शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

स्वच्छता सोलापुरी; राज्यात यंदा पंधराव्या क्रमांकावरी, गतवर्षीपेक्षा चांगली कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 12:56 IST

सोलापूर : स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये सोलापूर महापालिकेने देशात ५४ वा क्रमांक पटकाविला आहे तर महाराष्ट्रात १५ वा ...

ठळक मुद्देस्वच्छ भारत सर्वेक्षणात देशातील ४ हजार शहरांनी सहभाग नोंदविलास्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७  मध्ये सोलापूर महापालिका ११५ व्या स्थानी२०१९ च्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविताना घनकचरा व्यवस्थापनाने शहर कचरा कोंडाळेमुक्त

सोलापूर : स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये सोलापूर महापालिकेने देशात ५४ वा क्रमांक पटकाविला आहे तर महाराष्ट्रात १५ वा क्रमांक पटकाविला आहे.  गेल्या दोन वर्षांतील ही सुधारित कामगिरी असल्याचे मनपा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.

 ढेंगळे-पाटील म्हणाले, स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशातील ४ हजार शहरांनी सहभाग नोंदविला होता. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७  मध्ये सोलापूर महापालिका ११५ व्या स्थानी होती तर २०१८ मध्ये ८६ व्या स्थानी होती. २०१९ च्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविताना घनकचरा व्यवस्थापनाने शहर कचरा कोंडाळेमुक्त केले. बाजारपेठेच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा संकलित करण्यासाठी लिटरबीन्स लावण्यात आले. महापालिकेच्या वतीने भोगाव येथील कचरा डेपोच्या जागेवर बायोएनर्जी प्रकल्प राबविला जातो. त्याचेही जादा गुण मिळाले आहेत.

 स्मार्ट सिटी योजनेतून १२० घंटागाड्या घेण्यात आल्या. त्यांना रुट मॅपिंग करण्यात आले. गाड्यांना जीपीएस सिस्टिम लावण्यात आली. घंटागाड्या घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा संकलित करीत आहेत. प्लास्टिक  बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली दंडाची पावती सोलापुरात करण्यात आली. सर्वेक्षण करणाºया समितीने शहरातील सामुदायिक शौचालये फाईव्ह स्टार रेटिंगचे असावेत, असा दंडक घातला आहे. आपण शौचालयांची  दुरुस्ती केली आहे. सर्वच ठिकाणे आरसे, दिव्यांगांसाठी रॅम्प लावले आहेत.

पुढील वर्षी पहिल्या दहामध्ये येऊ : ढेंगळे-पाटील- डिजिटल सर्वेक्षणात नागरिकांच्या सूचना आणि प्रतिसादही महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचारी आणि अधिकाºयांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे हे शक्य झाले आहे.  यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी होईल. घंटागाड्यातील कचरा संकलित करण्यासाठी आणखी दोन कचरा स्टेशन लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी देशात पहिल्या १० मध्ये येण्यासाठी प्रयत्न करु.

शहर आता पूर्वीपेक्षा चांगले दिसायला लागले आहे. सर्वसामान्य सफाई कर्मचारी बºयाच ठिकाणी अहोरात्र काम करीत आहेत. मोदी सरकारकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाला चांगला निधी मिळाला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून घेतलेल्या घंटागाड्यांमुळे चांगली मदत झाली आहे. यामुळेच स्वच्छ भारत अभियानात मनपाची कामगिरी मागच्या तुलनेत चांगली झाली आहे. पुढील वर्षी पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी प्रशासनाला आमचे सहकार्य राहील.  

- संजय कोळी, सभागृह नेते

आम्ही सत्तेवर आलो तेव्हा घंटागाड्याचे खासगीकरण झाले होते. आमच्यातील काही लोकांचा विरोध असतानाही हे खासगीकरण रद्द केले. त्यातून महापालिकेचे ५८ कोटी रुपये वाचले. मनपा प्रशासनाकडून घंटागाड्याचे काम सुरू झाले. शहरातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाड्यांमध्ये टाकायला सुरुवात केली. व्यापाºयांनीही शिस्त लावून घेतली. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांची, सफाई कर्मचाºयांनी चांगले काम केले. त्यामुळे या अभियानात चांगली कामगिरी झाली आहे. - शोभा बनशेट्टी, महापौर

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका