शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोलापुरात पुनश्च स्टे होम; पुन्हा संचारबंदी लागू करणे म्हणजे पुनश्च हरिओम...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:15 IST

सोलापूरकरांनो शहाणे व्हा : अख्ख्या महाराष्ट्रात फक्त इथंच संचारबंदीची वेळ का येतेय ?

ठळक मुद्देशहरात कोरोनाचे रुग्ण, मृत्यू वाढत आहेत. वारंवार सांगूनही लोक मास्क वापरत नाहीतदुचाकीवर डबल सीट जाऊ नका म्हटले तरी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन फिरत आहेतज्येष्ठ नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. अनेक दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तोंडाला मास्क न लावता बसलेले असतात

सोलापूर : एकीकडे देश अनलॉक होत असताना सोलापुरात मात्र पुन्हा थोडी नव्हे तर चक्क १५ दिवस संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठविला आहे. सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमधली वाढ हे प्रशासन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत असल्यामुळे ‘पुनश्च स्टे होम’चा संदेश प्रशासनाच्या वतीने दिला जात आहे. तीन महिन्यांनंतर सुरू झालेले उद्योग-व्यापार रुळावर येत असताना पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या निर्णय म्हणजे पुनश्च हरिओम.

महापालिकेची आरोग्य यंत्रणा विविध प्रकारच्या कामात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. याला नागरिकांच्या निष्काळजीपणाबरोबरच प्रशासनही जबाबदार आहे. सुरुवातीपासून प्रशासनाने वेगवान हालचाली केल्या असत्या तर कोरोनाला नक्कीच प्रतिबंध करता आला असता. परंतु सोलापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ही साथ पसरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.

पोलीस, जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य यंत्रणा हे सर्वच खाते गाफील राहिले. त्यात सोलापुरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीचा भाग आहे, हेही कोणी लक्षात घेतले नाही. कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्यानंतर अधिकारी बदलले जात आहेत. महापालिकेच्या नवीन आयुक्तांचा चांगला प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांना सोलापूर शहराची नेमकी माहिती घ्यावी लागेल. शहराची अर्थव्यवस्था आणि जनमानसाचा नेमका कानोसा घेता आला तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे म्हणता येईल.---------------प्रशासकीय यंत्रणा ढेपाळली..शहरातील एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास या परिसराला तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र केले जात नाही. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील रुग्णांना तत्काळ क्वारंटाईन केले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. प्रतिबंधित क्षेत्रात निर्जंतुकीकरणाचे काम तत्काळ होत नाही. नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम केले जात नसल्याचे सांगितले जाते. अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अशा अनेक अधिकाºयांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

शहरात कोरोनाचे रुग्ण, मृत्यू वाढत आहेत. वारंवार सांगूनही लोक मास्क वापरत नाहीत. दुचाकीवर डबल सीट जाऊ नका म्हटले तरी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन फिरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. अनेक दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तोंडाला मास्क न लावता बसलेले असतात. त्या दुकानासमोर मोठी गर्दी असते. त्यामुळे आम्हाला पुन्हा लॉकडाऊन घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. विनंती करूनही लोक ऐकायला तयार नसल्याने हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे. यासंदर्भात अधिकाºयांशी चर्चा सुरू आहे. पुन्हा लॉकडाऊन घ्यायचा प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत. - पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका