शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पेशंट्सहो पेशन्स ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:30 IST

अनेकदा डॉक्टर रुग्णांना वेळ देत नाहीत असा आरोप रुग्णांच्या नातलगांकडून होतो. काही डॉक्टरांसाठी हे खरे असले तरी सर्वसाधारणपणे डॉक्टर्स ...

अनेकदा डॉक्टर रुग्णांना वेळ देत नाहीत असा आरोप रुग्णांच्या नातलगांकडून होतो. काही डॉक्टरांसाठी हे खरे असले तरी सर्वसाधारणपणे डॉक्टर्स त्याच्या आजाराची जरुरी इतकी माहिती नक्कीच प्रत्येक रुग्णाला देत असतात. उलट बºयाच डॉक्टरांचा अनुभव असा असतो की वारंवार तीच माहिती घेण्यासाठी घरातील विविध नातेवाईक अथवा मित्र हे डॉक्टरांना भेटत राहतात. पुन्हापुन्हा तेच प्रश्न विचारून भंडावून सोडतात. या नातेवाईकांपैकी बºयाच जणांना रुग्णाच्या काळजीपेक्षा मी डॉक्टरांशी बोललो हे दाखवायचे असते. उगाचच डॉक्टरांना नीट उपचार करा, असे सांगायचे असते. जणूकाही यांनी सांगितले नसते तर डॉक्टर चुकीचेच उपचार करणार होते.

डॉक्टर गरज नसताना तपासण्या करण्यास सांगतात असाही समज असतो. जसे पेजर किंवा डायल फोन मागे पडले तसेच नाडी तपासून निदान करण्याचे दिवसही गेले. निदान करताना डॉक्टरांना तपासण्याच्या मदतीची गरज असते. उलट तपासण्यांची खूप मोठी मदत उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी होत असते. असे असताना तपासण्या न करणे म्हणजे मूर्खपणा होईल. वाढत्या वयोमानामुळे डॉक्टरांकडे येणाºया वृद्ध रुग्णांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. त्यांच्यावर उपचार वा शस्त्रक्रिया करणे यात डॉक्टरांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा कस लागतो. त्यासाठी उपचारातले धोके कमी करण्यासाठी डॉक्टरांना वारंवार अशा तपासण्यांची मदत घ्यावी लागते. निदान किंवा उपचार चुकल्यानंतर कमीत कमी चाचण्या केल्या म्हणून कोणीही डॉक्टरला मेडल देत नाही. उलट शिव्याशापच मिळतात. 

सुपर स्पेशालिटीच्या या जमान्यात प्रत्येक बोटासाठी वेगळा डॉक्टर असण्याची वेळ आता आलेली आहे. जसे एखाद्या डॉक्टरचे एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य तेवढे चांगले उपचार रुग्णाला मिळण्याची शक्यता जास्त. असे असताना रुग्ण एकमेकांना रेफर करणे हे अपरिहार्य आहे.  सगळे उपचार एकाच डॉक्टरचे एकाच छताखाली करणे आता शक्यच   नाही. तेव्हा रेफरल हे पेशंटच्या भल्यासाठीच आहे हे समजून घेण्याची गरज आहे.

डॉक्टर महागडी औषधे लिहून देतात असाही आरोप होतो. मुळात डॉक्टर आणि औषधांच्या किमती याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. औषधांच्या किमती नियंत्रित करणे हे सरकारचे काम आहे. तसेच त्या औषधांचा दर्जा वेळोवेळी तपासण्या करून राखणे हेही. आजपर्यंत तरी जेनेरीक औषधे बाजारात सहजपणे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाला शक्य झालेले नाही. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर दिलेल्या औषधांमुळे रुग्णाच्या तब्येतील सुधारणा होत आहे किंवा नाही एवढे तरी डॉक्टरांना नक्कीच कळत असते. याउपर प्रत्येकवेळी डॉक्टरांच्या औषध लिहून देण्याच्या हेतूबद्दल शंका घेणाºया नातेवाईकांनी होणाºया परिणामांची जबाबदारीही स्वीकारायला हवी. स्वस्तात औषध हवे पण त्यामुळे नुकसान झाले तर डॉक्टर जबाबदार असे कसे चालेल?

आय. सी. यू. मध्ये ठेवलेला रुग्ण बरा व्हायलाच हवा, असाही अनेकांची धारणा असते. मुळात आय. सी. यू. मध्ये ठेवलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर असते म्हणूनच त्याला तिथे ठेवलेले असते. अशा परिस्थितीत रुग्ण १०० टक्के बरा होण्याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही अनेकदा रुग्ण हाती लागत नाही. रुग्ण बरा होणे अथवा न होणे हे संपूर्णपणे डॉक्टरांच्या हातात नसतेच. तेव्हा अशी अपेक्षा ठेवणे हेच मुळात चूक आहे. मुळात आॅपरेशन कोणत्या आजारासाठी केले जात आहे, त्यात किती गुंतागुंत झालेली आहे, आॅपरेशन करतेवेळी रुग्णाची प्रकृती कशी होती यावर आॅपरेशनचा रिझल्ट अवलंबून आहे. काही वेळेला या साºया गोष्टी नियंत्रित असूनही रुग्ण दगावू शकतात. कारण वैद्यकीय शास्त्र हे गणितासारखे नाही. इथे दोन अधिक दोन मायनस चार होऊ शकतात. रुग्णाला असलेले इतर आजार, भुलेमधली गुंतागुंत, आॅपरेशनमधली गुंतागुंत, काही औषधे दुष्परिणाम याला जबाबदार असू शकतात. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी पुरेशी काळजी घेऊनही या बाबी आॅपरेशनच्या वेळी घडू शकतात हे लक्षात घेणे जरुरी आहे. रुग्णांनी, नातेवाईकांनी डॉक्टर हाही मनुष्य आहे त्यास समजून घ्यायला हवे मानसिकता जपायला हवी. - डॉ. सचिन जम्मा(लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरHealthआरोग्य