शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रखडलेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामावरून प्रणिती शिंदे आक्रमक!

By appasaheb.patil | Updated: January 13, 2023 13:38 IST

या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकल्पावर काम करत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज सोलापुरात आहेत. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत आ. प्रणिती शिंदे या आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. त्या म्हणाल्या की,  उजनी-सोलापूर  समांतर जलवाहिनीचे थांबवलेले काम टाईम बाउंड प्रोग्रॅम आखून तत्काळ पूर्ण करावे व सार्वजनिक नळ बंद करण्याची कारवाई थांबवावी अशी मागणी केली. 

सोलापूर शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी समांतर जलवाहिनीची योजना कागदी घोडे चालवून विनाकारण प्रलंबित ठेवण्यात येत आहे. यामुळे शहरासाठी प्रामुख्याने महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प मागे पडत गेलेला आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून फक्त टेंडर प्रक्रिया व इतर गोष्टीची कारणे सांगून या प्रकल्पाचे काम थांबवलेले आहे. अशामुळे उजनी धरणामध्ये मुबलक पाणी असून देखील सोलापूरकरांना ५ ते ६ दिवसा आड पाणी मिळत आहे. 

काही काळापूर्वी चालू झालेले काम कोणतेही वैद्य कारण नसताना स्मार्ट सिटी च्या तत्कालीन सीइओंनी थांबवले होते. समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करा व हे कारण काम पूर्ण होण्याकरिता कालमर्यादा निश्चित करून तसा कार्यक्रम आखण्यात यावा, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलत असताना सांगितले. समांतर जलवाहिनी योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी देता येईल. यामुळे या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकल्पावर काम करत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

याचबरोबर, शहरातील सार्वजनिक नळ महानगरपालिकेकडून बंद करण्यात येत आहेत ही कारवाई थांबून प्रथमतः सामूहिक नळ कनेक्शन घेण्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती करावी व त्यांना प्रोत्साहित करावे याकरिता आपण घंटा गाड्यांवरील स्पीकर चा वापर ही करू शकतो त्यामुळे झोपडपट्टी भागांमध्ये चांगल्या रीतीने जनजागृती होईल व नागरिक सामूहिक नळ कनेक्शन घेण्याकरिता अर्ज करतील व त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊन जाईल. कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता थेट सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करणे म्हणजे गोरगरीब लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणे असे होत आहे, त्यामुळे प्रथमतः नागरिकांमध्ये जनजागृती करावी त्यांना सामूहिक नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. नंतर सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करावे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदेंनी केली आहे.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेSolapurसोलापूर