शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

वाटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांचा सहभाग

By appasaheb.dilip.patil | Updated: April 19, 2018 12:09 IST

महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेस सोलापुरात प्रारंभ झाला

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ३१४० गावात श्रमदानाचे काम जोमाने सुरूश्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारण, पाणलोटच्या कामास प्रारंभ

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेस सोलापुरात प्रारंभ झाला आहे़ यात सोलापूर जिल्ह्यातून २३५ गावांनी सहभाग नोंदवला असून १४० गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारण, पाणलोटच्या कामास प्रारंभ झाला आहे.राज्यात वॉटरकप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे़ यात राज्यातील २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतून ४ हजार ३० गावे यंदा स्पर्धेत सहभागी झाली आहेत. यात सोलापुरातील २४२ गावांचा सहभाग आहे़ मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर व सांगोला या दोनच तालुक्याने सहभाग नोंदविला होता़ यात उत्तर सोलापूरमधील ३० तर सांगोल्यातील ४७ गावांनी सहभाग नोंदविला होता़ स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ असा आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे़ याशिवाय प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धा तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे़ स्पर्धेत भाग घेणाºया प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थींना पाणी फाउंडेशनने पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील ४५ दिवसांत गावात श्रमदानाने तसेच मशिनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारुन पाणी साठवण क्षमता निर्माण करायची आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच सर्वच विभागाच्या शासकीय अधिकाºयांनी श्रमदानात सहभाग नोंदवित गावकºयांचा उत्साह वाढविण्याचे काम जोमाने सुरू केले आहे़तालुकानिहाय सहभागी गावांचा तक्तातालुका     सहभागी गावे    श्रमदान गावे- माढा    ४५    २५- करमाळा    ४३    २६- मंगळवेढा    ३५    १७- उत्तर सोलापूर    ३४    २८- सांगोला    ५१    १८- बार्शी     ३४    २६कामांच्या तपासणीनंतर होणार गुणदानघरातून वाया जाणाºया पाण्यासाठी शोषखड्डे, पर्यावरण समतोल राखण्यासाठी गावाने रोपवाटिका तयार करून लोकसंख्येच्या दुप्पट वृक्षारोपण, जलसंधारणाच्या विविध कामासाठी श्रमदान व लोकसहभागातून यंत्राने विविध कामे, गावाचे माती परीक्षण, काडीपेटी मुक्त शिवार, गावाच्या पाण्याचे बजेट, नापेड प्रकल्प, माथा ते पायथा या तंत्राने जलसंधारणाची विविध कामे गावाने करायची आहेत. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक, तसेच तालुकानिहाय एक प्रतिनिधी नेमण्यात आला आहे. तसेच पाणी फाउंडेशनची समिती गावनिहाय भेटी देऊन कामांची तपासणी करत गुणदान करणार आहे. त्यातून यशस्वी गावे निवडली जातील.सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ३ यात सहभाग नोंदविला होता़ त्यापैकी १४० गावात श्रमदानाचे काम सुरू झाले आहे़ प्रत्येक गावात अंदाजे २ हजार ते ५ हजार पर्यंत लोक श्रमदान करीत आहेत़ याकामी बालाजी अमाईन्स कंपनीने तीन ठिकाणच्या कामासाठी जेसीबी उपलब्ध करून दिले आहेत. आणखीन जिल्ह्यातील संस्था, संघटना सहभागी होत आहेत़ गावे पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी श्रमदानात सहभागी व्हावे़- विकास गायकवाड,जिल्हा समन्वयक, पाणी फाउंडेशन, सोलापूऱ

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणी