शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सांगोल्यातील १०३ गावांत मतदानाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 14:00 IST

‘वंचित’मुळे मतविभागणी होण्याचा अंदाज; विकासाऐवजी उणीदुणी काढल्याने मतदारांची होती नाराजी

ठळक मुद्देचालू वर्षी माढा लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेतसांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व महाआघाडीचे संजयमामा शिंदे यांच्यातच प्रमुख लढत झाली वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजय मोरे यांनाही तालुक्यातून लक्षणीय मते मिळाल्याची चर्चा

अरुण लिगाडे

सांगोला : अत्यंत चुरशीने पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीतील सांगोला विधानसभा मतदारसंघातील १०३ तर पंढरपूर तालुक्यातील १५ गावांमधून २९६ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदानात एकूण २ लाख ८९ हजार ४१७ मतदारांपैकी १ लाख ८५ हजार ८१८ मतदारांनी हक्क बजावला. ६४.२0 टक्के मतदान झाले. गतवेळेपेक्षा यंदा कमी मतदान झाल्याने टक्का घसरला आहे.

सन २०१४ च्या तुलनेत हा आकडा अल्पसा घसरला असल्याचेही मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गतनिवडणुकीत ६४.५९ टक्के मतदान झाले होते. चालू वर्षी माढा लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. असे असले तरीही सांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व महाआघाडीचे संजयमामा शिंदे यांच्यातच प्रमुख लढत झाली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजय मोरे यांनाही तालुक्यातून लक्षणीय मते मिळाल्याची चर्चा आहे.

वंचित आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा फटका कुणाला बसतो, यावरच सांगोला तालुक्यातून कुणाला मताधिक्य मिळेल हे निश्चित होईल. वंचित बहुजन आघाडीकडे दलित व मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार व महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यामुळे तालुक्यातील काही धनगर मतदारही वंचित आघाडीकडे वळल्याचे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादीचा हक्काचा मानला जाणारा आंबेडकरी चळवळीतील व मुस्लीम या पारंपरिक मतदारांनी वंचित आघाडीचा पर्याय स्वीकारल्याने माहितीच्या उमेदवाराला त्याचा किती फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रमुख उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानल्याने काही प्रमाणात तालुक्यातील मतदार नाराज झाला होता. महायुतीचे उमेदवार कर्जबाजारी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून जाहीर सभेतून सांगितले होते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व स्वार्थी असल्याचे महायुतीच्या व्यासपीठावरून बोलले जात होते. प्रचारादरम्यान यंदा सांगोल्याचे पाणी चांगलेच पेटल्याचे दिसून आले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवरून महायुतीच्या उमेदवाराने राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर या योजनेला महायुतीच्या उमेदवाराचा विरोध असल्याचा प्रचार सोशल मीडियावरून राष्ट्रवादीने केला होता. 

पाण्याचे आश्वासक भाष्य- सांगोल्यात पार पडलेल्या महायुतीच्या शेवटच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुष्काळी भागातील पाणी प्रश्नावर आश्वासक भाष्य केल्याने तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे सांगोला तालुक्यातील मतदार आपल्या मतांचे पवित्र दान कोणाच्या पारड्यात टाकले, यावरच माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाElectionनिवडणूकVotingमतदान