शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वृद्धांचा होतोय छळ; सून जेवायला देईना, मुलगा भीक मागू देईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 17:18 IST

न्याय मिळण्यासाठी तक्रार निवारण केंद्राकडे धाव

सोलापूर : वय झाल्याने हातापायाने काम करता येत नाही. पाणी सोडलं तर चहापासून जेवणापर्यंत सर्वच गोष्टींसाठी सून अन् मुलाकडे बघावे लागते. सून लवकर जेवायला देत नाही म्हणून बाहेर नातेवाईकांकडे गेलं तर मुलगा शिवीगाळ करतो. अशा प्रकारच्या तक्रारी छळ होणाऱ्या वृद्धांकडून महिला समस्या तक्रार निवारण केंद्रात दाखल झाल्या आहेत.

वृद्धत्वासोबत बालपणही येते असे म्हणतात ते खरे आहे. वृद्धापकाळात कळत नकळत त्यांच्याकडून चुका होतात; मात्र या चुका समजून घेण्याची कुवत आजच्या पिढीमध्ये अभावानेच दिसून येत आहे. त्यामुळे या पिकल्या पानांना कधी सुने विरुद्ध तर कधी आपल्याच मुलाविरुद्ध पोलीस ठाण्याचे दार ठाेठवावे लागते. लग्न झाल्यानंतर मुलगा व सून यांचा संसार सुरू होतो, त्यामध्ये सासू-सासरे यांना काही खटकल्यास वाद निर्माण होतो. राग मनात धरून सून सासू किंवा सासऱ्याला व्यवस्थित बघत नाही. जेवण वेळेवर देत नाही, नवरा, बायको व मुलांना वेगळे जेवण अन् वृद्ध सासू सासऱ्याला साधं जेवण असे प्रकार घडतात.

घरातील धोरणात्मक निर्णयामध्ये सासू सासऱ्यांचं काही चालू द्यायचं नाही. पत्नीने पतीकडे तक्रार केली की मुलगा आई-वडिलांना मारहाण करण्यास कमी करत नाही. शेवटी पोटचा गोळा आहे म्हणून निमुटपणे अन्याय सहन केला जातो; मात्र अन्याय हाताबाहेर गेल्यानंतर मात्र पोलिसांकडे धाव घेतली जाते.

सून अपमान करते हातही उगारते

घरात सासू सासऱ्यांचं काही चालू द्यायचं नाही. त्यांच्या मध्ये काय बोलले तर सून प्रसंगी सासू, सासऱ्यावर हात उगारते. अनेक घरांमध्ये मुलगा आईला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. सून सासूला मारल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुलगा वडिलाला शिवीगाळ करतो, प्रसंगी मारतो अशाही तक्रारी दाखल झाल्या आहेत.

समुपदेशनाने ५० टक्के प्रकरणे मिटवली

महिला तक्रार निवारण केंद्रात वृद्ध आई-वडिलांच्या तक्रारी दाखल होतात. संबंधित मुलगा, सून किंवा अन्य नातेवाईकाला कक्षामध्ये बोलावले जाते. समोरासमोर बसवून अडचणी जाणून घेतल्या जातात. दोघांनाही समज दिली जाते, तरीही वृद्धांवर अन्याय केला तर कायद्याने गुन्हा दाखल केला जाईल ताकीद दिली जाते. या प्रकारातून ५० टक्के प्रकरणे मिटवली जातात. समजून न घेणाऱ्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात अहवाल पाठवून गुन्हा दाखल करण्यास सांगितले जाते.

पाच वर्षांत वृद्धांच्या तक्रारी

  • २०१७- १६
  • २०१८- १२
  • २०१९- १८
  • २०२०- ०८
  • २०२१ - १३

 

वृद्धांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेतली जाते. संबंधितांना बोलावून समजून सांगितले जाते. शक्यतो प्रेमाने वाद मिटवतो, नसेल तर संबंधित पोलीस ठाण्याला कळवून गुन्हा दाखल करण्यास सांगतो.

- ज्योती कडू, सहायक पोलीस निरीक्षक, महिला समस्या तक्रार निवारण केंद्र

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस