शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

पांगरेचा अर्जुन पुरस्कार विजेता सुयश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST

करणार पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करमाळा : तालुक्यातील पांगरे येथील अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू सुयश जाधव टोकियो ...

करणार पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व

करमाळा : तालुक्यातील पांगरे येथील अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू सुयश जाधव टोकियो येथे होणाऱ्या पॅराऑलिंम्पिक २०२१ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर स्पर्धेच्या अनुषंगाने जाधव तयारी करत असून, या स्पर्धेत त्याने देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करण्याची ग्वाही दिली.

जपानमधील टोकियो येथे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पॅराऑलिंम्पिक स्पर्धा होणार आहेत. यामध्ये जलतरणातील २०० मीटर वैयक्तिक मिडले आणि ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धा प्रकारात जाधव देशाच्या वतीने सहभागी होणार आहे. त्यातील २०० मीटर स्पर्धा २४ ऑगस्ट रोजी, तर ५० मीटर स्पर्धा तीन सप्टेंबर रोजी होणार आहेत.

जलतरण विभागात भारताकडून पॅराऑलिंम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला जलतरणपटू म्हणून सुयशचे नाव नोंद झाली आहे. २०१८ मधील जकार्ता आशियाई स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, तर २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात कांस्य पदक मिळवून सुयशने देशाचे नाव उंचावले होते.

या दमदार प्रदर्शनामुळे सुयशची टोकियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुयशने यापूर्वी रियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धा २०१६मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. विविध स्पर्धांत सातत्याने यश मिळवून जागतिक खेळाडू म्हणून समोर आलेल्या सुयशला आता टोकियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा उंचवायचा आहे. त्या पार्श्वभूमीवरच तो सध्या बालेवाडी (पुणे) येथील भारतीय प्राधिकरण क्रीडा केंद्रात तयारी करत आहे.

----

दिव्यांगावर मात करून मिळवलं यश

वयाच्या अकराव्या वर्षी एका अपघातात कोपराजवळून दोन्ही हात गमवावे लागलेल्या सुयश जाधवचा जागतिक खेळाडूपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. दिव्यांगावर मात करणाऱ्या सुयशने क्रीडा शिक्षक वडील नारायण जाधव यांच्यासह इतर मार्गदर्शक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपली कारकीर्द उंचावली आहे. आतापर्यंत विविध जलतरण स्पर्धांतून शंभरहून अधिक पदकांची कमाई करणाऱ्या सुयशला महाराष्ट्र शासनाने मानाचा एकलव्य पुरस्कार (२०१८), भारत सरकारने अर्जुन पुरस्कार (२०२०) देऊन गौरविले आहे.

----

१९ सुयश जाधव