शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञांचा सल्ला; रुग्णांनी थंडीच्या दिवसात रक्तदाबावर लक्ष ठेवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:26 IST

तज्ज्ञांचा सल्ला : प्रत्येक हृदयविकाराच्या रुग्णाला नसते अधिक औषधांची गरज

ठळक मुद्देसाधारणपणे शरीराचे तापमान हे ३७ (९८.६ अंश फॅरेनहाइट) अंश सेल्सिअस असते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत माणसाचे शरीर सहन करू शकते ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी नियमितपणे औषधे घ्यावीत

सोलापूर : थंडीच्या दिवसात रक्तवाहिन्या कमी तापमानाला प्रतिसाद देऊन आकुंचन पावतात. रक्तदाब जास्त असताना रक्तवाहिनी आकुंचन पावली तर दाब अजून वाढू शकतो. प्रत्येक रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देते, यावरून त्याला हृदयविकाराचा धक्का बसेल की नाही, हे अवलंबून असते. यासाठी रुग्णांनी थंडीच्या दिवसात रक्तदाबावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

बाजारात १,२०० ते १,५०० रुपये दरम्यान मिळणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून रक्तदाब तपासता येतो. या यंत्राचा वापर करून कामाला जाण्याआधी, कामावर असताना, कामावरून घरी आल्यानंतर आणि सर्वात शेवटी रात्री झोपताना रक्तदाबाची तपासणी करावी. कोणत्या वेळेत रक्तदाब वाढतो, हे लक्षात येणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस कामाच्या ताणामुळे त्याच वेळेत रक्तदाब वाढू शकतो. नियमितपणे तपासणी केलले रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले तर सात दिवसात एखाद्या विशिष्ट वेळी रक्तदाब साधारण असतो किंवा विशिष्ट वेळी रक्तदाब वाढतो हे कळते. यावरून डॉक्टरही वेळेनुसार औषधांची मात्रा ठरवतात. एखाद्या वेळेस औषधांचा डोस वाढवायचा असेल तर ते वाढवू शकतात.

थंडीच्या दिवसात अशी घ्या काळजी

साधारणपणे शरीराचे तापमान हे ३७ (९८.६ अंश फॅरेनहाइट) अंश सेल्सिअस असते. ३५ अंश सेल्सिअसपर्यंत माणसाचे शरीर सहन करू शकते. पण, या त्याच्यापेक्षा कमी झाले तर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे अशा काळात काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी नियमितपणे औषधे घ्यावीत, शरीर गरम राहील याची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

हृदयाच्या आरोग्यासाठी नको व्यसन

रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या ठिसूळ झालेल्या असतात. साधारणपणे रक्तदाब १२० असायला हवा. यापेक्षा जास्त रक्तदाब झाला तर रक्तवाहिन्यावर ताण पडतो. यामुळे रक्तवाहिन्याची जाडी वाढत जाते. याचा परिणाम म्हणून रक्तवाहिनी फाटू शकते. त्यात चरबीच्या गाठी जमा होत जातात. अशात रुग्णाला व्यसन असल्यास रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया वाढत जाते. रक्त घट्ट झाले तर ब्लॉक तयार होतो. हृदयाचा रक्तपुरवठा बंद होऊन हृदयविकाराचा धक्का बसू शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्याची गरज आहे.

प्रत्येकाचे शरीर थंडीला कसा प्रतिसाद देऊ शकतो हे सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या औषधात वाढ करण्याची गरज असतेच असे नाही. यासाठी नियमितपणे (कमीत कमी दिवसातून तीनदा) रक्तदाबाची तपासणी करावी. याचा अहवाल डॉक्टरांना दाखवावा. जेणेकरून ते औषधे व काय काळजी घ्यायची, हे निश्चितपणे सांगू शकतात.

- डॉ. विजय अंधारे, हृदयविकार तज्ज्ञ, सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं