शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

आरटीओचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: June 12, 2014 01:15 IST

तीन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त : १० हजार स्मार्टकार्ड, ७५०० लायसन्स प्रलंबित

सोलापूर: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा तीन महत्त्वाच्या पदांवर अधिकारी नसल्याने सध्या या कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालला आहे. गेल्या सात महिन्यांपासून सुमारे दहा हजार स्मार्ट आर. सी. कार्ड व ७५०० विविध प्रकारचे लायसन्स प्रलंबित आहेत. याबाबतची कागदपत्रे सहीअभावी कार्यालयातच धूळखात पडली आहेत. नागरिकांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांची सहा महिन्यांपूर्वी पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त झालेला नाही. अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे सोलापूर कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. पाटील हे अकलूज येथील कारभार पाहत महिन्यातून चार ते पाच वेळा सोलापुरातील कार्यालयात हजरेी लावतात. मात्र येथील कामाचा व्याप लक्षात घेता पेडन्सी वरचेवर वाढू लागली आहे.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक बी. पवार यांची वसई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची नियुक्ती शासनाने केलेली नाही. मुंबई येथून बदलून आलेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गुंजाळ यांच्याकडे पिंपरी चिंचवड आरटीओचा अतिरिक्त कार्यभार असल्याने पवार यांच्याकडून पदभार घेण्यासाठी आले होते. -----------------------------पोस्टाकडे बोट...सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण झाली का याची दररोज शेकडो लोक दूरध्वनीवरुन चौकशी करतात तर अनेक जण समक्ष येऊन चौकशी करतात. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, तसेच कामही होत नाही. स्मार्ट आर. सी. कार्ड व लायसन्स पोस्टाद्वारे पाठविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आपली कागदपत्रे पोस्टाद्वारे पाठविली, अशी थातूरमातूर उत्तरे नेहमीच मिळतात. मात्र काम काही पूर्ण होत नाही.-----------------------------------कोणाचाच कोणाला नाही पायपोसजिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात महात्त्वाच्या पदावरील तीन अधिकारी नसल्याने सध्या कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नाही. नवीन वाहन नोंदणी, जुने वाहन हस्तांतरण, बँक बोजा, ना-हरकत दाखले, मोटार वाहनधारकांची पक्की लायसन्स, नूतनीकरणासाठी दिलेली लायसन्सची कामे प्रलंबित राहिली आहेत. या कामासाठी दररोज शेकडो नागरिक कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र या गंभीर समस्येकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलेले नाही. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही गप्प आहेत.