शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यातील जिल्हा परिषदांना दिले पाच कोटींच्या योजना मंजुरीचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:31 IST

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत याची माहिती : ठिंबकसाठी ८० टक्के अनुदान देण्याची शिफारस

ठळक मुद्देठिंबक सिंचन योजनांसाठी किमान ८0 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्याची शिफारसयाबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येईल असे खोत यांनी स्पष्ट केले.

सोलापूर : दुष्काळ निवारणासाठीच्या योजनांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील जिल्हा परिषदांना पाच कोटी रुपयांपर्यंतच्या योजना मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे बोलताना दिली.

 जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या उजनी ते भीमानगर या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, कृषी मुल्य आयोगाचे सदस्य विनायक जाधव, सुहास पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिपक भोसले, उजनीचे सरपंच बाळासाहेब पाटील, माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष पाटील व ग्रामस्थ उपस्थस्थित होते.

 रस्त्याच्या भूमीपूजनावेळी बोलताना खोत म्हणाले की दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजना जिल्हापातळीवरच करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यामध्ये आधी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन नंतर शेती व उद्योगाचा विचार करावा लागणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांना शासन सर्व ती मदत द्यायला तयार आहे. 

पाणी पुरवठा योजना तात्काळ मंजूर व्हाव्यात. प्रशासकीय बाबींसाठी विलंब होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदांना ५ कोटीपर्यंतच्या योजनांचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येईल असे खोत यांनी स्पष्ट केले. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रशासनाने पशुधनासाठी चारा व पाण्याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. राज्यात ग्रीनहाऊस, शेततळी, ठिबकसिंचन यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले आहे. ठिंबक सिंचन योजनांसाठी किमान ८0 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषीराज्यमंत्री खोत यांच्या निर्णयामुळे सोलापूर झेडपीच्या पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करणार असल्याचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत agricultureशेतीGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना