शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पांगरेचा अर्जुन पुरस्कार विजेता सुयश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST

करणार पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करमाळा : तालुक्यातील पांगरे येथील अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू सुयश जाधव टोकियो ...

करणार पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व

करमाळा : तालुक्यातील पांगरे येथील अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू सुयश जाधव टोकियो येथे होणाऱ्या पॅराऑलिंम्पिक २०२१ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर स्पर्धेच्या अनुषंगाने जाधव तयारी करत असून, या स्पर्धेत त्याने देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करण्याची ग्वाही दिली.

जपानमधील टोकियो येथे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पॅराऑलिंम्पिक स्पर्धा होणार आहेत. यामध्ये जलतरणातील २०० मीटर वैयक्तिक मिडले आणि ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धा प्रकारात जाधव देशाच्या वतीने सहभागी होणार आहे. त्यातील २०० मीटर स्पर्धा २४ ऑगस्ट रोजी, तर ५० मीटर स्पर्धा तीन सप्टेंबर रोजी होणार आहेत.

जलतरण विभागात भारताकडून पॅराऑलिंम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला जलतरणपटू म्हणून सुयशचे नाव नोंद झाली आहे. २०१८ मधील जकार्ता आशियाई स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, तर २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात कांस्य पदक मिळवून सुयशने देशाचे नाव उंचावले होते.

या दमदार प्रदर्शनामुळे सुयशची टोकियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुयशने यापूर्वी रियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धा २०१६मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. विविध स्पर्धांत सातत्याने यश मिळवून जागतिक खेळाडू म्हणून समोर आलेल्या सुयशला आता टोकियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा उंचवायचा आहे. त्या पार्श्वभूमीवरच तो सध्या बालेवाडी (पुणे) येथील भारतीय प्राधिकरण क्रीडा केंद्रात तयारी करत आहे.

----

दिव्यांगावर मात करून मिळवलं यश

वयाच्या अकराव्या वर्षी एका अपघातात कोपराजवळून दोन्ही हात गमवावे लागलेल्या सुयश जाधवचा जागतिक खेळाडूपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. दिव्यांगावर मात करणाऱ्या सुयशने क्रीडा शिक्षक वडील नारायण जाधव यांच्यासह इतर मार्गदर्शक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपली कारकीर्द उंचावली आहे. आतापर्यंत विविध जलतरण स्पर्धांतून शंभरहून अधिक पदकांची कमाई करणाऱ्या सुयशला महाराष्ट्र शासनाने मानाचा एकलव्य पुरस्कार (२०१८), भारत सरकारने अर्जुन पुरस्कार (२०२०) देऊन गौरविले आहे.

----

१९ सुयश जाधव