शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोहोळ नगर परिषदेवर पाण्यासाठी घागर मोर्चा

By दिपक दुपारगुडे | Updated: February 9, 2024 19:55 IST

परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवाशीयांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे.

सोलापूर: मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात पाणी आसताना केवळ नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवाशीयांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. नगर परिषदेच्या विरोधात माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातील महिलांचा घागर मोर्चा काढण्यात आला. तसेच नगर परिषदेसमोर शंकनाद आंदोलन करून मडकी फोडण्यात आली.

यावेळी बारसकर म्हणाले, नगर परिषदेचा कारभार अकार्यक्षम आहे. त्यांना शहराचा पाणी प्रश्न हाताळण्यात अपयश आले आहे. शहरातील धनगर गल्ली, तांबडी माती, नागनाथ मंदिर परिसरात गेली अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही. याला केवळ नगरपरिषदेचे प्रशासनच जबाबदार आहे. येत्या दोन दिवसात पाण्याची सोय न झाल्यास या पेक्षाही महिलांचा मोठा मोर्चा नगरपरिषदेवर येईल असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांना लाईट, पाणी, रस्ते यासह अग्निशमन सेवा मिळत नसतानाही त्याचा कर मात्र जोरदार वसूल केला जात आहे. स्वतःच्या घरातच भाड्याने राहण्याची परिस्थिती शहरवासीयावर ओढवली आहे. घरपट्टी, गाळा भाडे, नळ पट्टी न भरल्याने गाळ्यांना कुलूप लावण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या समस्येसाठी आमची दोन हात करण्याची तयारी असल्याचा इशाराही बारसकर यांनी यावेळी दिला. यावेळी रियाज शेख मंगेश पांढरे, शीलवंत क्षीरसागर, संतोष सलगर आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचाही मोठा सहभाग होता. 

टॅग्स :Solapurसोलापूर