शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सोलापूरचं पाणी चोरणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमारची निर्दशने

By appasaheb.patil | Updated: March 27, 2023 14:31 IST

कर्नाटक सरकार साेलापूर जिल्ह्यातील औज बंधाऱ्यातून पाणी चोरते.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर :कर्नाटक सरकार साेलापूर जिल्ह्यातील औज बंधाऱ्यातून पाणी चोरते. त्यामुळे सोलापूरकरांवर पाणीटंचाईची वेळ येत आहे. सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्यावर दरोडा टाकणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमार संघटनेने सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आंदोलन करून निर्दशने केली.

यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करून पाणी चोरी नाही थांबविल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, श्रीकांत डांगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात येते. हे पाणी औज बंधाऱ्याच्या माध्यमातून शहरात येते. मात्र हे पाणी वर्षानुवर्ष कर्नाटक सरकार चोरी करीत असताना लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी गप्प का असा सवाल उपस्थित केला.

गेल्या काही वर्षापासून उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम थांबले असतानाही कोणीच बोलायला तयार नाही, यावर कोणताच निर्णय होत नसल्याचीही खंत श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केली. पाणी चोरी करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या विरोधात कायदेशीर कारवाई नाही केल्यास संभाजी आरमार पुढील काळात मोठा मोर्चा सोलापुरात काढणार असल्याचेही यावेळी डांगे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Karnatakकर्नाटकSolapurसोलापूर