर्धन योजनेतून संभाजी तलावाच्या सुशोभीकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेने दोनवेळा निविदा काढल्या. कंत्राटदार न मिळाल्याने निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. तलावाचे सुशोभीकरण होणार असल्याने नगर अभियंता कार्यालय आणि उद्यान विभागाने तलाव परिसराचे दुर्लक्ष केले आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरातील काही तरुणांनी जलपर्णी काढली होती, परंतु महापालिकेला जलपर्णी काढण्यास वेळच मिळाला नाही. उद्यान विभागाकडे कर्मचाºयांची कमतरता असल्याने त्यांनीही तलाव आणि राणी लक्ष्मीबाई उद्यानाकडे दुर्लक्ष केले आहे. 

सामाजिक संघटनांनी बोलावली बैठक - संभाजी तलावाला अच्छे दिन यावेत यासाठी शहरातील सामाजिक संघटना एकत्र येत आहेत.  संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम आणि होटगी रोड सोशल फाउंडेशनचे शाम पाटील यांच्या पुढाकाराने मंगळवारी सायंकाळी राणी लक्ष्मीबाई उद्यानात शहरातील सामाजिक संघटना, पर्यावरण प्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

मनपा प्रशासन कार्यरत आहे का? - संभाजी तलावाची अवस्था पाहता महापालिकेचे प्रशासन कार्यरत आहे का? असा प्रश्न पडतो. वन्यजीवांची काळजी म्हणून या तलावातील जलपर्णी हटविण्याचे काम सुरू करायला हवे. गेल्या एक वर्षापासून केंद्र शासनाच्या योजनेतून काम होणार असल्याचे सांगितले जात आहे. हे काम होईल तेव्हा होईल. सध्या जलपर्णी हटवा, असे नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे सदस्य पप्पू जमादार म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका