शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

साधेपणातलं पावित्र्य ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:28 IST

पूर्व भागातल्या टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा हॉल महिला, पुरुष आणि मुलांनी खचाखच भरलेला? सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेनं भरलेल्या. एकूण वातावरण भारलेलं ...

पूर्व भागातल्या टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा हॉल महिला, पुरुष आणि मुलांनी खचाखच भरलेला? सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेनं भरलेल्या. एकूण वातावरण भारलेलं आणि भारावलेलं होतं. कारणही तसंच होतं. कुणाच्या वडिलांना, कुणाच्या आईला, पतीला, पत्नीला, भावाला, बहिणीला, आजोबांना अशा कुणाकुणाला पुरस्कार मिळणार होता. रोटरी क्लब आॅफ एमआयडीसीने हा सोहळा आयोजित केला होता. सगळे पुरस्कारार्थी व्यासपीठावर बसलेले. औत्सुक्य आणि बावरलेपण नजरेत मावत नव्हतं.  या सगळ्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच पुरस्कार होता. कुणी टेक्स्टाईल कामगार होता, कुणी जॉबर होता. कुणी रुग्णालयातील रुग्णाचे कपडे धुणारा धोबी होता, कुणी वह्या बनवणाºया कारखान्यात कटिंग मास्तर म्हणून कामास होता. कुणी विडी कामगार महिला तर कुणी एस. टी. महामंडळात वाहक म्हणून कामास होता. ही सगळी अतिशय सामान्य कुटुंबातली मंडळी होती. काही जगावेगळं केलं असंही नव्हतं. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती! आपापल्या छोट्या छोट्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची वृत्ती! यातल्या प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठीच काम केलं. पुढे चालून आपल्याला रोटरीचा किंवा कुठलाही पुरस्कार मिळवायचा आहे म्हणून कोणी काम केलं नसेल, हे निश्चित! आपलं कुटुंब, मुलंबाळं, चांगली घडावीत, मोठी व्हावीत, आपल्या वाट्याला जे कष्ट, दु:ख आले ते मुलाच्या वाट्याला येऊ नये. त्यांचं भवितव्य छान घडावं. एवढाच सोपा विचार करत या लोकांनी आपली कुटुंबं घडवली. 

ललिता गोटीपामूल या विडी कामगार महिलेने मुलाला आय. ए. एस. पर्यंत शिक्षण देऊन मोठं केलं. विजयवाडा येथे त्याचे पोस्टिंग आहे. किसन नरोळे या माणसाने सलग ५२ वर्षे मार्कंडेय रुग्णालयात धोबी काम केलं, नागेश मेहेरकर या बस कंडक्टरने नोकरीच्या बरोबरीने सामाजिक कामात योगदान दिलं. अनिल सरडे या जॉबर म्हणून काम करणाºया माणसाने प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा विडा उचलला. आज पक्षी जितक्या वेगाने झाड बदलतात त्यापेक्षा जास्त वेगाने नोकºया बदलण्याच्या काळात सलग ३५ वर्षे एकाच कारखान्यात निष्ठेने काम करणारे दोघेजण होते. अशी प्रत्येकाची कहाणी वेगळी.

म्हटलं तर यात काही विशेष नाही, सगळीच माणसं पोटार्थी होती. याकडे एका वेगळ्या नजरेने पाहू तर लक्षात येईल की, या छोट्या माणसांनीच आपल्यापुरता अंधार दूर करण्याचा प्रयत्न केलाय. यांच्याकडे सचोटी आहे, जिद्द आहे, आपल्या कामाप्रती निष्ठा आहे. आपल्या ऐपतीएवढाच स्वाभीमान आहे. कधी कुणी आपली दखल घेईल, सत्कार वगैरे करेल अशी त्यांची अपेक्षाही नव्हती. साधं, सरळ आयुष्य जगणारी ही मंडळी होती. महागाई यांनाही सतावते, वाहतुकीचा त्रास यांनाही होतो, पाण्यासाठी वणवण यांनाही करावी लागते. वीजपुरवठा यांच्याकडेही खंडित होतो. तुम्हा आम्हाला ज्या ज्या समस्यांनी ग्रासलंय त्या सर्व समस्या यांच्याकडेही आहेत.साधेपणातलं पावित्र्य छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानण्याची वृत्ती, कुटुंबातल्या प्रत्येकाबद्दलची आपुलकी, निर्लेप जिव्हाळा, स्वत्व ही त्यांची बलस्थानं आहेत. यांनीच त्यांचं घर उभं केलं, माणसं उभी केली. जगण्याची उमेद निर्माण केली. नात्यातले बंध घट्ट केले. लालसा आणि हव्यासाला दूर ठेवूनही प्रगती करता येते हे दाखवून दिले. 

खरं म्हणजे ते दाखवण्यासाठीही त्यांनी काही केलं नाही. रोटरीच्या पुरस्काराने त्यावर प्रकाशझोत टाकला गेला, एवढंच! अशी माणसं एवढीच आहेत का? तर बिलकूल नाहीत! पावलोपावली दिसतील. ती पाहता आली पाहिजेत. शोधता आली पाहिजेत म्हणजे इतरांच्याही वाटा उजळून जातील. - माधव देशपांडे(लेखक उद्योग समूहात जनसंपर्क विभागाचे व्यवस्थापक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग