शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: June 12, 2014 01:15 IST

तीन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त : १० हजार स्मार्टकार्ड, ७५०० लायसन्स प्रलंबित

सोलापूर: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा तीन महत्त्वाच्या पदांवर अधिकारी नसल्याने सध्या या कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालला आहे. गेल्या सात महिन्यांपासून सुमारे दहा हजार स्मार्ट आर. सी. कार्ड व ७५०० विविध प्रकारचे लायसन्स प्रलंबित आहेत. याबाबतची कागदपत्रे सहीअभावी कार्यालयातच धूळखात पडली आहेत. नागरिकांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांची सहा महिन्यांपूर्वी पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त झालेला नाही. अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे सोलापूर कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. पाटील हे अकलूज येथील कारभार पाहत महिन्यातून चार ते पाच वेळा सोलापुरातील कार्यालयात हजरेी लावतात. मात्र येथील कामाचा व्याप लक्षात घेता पेडन्सी वरचेवर वाढू लागली आहे.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक बी. पवार यांची वसई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची नियुक्ती शासनाने केलेली नाही. मुंबई येथून बदलून आलेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गुंजाळ यांच्याकडे पिंपरी चिंचवड आरटीओचा अतिरिक्त कार्यभार असल्याने पवार यांच्याकडून पदभार घेण्यासाठी आले होते. -----------------------------पोस्टाकडे बोट...सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण झाली का याची दररोज शेकडो लोक दूरध्वनीवरुन चौकशी करतात तर अनेक जण समक्ष येऊन चौकशी करतात. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, तसेच कामही होत नाही. स्मार्ट आर. सी. कार्ड व लायसन्स पोस्टाद्वारे पाठविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आपली कागदपत्रे पोस्टाद्वारे पाठविली, अशी थातूरमातूर उत्तरे नेहमीच मिळतात. मात्र काम काही पूर्ण होत नाही.-----------------------------------कोणाचाच कोणाला नाही पायपोसजिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात महात्त्वाच्या पदावरील तीन अधिकारी नसल्याने सध्या कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नाही. नवीन वाहन नोंदणी, जुने वाहन हस्तांतरण, बँक बोजा, ना-हरकत दाखले, मोटार वाहनधारकांची पक्की लायसन्स, नूतनीकरणासाठी दिलेली लायसन्सची कामे प्रलंबित राहिली आहेत. या कामासाठी दररोज शेकडो नागरिक कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र या गंभीर समस्येकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलेले नाही. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही गप्प आहेत.