शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

स्वच्छता सोलापुरी; राज्यात यंदा पंधराव्या क्रमांकावरी, गतवर्षीपेक्षा चांगली कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 12:56 IST

सोलापूर : स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये सोलापूर महापालिकेने देशात ५४ वा क्रमांक पटकाविला आहे तर महाराष्ट्रात १५ वा ...

ठळक मुद्देस्वच्छ भारत सर्वेक्षणात देशातील ४ हजार शहरांनी सहभाग नोंदविलास्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७  मध्ये सोलापूर महापालिका ११५ व्या स्थानी२०१९ च्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविताना घनकचरा व्यवस्थापनाने शहर कचरा कोंडाळेमुक्त

सोलापूर : स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये सोलापूर महापालिकेने देशात ५४ वा क्रमांक पटकाविला आहे तर महाराष्ट्रात १५ वा क्रमांक पटकाविला आहे.  गेल्या दोन वर्षांतील ही सुधारित कामगिरी असल्याचे मनपा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.

 ढेंगळे-पाटील म्हणाले, स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशातील ४ हजार शहरांनी सहभाग नोंदविला होता. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७  मध्ये सोलापूर महापालिका ११५ व्या स्थानी होती तर २०१८ मध्ये ८६ व्या स्थानी होती. २०१९ च्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविताना घनकचरा व्यवस्थापनाने शहर कचरा कोंडाळेमुक्त केले. बाजारपेठेच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा संकलित करण्यासाठी लिटरबीन्स लावण्यात आले. महापालिकेच्या वतीने भोगाव येथील कचरा डेपोच्या जागेवर बायोएनर्जी प्रकल्प राबविला जातो. त्याचेही जादा गुण मिळाले आहेत.

 स्मार्ट सिटी योजनेतून १२० घंटागाड्या घेण्यात आल्या. त्यांना रुट मॅपिंग करण्यात आले. गाड्यांना जीपीएस सिस्टिम लावण्यात आली. घंटागाड्या घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा संकलित करीत आहेत. प्लास्टिक  बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली दंडाची पावती सोलापुरात करण्यात आली. सर्वेक्षण करणाºया समितीने शहरातील सामुदायिक शौचालये फाईव्ह स्टार रेटिंगचे असावेत, असा दंडक घातला आहे. आपण शौचालयांची  दुरुस्ती केली आहे. सर्वच ठिकाणे आरसे, दिव्यांगांसाठी रॅम्प लावले आहेत.

पुढील वर्षी पहिल्या दहामध्ये येऊ : ढेंगळे-पाटील- डिजिटल सर्वेक्षणात नागरिकांच्या सूचना आणि प्रतिसादही महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचारी आणि अधिकाºयांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे हे शक्य झाले आहे.  यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी होईल. घंटागाड्यातील कचरा संकलित करण्यासाठी आणखी दोन कचरा स्टेशन लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी देशात पहिल्या १० मध्ये येण्यासाठी प्रयत्न करु.

शहर आता पूर्वीपेक्षा चांगले दिसायला लागले आहे. सर्वसामान्य सफाई कर्मचारी बºयाच ठिकाणी अहोरात्र काम करीत आहेत. मोदी सरकारकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाला चांगला निधी मिळाला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून घेतलेल्या घंटागाड्यांमुळे चांगली मदत झाली आहे. यामुळेच स्वच्छ भारत अभियानात मनपाची कामगिरी मागच्या तुलनेत चांगली झाली आहे. पुढील वर्षी पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी प्रशासनाला आमचे सहकार्य राहील.  

- संजय कोळी, सभागृह नेते

आम्ही सत्तेवर आलो तेव्हा घंटागाड्याचे खासगीकरण झाले होते. आमच्यातील काही लोकांचा विरोध असतानाही हे खासगीकरण रद्द केले. त्यातून महापालिकेचे ५८ कोटी रुपये वाचले. मनपा प्रशासनाकडून घंटागाड्याचे काम सुरू झाले. शहरातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाड्यांमध्ये टाकायला सुरुवात केली. व्यापाºयांनीही शिस्त लावून घेतली. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांची, सफाई कर्मचाºयांनी चांगले काम केले. त्यामुळे या अभियानात चांगली कामगिरी झाली आहे. - शोभा बनशेट्टी, महापौर

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका