शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोलांटउड्या मारत संजयमामांनी सर्वात जास्त सत्ता भोगली : ढोबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:24 IST

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही अशीही टिका माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

ठळक मुद्दे१२२ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण पाण्याला शिस्त नसल्यामुळे पाणी उशाला असूनही शेतकºयांना मनस्ताप होतो - लक्ष्मण ढोबळेशेतीला खड्ड्यात घालणाºया नेत्याला जाब कोण विचारणार? या सर्वच दंडेलशाहीचा परिणाम म्हणून जिल्ह्यात शिंदेशाहीला पराभूत करणे हा भाजपचा संकल्प आहे - लक्ष्मण ढोबळे

सोलापूर : १२२ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण पाण्याला शिस्त नसल्यामुळे पाणी उशाला असूनही शेतकºयांना मनस्ताप होतो. उजनीचे पाणी पुण्यातील प्रकल्पांना नको होते. इंदापूरमधील अनेक प्रकल्पांनी क्षमतेपेक्षा जास्त पाणी घेतले. एनटीपीसी प्रकल्पाला शेतकºयांचे दोन टीएमसी पाणी देऊन अवघा शेतकरी देशोधडीला लावला,  अशी टीका माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी एका पत्रकातून केली आहे.संजय मामांसारखा नेता केवळ स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या कानाला लागला.

केवळ नातेवाईकांनाच कामे मिळावीत म्हणून हलक्या राजकारणाची रीत वापरली. कोलांटउड्या मारून सर्वात जास्त सत्ता भोगणारा नेता म्हणून संजयमामांना दोष द्यावा लागेल. जिल्ह्यात सर्वच साखरसम्राटांनी टनाला सरासरी दोन हजारांचा भाव दिला. लोकनेते साखर कारखाना खासगी करून तेवढ्यावर समाधान झाले नाही. दोनशे रुपये कमी करून टनाला १८०० रुपये भाव दिला. शेतीला खड्ड्यात घालणाºया नेत्याला जाब कोण विचारणार? या सर्वच दंडेलशाहीचा परिणाम म्हणून जिल्ह्यात शिंदेशाहीला पराभूत करणे हा भाजपचा संकल्प आहे. १० वर्षे संजय शिंदे यांनी स्वार्थासाठी समविचारी आघाडीचे नाटक वठविले.

सुडाचे राजकारण करताना जिल्ह्याचा नेता होण्यासाठी हलक्या कानाचे निरोप श्रेष्ठींना सांगण्यात धन्यता मानली तर आ. बबनदादांनी आपल्या क्षेत्रात अडथळा नको म्हणून संजयमामांना करमाळ्याकडे रेटले आणि मुलाचा राजकीय रस्ता डांबरी केला.

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही. तरीही हसतमुखरावांनी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर जिल्हा २० वर्षे ताब्यात ठेवला. शिंदे हे अनिवासी सोलापूरकर असल्याने स्टेशनवरून घरी त्यांना स्वागत करून आणावे लागते.

नव्या उमेदवारास वारसा नोंदीची गरज नसल्याने उद्याच्या राजकारणात अक्कलकोट आणि दक्षिण यामध्ये कुणाला पराभूत करण्याचे कारस्थान उरत नाही. शिंदेशाहीने राजाश्रयाच्या नादात लोकाश्रय गमावला असून, वारसाला मोठे करण्याच्या नादात साथीदार दुखावले. कुठे खरटमल तर कुठे चाकोते यांना झळ लागली. एक साधारण पीएच्या कौतुकासाठी विष्णुपंतांसारखा माणूस दूर केला. वेळ आल्यावर कधी माने तर कधी साठे कुटुंबाला अपमानित केले. सतत म्हेत्रे कुटुंबाला पाण्यात पाहिले, असाही आरोप लक्ष्मण ढोबळे यांनी केला.

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBabanrao Shindeबबनराव शिंदे