शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मोहोळ नगर परिषदेवर पाण्यासाठी घागर मोर्चा

By दिपक दुपारगुडे | Updated: February 9, 2024 19:55 IST

परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवाशीयांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे.

सोलापूर: मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात पाणी आसताना केवळ नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवाशीयांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. नगर परिषदेच्या विरोधात माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातील महिलांचा घागर मोर्चा काढण्यात आला. तसेच नगर परिषदेसमोर शंकनाद आंदोलन करून मडकी फोडण्यात आली.

यावेळी बारसकर म्हणाले, नगर परिषदेचा कारभार अकार्यक्षम आहे. त्यांना शहराचा पाणी प्रश्न हाताळण्यात अपयश आले आहे. शहरातील धनगर गल्ली, तांबडी माती, नागनाथ मंदिर परिसरात गेली अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही. याला केवळ नगरपरिषदेचे प्रशासनच जबाबदार आहे. येत्या दोन दिवसात पाण्याची सोय न झाल्यास या पेक्षाही महिलांचा मोठा मोर्चा नगरपरिषदेवर येईल असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांना लाईट, पाणी, रस्ते यासह अग्निशमन सेवा मिळत नसतानाही त्याचा कर मात्र जोरदार वसूल केला जात आहे. स्वतःच्या घरातच भाड्याने राहण्याची परिस्थिती शहरवासीयावर ओढवली आहे. घरपट्टी, गाळा भाडे, नळ पट्टी न भरल्याने गाळ्यांना कुलूप लावण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या समस्येसाठी आमची दोन हात करण्याची तयारी असल्याचा इशाराही बारसकर यांनी यावेळी दिला. यावेळी रियाज शेख मंगेश पांढरे, शीलवंत क्षीरसागर, संतोष सलगर आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचाही मोठा सहभाग होता. 

टॅग्स :Solapurसोलापूर