शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

रिक्षांना ना मीटर, ना गणवेशाचा पत्ता; सोलापुरात कुठंही थांबून दादागिरीचा कित्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 11:01 IST

सर्वसामान्य वैतागले : रिक्षाचालक म्हणे आमचं कुणी ऐकूनच घेत नाही

सोलापूर : आरटीओ, परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ना मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा पत्ता, ना गणवेश, रस्त्यावर कुठंही थांबायचं, उलट दादागिरीची भाषा, यामुळं काही बोलायला वावच नाही, अशा शब्दांत सोलापूरकरांमधून रिक्षाचालकांबद्दल सूर उमटू लागला आहे. दुसरीकडे रिक्षाचालकांनी आमचं म्हणणं कुणी ऐकूनच घेत नाही. नुसती कारवाईचीच भाषा केली जाते, अशी भावना व्यक्त केली.

सोलापुरात एकतर महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सिटीबस सेवेचा फज्जा उडाला आहे. इनमिन २५ बस कशाबशा रस्त्यावर धावताहेत. जवळपास १० लाख लोकसंख्येच्या शहराला ही सेवा कशी पुरणार? दुचाकींची संख्या घरोघरी वाढलेली असली तरीही बहुतांश भार रिक्षांवर पडतो. सर्वसामान्य माणूस रिक्षातून प्रवास करीत असताना मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. विचारणा केली तर थातूरमातूर कारणे दिली जातात. गणवेशाचाही पत्ता नसतो. अधिक विचारणा केली तर उत्तरे व्यवस्थित मिळतात. अशावेळी आम्ही कोणाकडे दाद मागायची आणि मागायची म्हटलं तरी कुणाला वेळ आहे? असा सवाल श्रीकांत कुलकर्णी, विनायक स्वामी, सज्जन साळुंखे, ऋषिकेश अग्निहोत्री या प्रवाशांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला.

---

बसायचं तर बसा; अन्यथा...

  • उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचालकांना जे दरपत्रक दिले आहे त्यानुसार अंमलबजावणी होताना दिसत नाही. मधल्या काळात अनेक रिक्षाचालकांना गणवेश दिसायचा, आता ते प्रमाणही कमी झाले आहे. मीटरप्रमाणे बिल देतो म्हटले तरी टाळाटाळ केली जाते. उलट
  • शेअर ए रिक्षाच्या नावाखाली अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते. जरा कुठं विचारणा करायचा प्रयत्न केला तर ‘बसायचं तर बसा...’ असं सुनावलं जातं. याचा अनुभव आपण स्वत: घेतला असल्याचे संदीप सूर्यवंशी व विकास बंडगर या प्रवाशांनी ऐकवला.

----

रस्त्यावर कुठंही थांबा

- शहरातील बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पार्क चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, गांधीनगर, विजापूर रोड, आसरा चौक, विमानतळ, पूर्व भाग परिसरात रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी कुठेही थांबतात. प्रवाशांना विचारणा करतात. पाठीमागून येणाऱ्या अन्य वाहनांचीही पर्वा केली जात नाही. हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे.

----

तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केल्यास कारवाई

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त, उपायुक्त डॉ. दीपाली धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू आहे. रिक्षाचालकांकडून सौजन्याची सेवा देण्यासाठी बैठकीद्वारे सूचना केल्या आहेत. त्यांच्या मते शहरातील २३९ थांब्यांशिवाय आणखी थांबे वाढवून मागणी होत आहे. यावर महापालिका व वाहतूक विभागामार्फत सर्व्हे करून आवश्यकता वाटल्यास त्यावर विचार करता येईल. मात्र, ठरावीक गणवेश, थांब्यावरच रिक्षा थांबवाव्यात, तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करता येणार नाही; अन्यथा कारवाई करण्यात येईल, सध्या धडक मोहीम सुरू असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी स्पष्ट केले.

----

रिक्षाचालक म्हणतात.. जरा आमचंही ऐका

वाढत्या महागाईमुळे आम्हाला प्रवासी वाहतूक परवडत नाही. दरवाढीवर विचार केला जात नाही. नुसते रिक्षाचालकांवरच कारवाईची भाषा होते. आमच्या समस्याही उपप्रादेशिक परिवहन विभागाने, परिवहन प्राधिकरणाचे प्रमुख आणि रिक्षा भाडे स्वस्त होण्यासाठी महापालिकेने पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर सीएनजी गॅस कीट बसवण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी लालबावटा रिक्षा संघटनेचे सलीम मुल्ला यांनी रिक्षाचालकांच्या वतीने केली.

----

 

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस