शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 10:39 IST

प्रकाशपर्व;  गुरुनानक दरबार, गुरुद्वारामध्ये कीर्तन, प्रवचन; सिंधी वसाहत उजळून निघाली

ठळक मुद्देसिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघालागेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो

सोलापूर : शीख धर्मीयांचे पहिले धर्मगुरु गुरुनानक यांच्या विचारांचे स्मरण अन् त्यांच्या जयजयकाराने गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबार आणि अंत्रोळीकर नगरातील गुरुद्वारा लख-लख प्रकाशाने उजळून निघाला आहे. गुरुनानकांचा प्रकाशपर्व (जयंती) उद्या (मंगळवारी) साजरा होत असून, सिंधी समाज यानिमित्ताने एकवटला आहे. गुरुनानकांच्या प्रकाशपर्वानिमित्त दोन्ही ठिकाणी विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 

‘वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतिह’, हा संदेश घेऊन गुरुद्वारामध्ये ३० आॅक्टोबरपासून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ७ ते रात्री ९  पर्यंत सत्संग सुरु आहे. उद्या (मंगळवारी) जयंतीचे औचित्य साधून सकाळी ६ ते ८ या वेळेत रागी भाई प्रितपाल सिंघजी यांचे कीर्तन तर रात्री १० ते १२ पर्यंत वीर मनिंदरपाल सिंघजी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत श्री गुरु ग्रंथ साहिब पाठची समाप्ती होणार असल्याचे गुरुद्वाराचे मुख्य सेवादार रमेशसिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गुरुद्वारामध्ये येणाºया भाविकांना लंगरची (महाप्रसाद) व्यवस्था करण्यात आली आहे.

गुरुद्वारामधील धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली कपिल नानकानी, अमर सचदेव, मंगेश कटारिया, पवन लुल्ला, वासुदेव सचदेव, लवेज पहुजा, रोशन मुरजानी, रोहिन हेमनानी, विनोद नानकानी, प्रेम नानकानी, महेश भिकचंदानी, बलकारसिंग, बसंतसिंग बोमर आदी सिंधी बांधव परिश्रम घेत आहेत. 

गुरुनानक नगरातही गुरुनानकांचा प्रकाशपर्व- सिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघाला आहे. गेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो. गुरुनानक दरबारातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश धनवानी, सुनील कुकरेजा, गिरीश कुकरेजा, हरीश नानकानी, इंद्रलाल होतवानी, किशोर होतवानी, लक्ष्मण होतवानी, शंकर होतवानी, पूनम गुदलानी, विशनदास माखिजा, मनोहरलाल तलरेजा आदी परिश्रम घेत आहेत.

एखादा माणूस कुठल्याही जाती-धर्मातील असो, त्याला कुठलेही संकट आले तर तो गुरुनानक दरबारात येऊन गुरुनानकांसमोर नतमस्तक झाला तर त्याचे सर्वच दु:ख, संकट दूर होतात. गुरुनानकांना विष्णू-राम-कृष्णाचे अवतार मानले जाते. सर्वच जाती-धर्मांमध्ये एकता नांदो, हीच गुरुनानकांकडे प्रार्थना.-गागनदास कुकरेजा, सेवादारी- गुरुनानक दरबार.

टॅग्स :SolapurसोलापूरGuru Purnimaगुरु पौर्णिमा