शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगोल्यातील १०३ गावांत मतदानाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 14:00 IST

‘वंचित’मुळे मतविभागणी होण्याचा अंदाज; विकासाऐवजी उणीदुणी काढल्याने मतदारांची होती नाराजी

ठळक मुद्देचालू वर्षी माढा लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेतसांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व महाआघाडीचे संजयमामा शिंदे यांच्यातच प्रमुख लढत झाली वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजय मोरे यांनाही तालुक्यातून लक्षणीय मते मिळाल्याची चर्चा

अरुण लिगाडे

सांगोला : अत्यंत चुरशीने पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीतील सांगोला विधानसभा मतदारसंघातील १०३ तर पंढरपूर तालुक्यातील १५ गावांमधून २९६ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदानात एकूण २ लाख ८९ हजार ४१७ मतदारांपैकी १ लाख ८५ हजार ८१८ मतदारांनी हक्क बजावला. ६४.२0 टक्के मतदान झाले. गतवेळेपेक्षा यंदा कमी मतदान झाल्याने टक्का घसरला आहे.

सन २०१४ च्या तुलनेत हा आकडा अल्पसा घसरला असल्याचेही मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गतनिवडणुकीत ६४.५९ टक्के मतदान झाले होते. चालू वर्षी माढा लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. असे असले तरीही सांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व महाआघाडीचे संजयमामा शिंदे यांच्यातच प्रमुख लढत झाली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजय मोरे यांनाही तालुक्यातून लक्षणीय मते मिळाल्याची चर्चा आहे.

वंचित आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा फटका कुणाला बसतो, यावरच सांगोला तालुक्यातून कुणाला मताधिक्य मिळेल हे निश्चित होईल. वंचित बहुजन आघाडीकडे दलित व मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार व महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यामुळे तालुक्यातील काही धनगर मतदारही वंचित आघाडीकडे वळल्याचे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादीचा हक्काचा मानला जाणारा आंबेडकरी चळवळीतील व मुस्लीम या पारंपरिक मतदारांनी वंचित आघाडीचा पर्याय स्वीकारल्याने माहितीच्या उमेदवाराला त्याचा किती फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रमुख उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानल्याने काही प्रमाणात तालुक्यातील मतदार नाराज झाला होता. महायुतीचे उमेदवार कर्जबाजारी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून जाहीर सभेतून सांगितले होते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व स्वार्थी असल्याचे महायुतीच्या व्यासपीठावरून बोलले जात होते. प्रचारादरम्यान यंदा सांगोल्याचे पाणी चांगलेच पेटल्याचे दिसून आले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवरून महायुतीच्या उमेदवाराने राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर या योजनेला महायुतीच्या उमेदवाराचा विरोध असल्याचा प्रचार सोशल मीडियावरून राष्ट्रवादीने केला होता. 

पाण्याचे आश्वासक भाष्य- सांगोल्यात पार पडलेल्या महायुतीच्या शेवटच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुष्काळी भागातील पाणी प्रश्नावर आश्वासक भाष्य केल्याने तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे सांगोला तालुक्यातील मतदार आपल्या मतांचे पवित्र दान कोणाच्या पारड्यात टाकले, यावरच माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाElectionनिवडणूकVotingमतदान