शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
2
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
3
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
4
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
5
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
6
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
7
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
8
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
9
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
10
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
11
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
12
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
13
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
15
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
16
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
17
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
18
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
19
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
20
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश

सत्ताधाºयांनी संविधान बदलण्याचा घाट घातलाय, जोगेंद्र कवाडे यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:10 IST

जोगेंद्र कवाडे हे सोलापूरच्या दौºयावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देदेशात सध्या अघोषित आणीबाणी लागू - प्रा. जोगेंद्र कवाडे सरकार देशातील जनतेची सपशेल फसवणूक करीत आहे - प्रा. जोगेंद्र कवाडे नागरिकांनी आता सावध होण्याची गरज - प्रा. जोगेंद्र कवाडे

सोलापूर : सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने भारतीय संविधान बदलण्याचा घाट घातला आहे. पुंजीपतीचे कर्ज माफ केले जात आहे, मात्र शेतकºयाला वाºयावर सोडले जात आहे. खºया अर्थाने हे भांडवलदारांचं राज्य असून, ते आता बदलण्याची गरज आहे, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. 

जोगेंद्र कवाडे हे सोलापूरच्या दौºयावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कवाडे पुढे म्हणाले की, २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी घोषणा केली. अनेक आश्वासने देऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आला, मात्र हे सरकार देशातील जनतेची सपशेल फसवणूक करीत आहे. 

‘अच्छे दिन’च्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला अफुची गोळी देऊन गुंगीत ठेवण्याचे काम करीत आहेत़ देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी भारतीय संविधान बदलून देशात मनुस्मृती लागू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. हा खूप मोठा धोका असून, नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे. येत्या लोकसभा, विधानसभेत भाजपाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे कवाडे म्हणाले. 

रिपाइंच्या ऐक्याबाबत बोलताना कवाडे म्हणाले की, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे रामदास आठवले यांनी प्रथम ऐक्य करावे नंतर आम्ही या ऐक्याच्या सागरात सामील होऊ, अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, शहराध्यक्ष अमित कांबळे, रमेश सरवदे, लौकिक इंगळे, कपिल बनसोडे आदी उपस्थित होते. 

पक्षातून पाच जणांची हकालपट्टी...- पक्षाच्या नावावर बेकायदेशीर कृत्य करणाºया कार्यकर्त्यांना पक्षामध्ये कोणतेही स्थान नाही. बिभीषण लोंढे, अमोल गोडसे, राहुल शंके, शांतीकुमार नागटिळक आदींसह पाच जणांना पक्षातून काढून टाकत असल्याची घोषणा यावेळी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केली. यापूर्वीच या लोकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, तशी घोषणा जयदीप कवाडे यांनी सोलापुरात येऊन केली होती.

जयदीप कवाडे यांना खोटे ठरवत पुन्हा पक्षात असल्याचे सांगितले. मी सोलापुरात येऊन याची अधिकृत घोषणा करणार होतो म्हणून यावर प्रतिक्रिया दिली नाही. या कार्यकर्त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, पक्षाच्या नावाने जर काही करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही कवाडे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे