शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाºयांनी संविधान बदलण्याचा घाट घातलाय, जोगेंद्र कवाडे यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:10 IST

जोगेंद्र कवाडे हे सोलापूरच्या दौºयावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देदेशात सध्या अघोषित आणीबाणी लागू - प्रा. जोगेंद्र कवाडे सरकार देशातील जनतेची सपशेल फसवणूक करीत आहे - प्रा. जोगेंद्र कवाडे नागरिकांनी आता सावध होण्याची गरज - प्रा. जोगेंद्र कवाडे

सोलापूर : सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने भारतीय संविधान बदलण्याचा घाट घातला आहे. पुंजीपतीचे कर्ज माफ केले जात आहे, मात्र शेतकºयाला वाºयावर सोडले जात आहे. खºया अर्थाने हे भांडवलदारांचं राज्य असून, ते आता बदलण्याची गरज आहे, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. 

जोगेंद्र कवाडे हे सोलापूरच्या दौºयावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कवाडे पुढे म्हणाले की, २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी घोषणा केली. अनेक आश्वासने देऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आला, मात्र हे सरकार देशातील जनतेची सपशेल फसवणूक करीत आहे. 

‘अच्छे दिन’च्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला अफुची गोळी देऊन गुंगीत ठेवण्याचे काम करीत आहेत़ देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी भारतीय संविधान बदलून देशात मनुस्मृती लागू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. हा खूप मोठा धोका असून, नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे. येत्या लोकसभा, विधानसभेत भाजपाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे कवाडे म्हणाले. 

रिपाइंच्या ऐक्याबाबत बोलताना कवाडे म्हणाले की, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे रामदास आठवले यांनी प्रथम ऐक्य करावे नंतर आम्ही या ऐक्याच्या सागरात सामील होऊ, अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, शहराध्यक्ष अमित कांबळे, रमेश सरवदे, लौकिक इंगळे, कपिल बनसोडे आदी उपस्थित होते. 

पक्षातून पाच जणांची हकालपट्टी...- पक्षाच्या नावावर बेकायदेशीर कृत्य करणाºया कार्यकर्त्यांना पक्षामध्ये कोणतेही स्थान नाही. बिभीषण लोंढे, अमोल गोडसे, राहुल शंके, शांतीकुमार नागटिळक आदींसह पाच जणांना पक्षातून काढून टाकत असल्याची घोषणा यावेळी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केली. यापूर्वीच या लोकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, तशी घोषणा जयदीप कवाडे यांनी सोलापुरात येऊन केली होती.

जयदीप कवाडे यांना खोटे ठरवत पुन्हा पक्षात असल्याचे सांगितले. मी सोलापुरात येऊन याची अधिकृत घोषणा करणार होतो म्हणून यावर प्रतिक्रिया दिली नाही. या कार्यकर्त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, पक्षाच्या नावाने जर काही करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही कवाडे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे