शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

अधिसूचनेत दुरुस्ती होऊनही बार्शी तालुका पोलीस ठाणे अद्याप कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 11:24 IST

राज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केली. त्यानंतर जागांची पाहणी केली. तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाई होत आहे.

ठळक मुद्दे जागांची पाहणी केली तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाईराज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केलीनव्याने होत असलेले पोलीस ठाणे हे कागदावरच राहिले

भ. के. गव्हाणे बार्शी दि ७ : राज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केली. त्यानंतर जागांची पाहणी केली. तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाई होत आहे. नव्याने होत असलेले पोलीस ठाणे हे कागदावरच राहिले आहे. पोलीस ठाणे केव्हा सुरू होणार? असा सवाल बार्शी शहर आणि तालुक्यामधील नागरिक करीत आहेत. ५९ गावांसाठी शहरात स्वतंत्र तालुका पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी ३० जून २०१७ मध्ये सुधारित अधिसूचना काढण्यात येऊनही ते अद्यापही सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. सुधारित अधिसूचना गृह विभागाने निघाल्यानंतर ती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांनी १३ सप्टेंबर २०१७ मध्ये बार्शीत येऊन विभागीय पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक संदीप मिटके, तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले, अधिकारी यांच्यासमवेत कासारवाडी रोडवरील हागरे प्लॉट, नगरपालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर व जुनी पोलीस चौकी या जागांची पाहणी केली होती. त्यास जवळजवळ तीन महिने होत आले तरी अद्याप जागा निश्चित करण्यात आली नाही.  पूर्वी मंजुरी मिळालेले तालुका पोलीस स्टेशन सुरू होण्याच्या अधिसूचनेतील ५९ गावांशिवाय कार्यरत असलेल्या शहर पोलीस ठाणे हद्दीतील तुळशीराम पोलीस चौकी, सुभाष नगर चौकी व शिवाजी नगर पोलीस चौकी या तिन्ही चौकींचा फेरबदल व दुरुस्तीचा प्रस्ताव गृह विभागाकडे सुधारित आदेशासाठी गेला होता. त्यास ३० जून २०१७ रोजी सुधारित अधिसूचना प्राप्त होऊनही आज तीन महिने झाले आहेत. ---------------------------तर लोकांची सोय होईल...च्सध्या आगळगाव व खांडवी या दूरक्षेत्रातील गावच्या लोकांना सोयीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेसाठी तसेच मोटर अपघातात तातडीने मदत मिळण्यासाठी विविध गुन्ह्यांबरोबरच राजकीय गुन्हेगारी यावर लक्ष ठेवण्यासाठी वैराग व पांगरी पोलीस स्टेशनला जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या वेळेबरोबरच आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. शिवाय बार्शी-कुर्डूवाडी राज्यमहामार्ग आहे. या रस्त्यावरही दुर्घटना घडली तर तातडीने दखल घेण्यासाठी शिवाय जखमींना शहरातील दवाखान्यात दाखल करावे लागते. परंतु वैराग व पांगरी पोलीस स्टेशन लांब असल्याने पोलिसांची मदत मिळण्यास विलंब होतो. नवीन तालुका पोलीस स्टेशन सुरू झाल्यानंतर सोयीचे होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस