शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडून गेलेल्यांना पक्षाने वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:40 IST

संस्थाने खालसा होतील: राष्ट्रवादीच्या बैठकीत जुन्या नेत्यांवर रोष व्यक्त करा; सत्ता गेली म्हणून पक्ष सोडल्याचा आरोप

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि जिल्हा पदाधिकाºयांची हुतात्मा स्मृती मंदिरातील बैठक मार्गदर्शनासाठी आयोजित केलीया बैठकीत पक्ष सोडून जाणाºया नेत्यांवर आगपाखड करण्यात आलीरूपाली चाकणकर म्हणाल्या, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी आजच्या सभेकडे पाहायला हवे

सोलापूर : पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्ह्यातील नेत्यांची संस्थाने खालसा होतील, अशी टीका उमेश पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि जिल्हा पदाधिकाºयांची हुतात्मा स्मृती मंदिरातील बैठक मार्गदर्शनासाठी आयोजित केली होती. या बैठकीत पक्ष सोडून जाणाºया नेत्यांवर आगपाखड करण्यात आली. रूपाली चाकणकर म्हणाल्या, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी आजच्या सभेकडे पाहायला हवे. इथे उपस्थित असलेला कार्यकर्ता पक्ष सोडून गेलेल्यांविरुद्ध रान पेटविणार आहे. शरद पवारांनी अनेकांना पदे, मानसन्मान दिला. सत्ता गेली म्हणून अनेक लोकांनी पक्ष सोडला. या लोकांना मी याच व्यासपीठावरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. 

उमेश पाटील म्हणाले, आपली संस्थाने बंद पडतील म्हणून जिल्ह्यातील काही लोकांनी पक्ष सोडला. त्यांची संस्थाने खालसा करण्याचे काम शरद पवार करणार आहेत. पक्ष सोडून ज्यांनी ज्यांनी पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, तो खंजीर उलटा करून त्यांना उत्तर देण्यात येईल. 

बळीराम साठे, लोकसभेत पक्षाला म्हणावे तसे यश आले नाही. ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे हे घडले. पवारांनी आतापर्यंत ज्यांना मोठं केलं, ज्यांच्या हिताचा बारकाईने विचार केला ते लोक सर्वांना सोडून चालले आहेत. मंचावर बसलेले सगळेच भावी आमदार आहेत. संतोष पवार म्हणाले, आमच्यात मतभेद असले तरी आम्ही पवारांसाठी एक आहोत. नेते सोडून गेले असले तरी कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे. 

युवा नेत्यांकडे जिल्ह्याची सूत्रे द्या...- साहेब, दुसºया फळीतील युवा नेत्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी द्या, अशा आशयाचे फलक घेऊन     राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष सुहास कदम यांनी पवारांसमोर घोषणा दिल्या. पक्ष सोडून गेलेल्यांच्या विरोधात लढणारा युवा चेहराच पक्ष वाढवू शकतो, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

पूरग्रस्तांची मदत करण्याऐवजी जनादेश घेत फिरतात- सांगली, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांत पूरस्थिती उद्भवली. हजारो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मी तिथे चार दिवस त्या भागात होतो. संकटाच्या काळात राज्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या पाठीशी राहायला हवे होते. मी किल्लारी भूकंपाच्या काळात सोलापुरात मुक्कामाला थांबून दररोज उस्मानाबाद, लातूरला दौरा करीत होतो. पण आमचे राज्यकर्ते हेलिकॉप्टरने एक चक्कर मारून आले. त्यानंतर पत्ता नाही. आता महाराष्ट्रात जनादेश घेण्यासाठी फिरत आहेत. त्यांच्या हातात सत्ता देणार का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रवादीच्या सभेत मनसेचे गाणे- कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी कार्यक्रमास्थळी राष्ट्रवादी पक्षाची जोशपूर्ण गीते लावण्यात आली होती. यादरम्यान काही वेळ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित ‘तुमच्या राजाला साथ द्या’ हे गाणे लावण्यात आले होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक