शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रिक्षांना ना मीटर, ना गणवेशाचा पत्ता; सोलापुरात कुठंही थांबून दादागिरीचा कित्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 11:01 IST

सर्वसामान्य वैतागले : रिक्षाचालक म्हणे आमचं कुणी ऐकूनच घेत नाही

सोलापूर : आरटीओ, परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ना मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा पत्ता, ना गणवेश, रस्त्यावर कुठंही थांबायचं, उलट दादागिरीची भाषा, यामुळं काही बोलायला वावच नाही, अशा शब्दांत सोलापूरकरांमधून रिक्षाचालकांबद्दल सूर उमटू लागला आहे. दुसरीकडे रिक्षाचालकांनी आमचं म्हणणं कुणी ऐकूनच घेत नाही. नुसती कारवाईचीच भाषा केली जाते, अशी भावना व्यक्त केली.

सोलापुरात एकतर महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सिटीबस सेवेचा फज्जा उडाला आहे. इनमिन २५ बस कशाबशा रस्त्यावर धावताहेत. जवळपास १० लाख लोकसंख्येच्या शहराला ही सेवा कशी पुरणार? दुचाकींची संख्या घरोघरी वाढलेली असली तरीही बहुतांश भार रिक्षांवर पडतो. सर्वसामान्य माणूस रिक्षातून प्रवास करीत असताना मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. विचारणा केली तर थातूरमातूर कारणे दिली जातात. गणवेशाचाही पत्ता नसतो. अधिक विचारणा केली तर उत्तरे व्यवस्थित मिळतात. अशावेळी आम्ही कोणाकडे दाद मागायची आणि मागायची म्हटलं तरी कुणाला वेळ आहे? असा सवाल श्रीकांत कुलकर्णी, विनायक स्वामी, सज्जन साळुंखे, ऋषिकेश अग्निहोत्री या प्रवाशांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला.

---

बसायचं तर बसा; अन्यथा...

  • उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचालकांना जे दरपत्रक दिले आहे त्यानुसार अंमलबजावणी होताना दिसत नाही. मधल्या काळात अनेक रिक्षाचालकांना गणवेश दिसायचा, आता ते प्रमाणही कमी झाले आहे. मीटरप्रमाणे बिल देतो म्हटले तरी टाळाटाळ केली जाते. उलट
  • शेअर ए रिक्षाच्या नावाखाली अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते. जरा कुठं विचारणा करायचा प्रयत्न केला तर ‘बसायचं तर बसा...’ असं सुनावलं जातं. याचा अनुभव आपण स्वत: घेतला असल्याचे संदीप सूर्यवंशी व विकास बंडगर या प्रवाशांनी ऐकवला.

----

रस्त्यावर कुठंही थांबा

- शहरातील बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पार्क चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, गांधीनगर, विजापूर रोड, आसरा चौक, विमानतळ, पूर्व भाग परिसरात रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी कुठेही थांबतात. प्रवाशांना विचारणा करतात. पाठीमागून येणाऱ्या अन्य वाहनांचीही पर्वा केली जात नाही. हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे.

----

तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केल्यास कारवाई

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त, उपायुक्त डॉ. दीपाली धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू आहे. रिक्षाचालकांकडून सौजन्याची सेवा देण्यासाठी बैठकीद्वारे सूचना केल्या आहेत. त्यांच्या मते शहरातील २३९ थांब्यांशिवाय आणखी थांबे वाढवून मागणी होत आहे. यावर महापालिका व वाहतूक विभागामार्फत सर्व्हे करून आवश्यकता वाटल्यास त्यावर विचार करता येईल. मात्र, ठरावीक गणवेश, थांब्यावरच रिक्षा थांबवाव्यात, तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करता येणार नाही; अन्यथा कारवाई करण्यात येईल, सध्या धडक मोहीम सुरू असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी स्पष्ट केले.

----

रिक्षाचालक म्हणतात.. जरा आमचंही ऐका

वाढत्या महागाईमुळे आम्हाला प्रवासी वाहतूक परवडत नाही. दरवाढीवर विचार केला जात नाही. नुसते रिक्षाचालकांवरच कारवाईची भाषा होते. आमच्या समस्याही उपप्रादेशिक परिवहन विभागाने, परिवहन प्राधिकरणाचे प्रमुख आणि रिक्षा भाडे स्वस्त होण्यासाठी महापालिकेने पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर सीएनजी गॅस कीट बसवण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी लालबावटा रिक्षा संघटनेचे सलीम मुल्ला यांनी रिक्षाचालकांच्या वतीने केली.

----

 

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस