शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शिलाई काम करीत अल्पशिक्षित नीलावतींनी साकारला वेदनेचा कवितासंग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:32 IST

कुर्डूवाडीतील कवयित्री नीलावती कांबळे याच्या जीवनप्रवासावर एक नजर

ठळक मुद्देपतीच्या निधनानंतर जीवनाचं रहाटगाडगं हाकत असताना त्या आजही माढा रोडवर छोट्या दुकानात शिलाईचे काम जीवनात एवढ्या वेदना असतानाही त्यांनी आपल्या मुलाला अभियंता पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकवीत आहेत

इरफान शेख 

कुर्डूवाडी : जीवनभर वेदना सहन करीत वेदनाच बनली त्यांची कविता, अशी हृदयद्रावक कथा आहे कुर्डूवाडीतील कवयित्री नीलावती कांबळे यांची. अनेक जाच-जपाट्यातून त्यांनी आपल्या वेदना एकत्र करीत लिहिलेल्या कवितांचाच संग्रह करून त्याचे प्रकाशन केले़ आज त्या कवयित्री  म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. 

पतीच्या निधनानंतर जीवनाचं रहाटगाडगं हाकत असताना त्या आजही माढा रोडवर छोट्या दुकानात शिलाईचे काम करतात. मिळालेल्या पैशातून उपजीविका व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवितात. स्वत: सहावी शिक्षित आहेत. जीवनात एवढ्या वेदना असतानाही त्यांनी आपल्या मुलाला अभियंता पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकवीत आहेत़ मुलगी १२ वी उत्तीर्ण होऊन पदवीचे शिक्षण घेत  आहे.

लग्न झाल्यानंतर त्यांनी अनेक वेदना भोगल्या़ पतीचे , तो  कागद जरी घरच्यांच्या हाती लागला तरी मार खावा लागायचा. अनेक वेळा कागदावर शाईपेक्षा अश्रूच जास्त पडायचे. 

 पतीच्या निधनानंतर त्यांनी ‘वास्तव’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित केला़ या कवितासंग्रहात ‘दारूने लावली याच्या आयुष्याची वाट’, ‘काळजातील जखमा’ , ‘स्त्रीभ्रूणहत्या’, ‘जन्म मला घेऊ द्या’, ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’, ‘आई देवाहून थोर’, ‘मुलींवरील अत्याचार रोकू या’, ‘छकुलीची आर्त हाक’, ‘दुष्काळाचा कहर’, ‘अन्यायाला वाचा फुटेल का?’,  ‘नाती-गोती’, ‘माणुसकीचा दुष्काळ’ अशा सुमारे ६० विषयांवर  त्यांनी प्रकाश टाकत समाजाला सकारात्मकतेचा संदेश दिला आहे.  त्यांच्या लेखणीची भाषा अगदी साधारण, घरगुती वापरातील शब्दरचनेत असल्याने लिखाण हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही. 

लवकरच आत्मकथेचे प्रकाशन दुसरा ‘बालजगत’ नावाचा लहान मुलांसाठी व ‘डोह वेदनेचा’ असे कवितासंग्रह त्यांनी लिहिले आहे़ आर्थिक अडचणींमुळे ते प्रकाशनाअभावी राहिले आहेत. त्यांनी ‘व्यथा एका अभागी स्त्रीची’ ही स्वत:च्या जीवनावरची आत्मकथा लिहिण्याचे काम सध्या सुरू आहे़ आयुष्यात जगलेले अभागी जीवन व त्यातून काढलेला सकारात्मक मार्ग याविषयीचे लिखाण आहे. आपला संदेश देताना कवयित्री नीलावती कांबळे म्हणतात की, ‘ज्या स्त्रिया अन्याय सहन करतात, त्यांनी स्वत: अन्याय सहन करू नये व इतरांवरही अन्याय करू नये, खडतर जीवनातून माझी वाटचाल सुरू असून उद्या   आपली परिस्थिती सुधारल्यावर समाजाला मदत करा’ असा मोलाचा संदेश त्यांनी मुलांना दिला आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिला