शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

आरटीओचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: June 12, 2014 01:15 IST

तीन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त : १० हजार स्मार्टकार्ड, ७५०० लायसन्स प्रलंबित

सोलापूर: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा तीन महत्त्वाच्या पदांवर अधिकारी नसल्याने सध्या या कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालला आहे. गेल्या सात महिन्यांपासून सुमारे दहा हजार स्मार्ट आर. सी. कार्ड व ७५०० विविध प्रकारचे लायसन्स प्रलंबित आहेत. याबाबतची कागदपत्रे सहीअभावी कार्यालयातच धूळखात पडली आहेत. नागरिकांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांची सहा महिन्यांपूर्वी पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त झालेला नाही. अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे सोलापूर कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. पाटील हे अकलूज येथील कारभार पाहत महिन्यातून चार ते पाच वेळा सोलापुरातील कार्यालयात हजरेी लावतात. मात्र येथील कामाचा व्याप लक्षात घेता पेडन्सी वरचेवर वाढू लागली आहे.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक बी. पवार यांची वसई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची नियुक्ती शासनाने केलेली नाही. मुंबई येथून बदलून आलेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गुंजाळ यांच्याकडे पिंपरी चिंचवड आरटीओचा अतिरिक्त कार्यभार असल्याने पवार यांच्याकडून पदभार घेण्यासाठी आले होते. -----------------------------पोस्टाकडे बोट...सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण झाली का याची दररोज शेकडो लोक दूरध्वनीवरुन चौकशी करतात तर अनेक जण समक्ष येऊन चौकशी करतात. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, तसेच कामही होत नाही. स्मार्ट आर. सी. कार्ड व लायसन्स पोस्टाद्वारे पाठविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आपली कागदपत्रे पोस्टाद्वारे पाठविली, अशी थातूरमातूर उत्तरे नेहमीच मिळतात. मात्र काम काही पूर्ण होत नाही.-----------------------------------कोणाचाच कोणाला नाही पायपोसजिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात महात्त्वाच्या पदावरील तीन अधिकारी नसल्याने सध्या कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नाही. नवीन वाहन नोंदणी, जुने वाहन हस्तांतरण, बँक बोजा, ना-हरकत दाखले, मोटार वाहनधारकांची पक्की लायसन्स, नूतनीकरणासाठी दिलेली लायसन्सची कामे प्रलंबित राहिली आहेत. या कामासाठी दररोज शेकडो नागरिक कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र या गंभीर समस्येकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलेले नाही. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही गप्प आहेत.