शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

जनभावनेचा आदर करा; पाच टीएमसी योजनेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भीमानगर : सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करून उजनी जलाशयातून उचलण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाणी योजनेला स्थगिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भीमानगर : सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करून उजनी जलाशयातून उचलण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाणी योजनेला स्थगिती द्यावी; अन्यथा न्यायालयीन लढा उभा करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी भूमिका आ. बबनराव शिंदे यांनी मांडली आहे.

उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्याबाबत आ. शिंदे म्हणाले की, १५ ऑक्टोबरनंतर दौंड येथून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी उजनीत येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

इंदापूर तालुक्यातील योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ५ टीएमसी पाणी योजना उजनी धरणातून नुकतीच मंजूर केल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटना, आमदार, खासदार, सामाजिक संघटना वेगवेगळ्या मार्गाने या योजनेला विरोध करू लागले आहेत. कारण, ही योजना मंजूर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

आ. शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील शासनाने दखल घेतली नाही तर जिल्ह्याच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, न्यायालयीन लढा देऊ, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने जनभावनेचा आदर करावा व या योजनेचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.

सध्या उजनीचे ८४.५० टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन झाले आहे. उजनीमधून दहा उपसा सिंचन योजना असून, त्यासाठी २१.७७ टीएमसी पाणी वापर होतो. मराठवाड्यासाठी ७.५ टीएमसी पाणी मंजूर आहे, तसेच प्रलंबित योजनांना ७ ते ८ टीएमसी पाणी वापर होतोय. या योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत, त्यांना १४ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. सद्यपरिस्थितीतच उजनी पाण्यावरील सर्व लाभधारकांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

अजूनही मंगळवेढा, बार्शी, एकरुख, सीना-माढा उपसा सिंचन योजना पूर्ण नाहीत. या योजनांना शासनाने कोट्यवधींचा निधी दिलेला आहे. अशात उजनी धरणातून नवीन योजना मंजूर केल्या तर सोलापूर जिल्ह्यातील अगोदरच्या योजना पाण्याअभावी बंद पडणार व दिलेला निधी वाया जाणार. या गावांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे, असे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.