शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेल्वेने केरळला ९.२६ टन वस्तूंची मदत पाठविली,  राज्यातून ६.६२ कोटींचे अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:14 IST

सोलापुरातून मालगाड्या रवाना : राज्यातून ६.६२ कोटींचे अर्थसाहाय्य

ठळक मुद्देकेरळवासीयांना रेल्वे कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार कर्मचाºयांकडून ६ कोटी ६२ लाख ४७ हजार २५० रुपयांची आर्थिक मदत राज्यातील पाच विभागातून आजवर ८४९.२३ टनाचे साहित्य पाठविण्यात आले

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : केरळच्या पूरग्रस्तांसाठी  मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून  गेल्या पंधरा दिवसात  ९.२६ टनाची औषधे, कपडे, अन्न अशा जीवनावश्यक वस्तूंची  मदत  पाठविण्यात आली असून, राज्यातील पाच विभागातून आजवर ८४९.२३ टनाचे साहित्य पाठविण्यात आले आहे. दातृत्त्वात मात्र भुसावळ विभागाने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

केरळमध्ये पुरात लाखो घरे वाहून गेली़ असंख्य लोकांचा मृत्यू झाला़ जनजीवन विस्कळीत झाले़ त्यानंतर तिकडे मदतीचा ओघ सुरु झाला़ ही मदत वेळेत पोहोचावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने  रेल्वेच्या माध्यमातून पोहोचवली गेली़ मानवतेच्या दृष्टिकोनातून रेल्वेनेदेखील अन्न, औषध, कापड आणि पाणी या साºया मदतीची वाहतूक ही मोफत करण्याचे जाहीर केले़ १८ आॅगस्टपासून ही मोफत वाहतूक सुरु झाली़ ५ सप्टेंबरपर्यंत मध्य रेल्वे विभागातून ८४९़२३ टन साहित्यांची मदत रेल्वे वाहतुकीतून पोहोचली़ पुण्यातून १४ वॅगन पाणी पोहोचवले गेले़ याबरोबरच सोलापूरमधून २१ आॅगस्ट रोजी एनटीपीसी (फताटेवाडी, दक्षिण सोलापूर)कडून काही साहित्य रवाना झाले़ जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात मुंबई शहर मात्र दुसºया क्रमांकावर ठरले़  सोलापूर शहरातून विविध संघटनाही वस्तू आणि पैशांच्या स्वरुपात मदत गोळा करुन पाठवत आहेत़

सोलापूर विभागातून ९,६०० कर्मचाºयांचा पगार... - महाराष्ट्रातून विविध विभागातून केरळवासीयांना रेल्वे कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार देऊन मानवता धर्म जोपासला आहे़ मध्य रेल्वे अर्थात मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागातील सर्व रेल्वे कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार त्यांना दिला आहे़ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचाºयांकडून ६ कोटी ६२ लाख ४७ हजार २५० रुपयांची आर्थिक मदत केरळला पोहोचली आहे़ यामध्ये सोलापूर विभागातून ९,६०० कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार देऊ केला आहे़ 

विभागनिहाय मदत़...- मुंबई     - ३१७ टन- पुणे     - १३१़३० टन - भुसावळ     - ३५१़८८ टन - नागपूर     - ३९़४४ टन- सोलापूर     - ९़२६ टन 

मध्य रेल्वेने केरळपर्यंत मालवाहतूक मोफत दिली़ मानवतेच्या दृष्टिकोनातून मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे़ महाराष्ट्रातील पाचही विभागातून मदत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला़- डी़ के. शर्मामहाव्यवस्थापक, मध्य रेल्वे 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेKeralaकेरळ