शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून बोंबाबोंब आंदोलन

By दिपक दुपारगुडे | Updated: January 18, 2024 18:25 IST

अत्यल्प मोबदल्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. हायवेच्या निर्मितीमुळे इतर शेतकऱ्यांनाही अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

सोलापूर : बहुचर्चित चेन्नई-सुरत हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश होऊनही शासनस्तरावरून बैठक लागत नाही, ही शोकांतिका आहे. परंतु शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्तेतील मंत्री अक्कलकोट येथे येत असून बाधितांसोबत त्यांचा संवाद होण्याकामी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घ्यावा. या मागण्यांसह अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर ग्रीनफिल्डच्या बाधित शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले.

अत्यल्प मोबदल्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. हायवेच्या निर्मितीमुळे इतर शेतकऱ्यांनाही अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व गोष्टी शासनस्तरावर बैठक लागल्यानंतर मिटू शकतात. परंतु ना बैठक, ना चर्चा, ना निर्णय यामुळे भविष्यात शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल असे तेथील शेतकऱ्यांचे मत आहे. योगायोगाने शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अक्कलकोटला येत आहेत.

म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी फडणवीसांशी संवाद साधून दिल्यास मार्ग निघू शकेल अशी भावना संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केली. यावेळी सचिव प्रियंका दोड्याळे, दीपक कदम, सुभाष शिंदे, चेतन जाधव, बिरु बन्ने, प्रकाश तेल्लुणगी, दत्तात्रय अस्वले यांच्यासह शेतकरी, महिला उपस्थित होते. या समयी नायब तहसीलदार विकास पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmer strikeशेतकरी संप