शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:58 IST

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय

ठळक मुद्दे१३ अतिदुष्काळी तालुक्यामध्ये मंगळवेढा तालुक्याचा समावेश आ़ भारत भालके यांनी तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवून घेण्याचा चंग बांधला़

मंगळवेढा : तालुक्यातील दक्षिण भागातील ३५ गावातील शेतकºयांच्या जीवनात हरितक्रांती घडवणारी ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेची फेररचना करून प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावास  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अखेरीस शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागला़

प़ महाराष्ट्रातील १३ अतिदुष्काळी तालुक्यामध्ये मंगळवेढा तालुक्याचा समावेश आहे़ त्यामुळे तालुक्यावरील असलेला दुष्काळी कलंक पुसण्यासाठी आ़ भारत भालके यांनी तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवून घेण्याचा चंग बांधला़ त्यादृष्टीने त्यांनी दक्षिण भागातील शेतकºयांच्या सिंचनाची सोय व्हावी, यासाठी ३५ गावांची उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली़ यासाठी आघाडी सरकारच्या काळात ५३० कोटी रुपयांच्या योजनेस मंजुरी मिळवली़ 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेस मंजुरी मिळवून निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले; मात्र आघाडी सरकार सत्तेत न आल्याने या योजनेला युती शासनाकडून गती मिळाली नाही़ आ़ भारत भालके यांना या योजनेचे श्रेय मिळेल, यामुळे युती शासनाने या योजनेस मंजुरी देण्याऐवजी यात त्रुटी काढण्याचे काम केले़

त्यामुळे दक्षिण भागातील लवंगीचे सरपंच जयसिंग निकम व सहकाºयांनी निधीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ त्यावर उच्च न्यायालयाने सरकारला या योजनेस टोकन निधी देऊन योजनेसाठी निधी देण्याचे आदेश देऊन हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते़ 

या योजनेस पहिल्यांदा एकदा मंत्रिमंडळाने, राज्यपालांनी, उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे़ तसेच उच्च न्यायालयाने सरकारला ही योजना किती दिवसांत, कशा पद्धतीने मार्गी लावणार याबाबतचे प्रतिज्ञापत्र मागविले होते, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने या योजनेवर शिक्कामोर्तब झाले आहे़

दरम्यान, या योजनेस पर्यावरण मान्यता प्राप्त न झाल्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रशासकीय मान्यता स्थगित केली व प्राधिकरणाच्या अधिनियमानुसार दिलेली मान्यता पुनर्स्थापित होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेही काम अथवा त्यावर कोणताही खर्च करु नये, असे निर्देश दिले होते. त्यानंतर  प्राधिकरणाने डिसेंबर २०१७ मध्ये हा प्रकल्प एकात्मिक जल आराखड्यात समाविष्ट करण्यास आणि वन व पर्यावरण विषयक मान्यतेच्या अधिन राहून पूर्वी स्थगित केलेली मान्यता पुन्हा दिली. 

या प्रकल्पासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली़ त्यावर सध्या कार्यवाही सुरु असून शासनाने वेळोवेळी शपथपत्राद्वारे आपली भूमिका मांडली आहे.

नाशिक येथील मुख्य अभियंत्यांच्या (नियोजन व जलविज्ञान) जलशास्त्रीय अभ्यास अहवालातील निष्कर्षानुसार उजनी प्रकल्पातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस आवश्यक ५४.७१ द.ल.घ.मी. पैकी २८.६६ द.ल.घ.मी. इतके म्हणजे आवश्यकतेच्या केवळ ५३ टक्के इतकेच पाणी उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पाची आवश्यक ती फेररचना करुन प्रकल्पास                     सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला. दरम्यान, हा निर्णय झाल्याचे समजताच तालुक्यात गावोगावी आ़ भारत भालके यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

अभिप्राय देण्याच्या सूचना होत्या...- मंगळवेढा तालुक्यातील या उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र ११ हजार ८२० हेक्टर आहे. शासनाने या योजनेस दोन टप्प्यात खास बाब म्हणून ५३० कोटी चार लाख इतक्या खर्चास सप्टेंबर २०१४ मध्ये  प्रशासकीय मान्यता दिली होती. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये दिलेल्या आदेशानुसार या प्रकल्पाची तांत्रिक फेरतपासणी करण्यासह राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीला प्रकल्पाचा जलशास्त्रीय अभ्यास करुन अभिप्राय देण्याबाबत सूचना देण्यात आल्या  होत्या.

३५ गावाला पाणी मिळवण्यासाठी  सरकारने निधी द्यावा  यासाठी लवंगीचे सरपंच कै.जयसिंग निकम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पाठपुरावा केला होता़ न्यायालयाच्या आदेशाने सरकारला २७ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे़ निकम यांच्या प्रयत्नाचे चीज झाले असून हा निर्णय कै़ निकम यांच्या स्मृतीस समर्पित करत आहे़-भारत भालके, आमदार

टॅग्स :SolapurसोलापूरBharat Bhakkeभारत भालकेWaterपाणीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार