शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 10:39 IST

प्रकाशपर्व;  गुरुनानक दरबार, गुरुद्वारामध्ये कीर्तन, प्रवचन; सिंधी वसाहत उजळून निघाली

ठळक मुद्देसिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघालागेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो

सोलापूर : शीख धर्मीयांचे पहिले धर्मगुरु गुरुनानक यांच्या विचारांचे स्मरण अन् त्यांच्या जयजयकाराने गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबार आणि अंत्रोळीकर नगरातील गुरुद्वारा लख-लख प्रकाशाने उजळून निघाला आहे. गुरुनानकांचा प्रकाशपर्व (जयंती) उद्या (मंगळवारी) साजरा होत असून, सिंधी समाज यानिमित्ताने एकवटला आहे. गुरुनानकांच्या प्रकाशपर्वानिमित्त दोन्ही ठिकाणी विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 

‘वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतिह’, हा संदेश घेऊन गुरुद्वारामध्ये ३० आॅक्टोबरपासून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ७ ते रात्री ९  पर्यंत सत्संग सुरु आहे. उद्या (मंगळवारी) जयंतीचे औचित्य साधून सकाळी ६ ते ८ या वेळेत रागी भाई प्रितपाल सिंघजी यांचे कीर्तन तर रात्री १० ते १२ पर्यंत वीर मनिंदरपाल सिंघजी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत श्री गुरु ग्रंथ साहिब पाठची समाप्ती होणार असल्याचे गुरुद्वाराचे मुख्य सेवादार रमेशसिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गुरुद्वारामध्ये येणाºया भाविकांना लंगरची (महाप्रसाद) व्यवस्था करण्यात आली आहे.

गुरुद्वारामधील धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली कपिल नानकानी, अमर सचदेव, मंगेश कटारिया, पवन लुल्ला, वासुदेव सचदेव, लवेज पहुजा, रोशन मुरजानी, रोहिन हेमनानी, विनोद नानकानी, प्रेम नानकानी, महेश भिकचंदानी, बलकारसिंग, बसंतसिंग बोमर आदी सिंधी बांधव परिश्रम घेत आहेत. 

गुरुनानक नगरातही गुरुनानकांचा प्रकाशपर्व- सिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघाला आहे. गेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो. गुरुनानक दरबारातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश धनवानी, सुनील कुकरेजा, गिरीश कुकरेजा, हरीश नानकानी, इंद्रलाल होतवानी, किशोर होतवानी, लक्ष्मण होतवानी, शंकर होतवानी, पूनम गुदलानी, विशनदास माखिजा, मनोहरलाल तलरेजा आदी परिश्रम घेत आहेत.

एखादा माणूस कुठल्याही जाती-धर्मातील असो, त्याला कुठलेही संकट आले तर तो गुरुनानक दरबारात येऊन गुरुनानकांसमोर नतमस्तक झाला तर त्याचे सर्वच दु:ख, संकट दूर होतात. गुरुनानकांना विष्णू-राम-कृष्णाचे अवतार मानले जाते. सर्वच जाती-धर्मांमध्ये एकता नांदो, हीच गुरुनानकांकडे प्रार्थना.-गागनदास कुकरेजा, सेवादारी- गुरुनानक दरबार.

टॅग्स :SolapurसोलापूरGuru Purnimaगुरु पौर्णिमा