शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

रोबोटिक्स, ड्रोनच्या संशोधनास प्रोत्साहन हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:48 IST

अर्थसंकल्प २०२०; गावपातळीवर गोडाऊनची उभारणी, ई नाम साठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध व्हावे

ठळक मुद्देशेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशासह राज्यातील जनता शेती व्यवसायावर अवलंबूनशेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या नव्या योजना सुरू कराव्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत सुटसुटीतपणा व सुसूत्रता आणणारी यंत्रणा हवी

सोलापूर : शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. त्यातच मजुरांची आणि त्यांच्या मजुरीची समस्या मोठी आहे; मात्र यावर पर्याय म्हणून रोबोटिक्स, ड्रोन आणि स्वयंचलित यंत्राद्वारे मात करता येणार आहे. त्यावर होणाºया संशोधनाला यंदाच्या अर्थसंकल्पातून चालना द्यावी, भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा असणाºया कृषी क्षेत्राचा विकास व्हावा, सोलर सिस्टीम, भाडेतत्त्वावरील यंत्रसामुग्री यासह गावपातळीवर गोडाऊनची उभारणी, ई नाम साठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकºयांना प्राधान्याने मूलभूत सेवासुविधा (रस्ते, पाणी अन् वीज) उपलब्ध करून देण्यावर केंद्राने यंदाच्या अर्थसंकल्पात भर द्यावा असे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राने कृषी क्षेत्रासाठी २० टक्के निधीची तरतूद करायला हवी़ मध्यप्रदेशसारखी भावांतर योजना देशभर लागू करायला हवी, पीकविमा योजना सर्व पिकांना लागू करावी, शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री गावपातळीवर भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, साखर उद्योगांना संजीवनी देण्यासाठी विशेष तरतूद हवी, ठिबक सिंचन योजनांच्या निधीत वाढ करायला हवी, पाणलोट क्षेत्राच्या कामासाठी भरघोस निधी हवा आणि कृषी संशोधकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनाला चालना द्यावी़- अजितकुमार देशपांडेकृषी शास्त्रज्ञ, सोलापूर

केंद्राने अर्थसंकल्पात शेतकºयांच्या दृष्टीने चांगल्या योजनांची घोषणा करायला हवी़ सूक्ष्म सिंचन योजनेला प्रोत्साहन द्यायला हवे, शासन सध्या मार्केटिंगवर भर देत आहे त्यामुळे ई नाम साठी आवश्यक त्या साधनसामुग्री, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यायला हवे, शेतकºयांच्या मालासाठीचे को चैन उपक्रमाला चालना द्यायला हवी, शेतकºयांचा माल साठवून ठेवण्यासाठी गावपातळीवर गोडावूनची निर्मिती व्हायला हवी, ठिबक सिंचन योजनांसाठी भरीव निधीची गरज आहे त्यासाठीची तरतूद व्हायला हवी़- प्रा. लालासाहेब तांबडे कृषी विद्यापीठ, सोलापूर

कृषी हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे, असे असले तरीही, केंद्र सरकार यात मोठी भूमिका बजावताना दिसते. केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे सांघिक भावनेने काम केले  तरच कृषी क्षेत्रातील सुधारणा यशस्वी होऊ शकतील. केंद्राने प्राधान्याने मूलभूत समस्या (रस्ते, पाणी अन् वीज) सोडविण्यावर भर द्यावा, खतातील भेसळ रोखण्यासाठीचे कडक धोरण अंमलात आणावे, नवनवीन जातींना सरकारने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे़ आपल्या कृषी धोरणाचा केंद्रबिंदू हा आजवर शेती उत्पादन राहिला आहे. तो शेतकºयांच्या उत्पन्नाकडे सरकायला हवा.- नवनाथ कसपटेप्रसिद्ध शेतकरी, बार्शी

शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशासह राज्यातील जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या नव्या योजना सुरू कराव्यात,  कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत सुटसुटीतपणा व सुसूत्रता आणणारी यंत्रणा हवी, तसेच या योजना गतिमान आणि पारदर्शकपणे राबविण्यावर भर देण्यात यावा, दर्जेदार जैविक खते, कीटकनाशके यांचा वापर करुन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन धोरण राबवावे़- प्रवीण होळकरप्रगतिशील शेतकरी

टॅग्स :budget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणSolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीbudget 2020बजेट