शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रणजी सामना; महाराष्ट्राने मणिपूर संघावर मिळविला एका डावाने विजय; अंकित बावणे ठरला सामनावीर

By appasaheb.patil | Updated: January 7, 2024 14:22 IST

महाराष्ट्र संघाने बोनस गुणासह विजयी सुरुवात केली.

सोलापूर : महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्यात तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाने एक डाव व ६९ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात अंकित बावणेहा सामनावीर ठरला. महाराष्ट्र संघाने बोनस गुणासह विजयी सुरुवात केली.

दरम्यान, तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून कालच्या ४ बाद ८५ वरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात झाली, परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही. सिद्धेश वीर याने दिवसाचा पहिला झटका दिला. किशन संघा १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर मणिपूर संघाचा निभाव लागला नाही, एकापाठोपाठ सर्व फलंदाज तंबूत परतत गेले. 

मणिपूरचा संपूर्ण संघ ५५.२ षटकात सर्वबाद ११४ धावा करू शकला. मणिपूर कडून सर्वाधिक नितेश २६ धावा, तर जॉन्सन याने २५ धावांचे योगदान दिले.

महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर याने ५.२ षटक टाकत अवघ्या १० धावा देत मणिपूर चे ४ गडी बाद केले. त्याला हितेश वाळुंज याने ३१ धावा देत ३ बळी मिळवत साथ दिली. कर्णधार केदार जाधव आणि विकी ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मणिपूर संघावर महाराष्ट्र संघाने एक डाव आणि ६९ धावांनी विजय मिळवला. 

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकSolapurसोलापूर