शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

शिलाई काम करीत अल्पशिक्षित नीलावतींनी साकारला वेदनेचा कवितासंग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:32 IST

कुर्डूवाडीतील कवयित्री नीलावती कांबळे याच्या जीवनप्रवासावर एक नजर

ठळक मुद्देपतीच्या निधनानंतर जीवनाचं रहाटगाडगं हाकत असताना त्या आजही माढा रोडवर छोट्या दुकानात शिलाईचे काम जीवनात एवढ्या वेदना असतानाही त्यांनी आपल्या मुलाला अभियंता पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकवीत आहेत

इरफान शेख 

कुर्डूवाडी : जीवनभर वेदना सहन करीत वेदनाच बनली त्यांची कविता, अशी हृदयद्रावक कथा आहे कुर्डूवाडीतील कवयित्री नीलावती कांबळे यांची. अनेक जाच-जपाट्यातून त्यांनी आपल्या वेदना एकत्र करीत लिहिलेल्या कवितांचाच संग्रह करून त्याचे प्रकाशन केले़ आज त्या कवयित्री  म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. 

पतीच्या निधनानंतर जीवनाचं रहाटगाडगं हाकत असताना त्या आजही माढा रोडवर छोट्या दुकानात शिलाईचे काम करतात. मिळालेल्या पैशातून उपजीविका व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवितात. स्वत: सहावी शिक्षित आहेत. जीवनात एवढ्या वेदना असतानाही त्यांनी आपल्या मुलाला अभियंता पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकवीत आहेत़ मुलगी १२ वी उत्तीर्ण होऊन पदवीचे शिक्षण घेत  आहे.

लग्न झाल्यानंतर त्यांनी अनेक वेदना भोगल्या़ पतीचे , तो  कागद जरी घरच्यांच्या हाती लागला तरी मार खावा लागायचा. अनेक वेळा कागदावर शाईपेक्षा अश्रूच जास्त पडायचे. 

 पतीच्या निधनानंतर त्यांनी ‘वास्तव’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित केला़ या कवितासंग्रहात ‘दारूने लावली याच्या आयुष्याची वाट’, ‘काळजातील जखमा’ , ‘स्त्रीभ्रूणहत्या’, ‘जन्म मला घेऊ द्या’, ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’, ‘आई देवाहून थोर’, ‘मुलींवरील अत्याचार रोकू या’, ‘छकुलीची आर्त हाक’, ‘दुष्काळाचा कहर’, ‘अन्यायाला वाचा फुटेल का?’,  ‘नाती-गोती’, ‘माणुसकीचा दुष्काळ’ अशा सुमारे ६० विषयांवर  त्यांनी प्रकाश टाकत समाजाला सकारात्मकतेचा संदेश दिला आहे.  त्यांच्या लेखणीची भाषा अगदी साधारण, घरगुती वापरातील शब्दरचनेत असल्याने लिखाण हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही. 

लवकरच आत्मकथेचे प्रकाशन दुसरा ‘बालजगत’ नावाचा लहान मुलांसाठी व ‘डोह वेदनेचा’ असे कवितासंग्रह त्यांनी लिहिले आहे़ आर्थिक अडचणींमुळे ते प्रकाशनाअभावी राहिले आहेत. त्यांनी ‘व्यथा एका अभागी स्त्रीची’ ही स्वत:च्या जीवनावरची आत्मकथा लिहिण्याचे काम सध्या सुरू आहे़ आयुष्यात जगलेले अभागी जीवन व त्यातून काढलेला सकारात्मक मार्ग याविषयीचे लिखाण आहे. आपला संदेश देताना कवयित्री नीलावती कांबळे म्हणतात की, ‘ज्या स्त्रिया अन्याय सहन करतात, त्यांनी स्वत: अन्याय सहन करू नये व इतरांवरही अन्याय करू नये, खडतर जीवनातून माझी वाटचाल सुरू असून उद्या   आपली परिस्थिती सुधारल्यावर समाजाला मदत करा’ असा मोलाचा संदेश त्यांनी मुलांना दिला आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिला