शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम

By admin | Updated: January 28, 2017 12:28 IST

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरमअशोक कांबळे : मोहोळ आॅनलाईन लोकमतफेबु्रवारीमध्ये होणाऱ्या मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यात सर्वच पक्षांतील राजकीय वातावरण तापले आहे़ प्रत्येक पक्षाच्या बैठका, मुलाखती, चांगला उमेदवार कोण, मालदार उमेदवार कोण याची चाचपणी पक्षप्रमुख करीत आहेत़ माजी आमदार राजन पाटील यांची एकहाती सत्ता असलेल्या मोहोळ तालुक्यात विरोधकांनी राजन पाटील यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी चंग बांधला आहे़ दरम्यान, मोहोळ तालुक्यात सर्व विरोधकांचा एकच विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या हातात असलेली एकहाती सत्ता थोपविण्याची तयारी सर्व विरोधक करत आहेत़ यासाठी भीमा परिवाराचे धनंजय महाडिक, माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह अन्य समविचारी पक्ष व संघटना एकत्र येऊ पाहत आहेत़ त्यात शिवसेना व भाजपाही तयार आहे़ परंतु आघाडीत प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर आपापल्या चिन्हावर निवडणुका लढवाव्यात, अशी भूमिका सेना व भाजपा कार्यकर्ते घेत आहेत़परंतु भीमा परिवाराचे धनंजय महाडिक यांनी आघाडी करायची असेल तर सर्व जागा आघाडीच्या चिन्हावरच लढवाव्या लागतील, अशी भूमिका घेतली आह़े़ ज्यांना यायचे आहे त्यांनी या अनुषंगानेच महाआघाडीत सामील व्हावे, या निर्णयात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मत काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आह़े़ त्यामुळे महाआघाडीला ब्रेक लागला असून, आता सेना-भाजपा अंतिम क्षणी कोणता निर्णय घेणार तर इतर संघटना काय पाऊल उचलणार, यावरच महाआघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे़मोहोळ जि. प़ व पं़ स़ ची निवडणूक लागली असून, गेली २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता रोखण्यासाठी सेना-भाजपा व अन्य मित्रपक्ष लढत आले आहेत. परंतु आजतागायत विरोधकांना यश मिळाले नाही़ राष्ट्रवादीची एकहाती सत्ता अबाधित ठेवण्यात राजन पाटील यशस्वी ठरले आहेत़राजन पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष मनोहर डोंगरे असायचे, परंतु आता होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर राजन पाटील व मनोहर डोंगरे यांच्यातच उभी फूट पडली आहे़ त्यामुळे आता ही निवडणूक राजन पाटील व मनोहर डोंगरे या दोघांच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार आहे़ या पार्श्वभूमीवर माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराबरोबर आघाडी केली आहे़ या आघाडीत धनंजय महाडिक, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कॉगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील, जनहित शेतकरी संघटनेचे भैय्यासाहेब देशमुख हे आहेत़तालुक्यातील आता सर्वच विरोधकांचा ऐक्य विरोधक म्हणून राजन पाटील यांचा राष्ट्रवादी पक्ष बनला आहे़ या राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भीमा परिवारासोबत आघाडी करण्यासाठी सर्वच जण तयार आहेत़ या सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत बैठका झाल्या, परंतु सेना-भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आघाडी करुन वाट्याला येणाऱ्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची भूमिका घेतली आहे़ त्यावर एकमत न झाल्याने अजून तरी आघाडीचे सुत जमले नाही़ आघाडी होणार का, असा प्रश्न अनुत्तरित असतानाच या आघाडीतील नेते, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांनी आघाडीत कोणी बी येवो, आमचे दरवाजे खुले आहेत़ परंतु आमच्या आघाडीच्याच चिन्हावर होणारी निवडणूक लढवावी लागेल, यात कोणताही बदल अथवा तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याने मोहोळ तालुक्यातील महाआघाडीचे घोडे वेशीतच थांबले आहे़ भीमा परिवाराच्या या भूमिकेवर आता सेना-भाजपा काय निर्णय घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे़