शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

साधेपणातलं पावित्र्य ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:28 IST

पूर्व भागातल्या टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा हॉल महिला, पुरुष आणि मुलांनी खचाखच भरलेला? सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेनं भरलेल्या. एकूण वातावरण भारलेलं ...

पूर्व भागातल्या टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा हॉल महिला, पुरुष आणि मुलांनी खचाखच भरलेला? सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेनं भरलेल्या. एकूण वातावरण भारलेलं आणि भारावलेलं होतं. कारणही तसंच होतं. कुणाच्या वडिलांना, कुणाच्या आईला, पतीला, पत्नीला, भावाला, बहिणीला, आजोबांना अशा कुणाकुणाला पुरस्कार मिळणार होता. रोटरी क्लब आॅफ एमआयडीसीने हा सोहळा आयोजित केला होता. सगळे पुरस्कारार्थी व्यासपीठावर बसलेले. औत्सुक्य आणि बावरलेपण नजरेत मावत नव्हतं.  या सगळ्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच पुरस्कार होता. कुणी टेक्स्टाईल कामगार होता, कुणी जॉबर होता. कुणी रुग्णालयातील रुग्णाचे कपडे धुणारा धोबी होता, कुणी वह्या बनवणाºया कारखान्यात कटिंग मास्तर म्हणून कामास होता. कुणी विडी कामगार महिला तर कुणी एस. टी. महामंडळात वाहक म्हणून कामास होता. ही सगळी अतिशय सामान्य कुटुंबातली मंडळी होती. काही जगावेगळं केलं असंही नव्हतं. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती! आपापल्या छोट्या छोट्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची वृत्ती! यातल्या प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठीच काम केलं. पुढे चालून आपल्याला रोटरीचा किंवा कुठलाही पुरस्कार मिळवायचा आहे म्हणून कोणी काम केलं नसेल, हे निश्चित! आपलं कुटुंब, मुलंबाळं, चांगली घडावीत, मोठी व्हावीत, आपल्या वाट्याला जे कष्ट, दु:ख आले ते मुलाच्या वाट्याला येऊ नये. त्यांचं भवितव्य छान घडावं. एवढाच सोपा विचार करत या लोकांनी आपली कुटुंबं घडवली. 

ललिता गोटीपामूल या विडी कामगार महिलेने मुलाला आय. ए. एस. पर्यंत शिक्षण देऊन मोठं केलं. विजयवाडा येथे त्याचे पोस्टिंग आहे. किसन नरोळे या माणसाने सलग ५२ वर्षे मार्कंडेय रुग्णालयात धोबी काम केलं, नागेश मेहेरकर या बस कंडक्टरने नोकरीच्या बरोबरीने सामाजिक कामात योगदान दिलं. अनिल सरडे या जॉबर म्हणून काम करणाºया माणसाने प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा विडा उचलला. आज पक्षी जितक्या वेगाने झाड बदलतात त्यापेक्षा जास्त वेगाने नोकºया बदलण्याच्या काळात सलग ३५ वर्षे एकाच कारखान्यात निष्ठेने काम करणारे दोघेजण होते. अशी प्रत्येकाची कहाणी वेगळी.

म्हटलं तर यात काही विशेष नाही, सगळीच माणसं पोटार्थी होती. याकडे एका वेगळ्या नजरेने पाहू तर लक्षात येईल की, या छोट्या माणसांनीच आपल्यापुरता अंधार दूर करण्याचा प्रयत्न केलाय. यांच्याकडे सचोटी आहे, जिद्द आहे, आपल्या कामाप्रती निष्ठा आहे. आपल्या ऐपतीएवढाच स्वाभीमान आहे. कधी कुणी आपली दखल घेईल, सत्कार वगैरे करेल अशी त्यांची अपेक्षाही नव्हती. साधं, सरळ आयुष्य जगणारी ही मंडळी होती. महागाई यांनाही सतावते, वाहतुकीचा त्रास यांनाही होतो, पाण्यासाठी वणवण यांनाही करावी लागते. वीजपुरवठा यांच्याकडेही खंडित होतो. तुम्हा आम्हाला ज्या ज्या समस्यांनी ग्रासलंय त्या सर्व समस्या यांच्याकडेही आहेत.साधेपणातलं पावित्र्य छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानण्याची वृत्ती, कुटुंबातल्या प्रत्येकाबद्दलची आपुलकी, निर्लेप जिव्हाळा, स्वत्व ही त्यांची बलस्थानं आहेत. यांनीच त्यांचं घर उभं केलं, माणसं उभी केली. जगण्याची उमेद निर्माण केली. नात्यातले बंध घट्ट केले. लालसा आणि हव्यासाला दूर ठेवूनही प्रगती करता येते हे दाखवून दिले. 

खरं म्हणजे ते दाखवण्यासाठीही त्यांनी काही केलं नाही. रोटरीच्या पुरस्काराने त्यावर प्रकाशझोत टाकला गेला, एवढंच! अशी माणसं एवढीच आहेत का? तर बिलकूल नाहीत! पावलोपावली दिसतील. ती पाहता आली पाहिजेत. शोधता आली पाहिजेत म्हणजे इतरांच्याही वाटा उजळून जातील. - माधव देशपांडे(लेखक उद्योग समूहात जनसंपर्क विभागाचे व्यवस्थापक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग