शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

रोबोटिक्स, ड्रोनच्या संशोधनास प्रोत्साहन हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:48 IST

अर्थसंकल्प २०२०; गावपातळीवर गोडाऊनची उभारणी, ई नाम साठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध व्हावे

ठळक मुद्देशेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशासह राज्यातील जनता शेती व्यवसायावर अवलंबूनशेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या नव्या योजना सुरू कराव्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत सुटसुटीतपणा व सुसूत्रता आणणारी यंत्रणा हवी

सोलापूर : शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. त्यातच मजुरांची आणि त्यांच्या मजुरीची समस्या मोठी आहे; मात्र यावर पर्याय म्हणून रोबोटिक्स, ड्रोन आणि स्वयंचलित यंत्राद्वारे मात करता येणार आहे. त्यावर होणाºया संशोधनाला यंदाच्या अर्थसंकल्पातून चालना द्यावी, भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा असणाºया कृषी क्षेत्राचा विकास व्हावा, सोलर सिस्टीम, भाडेतत्त्वावरील यंत्रसामुग्री यासह गावपातळीवर गोडाऊनची उभारणी, ई नाम साठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकºयांना प्राधान्याने मूलभूत सेवासुविधा (रस्ते, पाणी अन् वीज) उपलब्ध करून देण्यावर केंद्राने यंदाच्या अर्थसंकल्पात भर द्यावा असे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राने कृषी क्षेत्रासाठी २० टक्के निधीची तरतूद करायला हवी़ मध्यप्रदेशसारखी भावांतर योजना देशभर लागू करायला हवी, पीकविमा योजना सर्व पिकांना लागू करावी, शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री गावपातळीवर भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, साखर उद्योगांना संजीवनी देण्यासाठी विशेष तरतूद हवी, ठिबक सिंचन योजनांच्या निधीत वाढ करायला हवी, पाणलोट क्षेत्राच्या कामासाठी भरघोस निधी हवा आणि कृषी संशोधकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनाला चालना द्यावी़- अजितकुमार देशपांडेकृषी शास्त्रज्ञ, सोलापूर

केंद्राने अर्थसंकल्पात शेतकºयांच्या दृष्टीने चांगल्या योजनांची घोषणा करायला हवी़ सूक्ष्म सिंचन योजनेला प्रोत्साहन द्यायला हवे, शासन सध्या मार्केटिंगवर भर देत आहे त्यामुळे ई नाम साठी आवश्यक त्या साधनसामुग्री, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यायला हवे, शेतकºयांच्या मालासाठीचे को चैन उपक्रमाला चालना द्यायला हवी, शेतकºयांचा माल साठवून ठेवण्यासाठी गावपातळीवर गोडावूनची निर्मिती व्हायला हवी, ठिबक सिंचन योजनांसाठी भरीव निधीची गरज आहे त्यासाठीची तरतूद व्हायला हवी़- प्रा. लालासाहेब तांबडे कृषी विद्यापीठ, सोलापूर

कृषी हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे, असे असले तरीही, केंद्र सरकार यात मोठी भूमिका बजावताना दिसते. केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे सांघिक भावनेने काम केले  तरच कृषी क्षेत्रातील सुधारणा यशस्वी होऊ शकतील. केंद्राने प्राधान्याने मूलभूत समस्या (रस्ते, पाणी अन् वीज) सोडविण्यावर भर द्यावा, खतातील भेसळ रोखण्यासाठीचे कडक धोरण अंमलात आणावे, नवनवीन जातींना सरकारने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे़ आपल्या कृषी धोरणाचा केंद्रबिंदू हा आजवर शेती उत्पादन राहिला आहे. तो शेतकºयांच्या उत्पन्नाकडे सरकायला हवा.- नवनाथ कसपटेप्रसिद्ध शेतकरी, बार्शी

शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशासह राज्यातील जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या नव्या योजना सुरू कराव्यात,  कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत सुटसुटीतपणा व सुसूत्रता आणणारी यंत्रणा हवी, तसेच या योजना गतिमान आणि पारदर्शकपणे राबविण्यावर भर देण्यात यावा, दर्जेदार जैविक खते, कीटकनाशके यांचा वापर करुन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन धोरण राबवावे़- प्रवीण होळकरप्रगतिशील शेतकरी

टॅग्स :budget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणSolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीbudget 2020बजेट