शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका

By संताजी शिंदे | Updated: March 7, 2023 18:59 IST

धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६२ गोवंशांच्या जनावरांची, विश्वहिंदू परिषद बजरंग दलातील गोरक्षकांनी सुटका केली.

संताजी शिंदे सोलापूर: धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६२ गोवंशांच्या जनावरांची, विश्वहिंदू परिषद बजरंग दलातील गोरक्षकांनी सुटका केली. या बाबत जोडभावी पेठ पोलिस ठाणे व फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

बेकायदा जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या गोरक्षकांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून ५ मार्च २०२३ रोजी मार्केट यार्ड येथे पहाटे ३ वाजता सापळा रचण्यात आला होता. माहितीनुसार मार्केट यार्ड समोरील रस्त्यावरून पिकअप (क्र.एमएच १३ सीयू ६०९५) ही गाडी आली. गोरक्षकांनी गाडी (क्र.एमएच १३ सीयू ५९८६) आडवली व पहाणी केली असता त्यात दाटीवाटीने जनावरे भरण्यात आल्याचे निदर्शनास आले. गाडीवर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गोहत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. फौजदार चावडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पिकअप (क्र.एमएच १३ सीयू ६०९५) ही गाडी पकडण्यात आली. गाडीत जनावरे आढळून आले. वैराग येथेही अशाच पद्धतीने जनावरांची बेकायदा तस्करी करणाऱ्या पकडण्यात आले.

या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तिन्ही गाडीतील जनावरे हे कत्तलीसाठी धाराशिव येथे घेऊन जात होते, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत परदेशी यांनी दिली. कारवाईत जिल्हा उपाध्यक्ष योगीराज जडगोनार, शहराध्यक्ष अविनाश कैय्यावाले, सत्यवान ताटे, पवनकुमार कोमटी, अविनाश मदनावाले, पवन बल्ला, विनायक निकते, सूरज भोसले, ओम जगताप, विरेश मंचाल, प्रवीण यनगल, विवेक बडवे, व्यंकटेश बागल, पंपु पाटील, रोहित देशमुख, गणेश जाधव, सुरज माने आदींनी परिश्रम घेतले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Solapurसोलापूर